शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

गोसेखुर्द प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:22 IST

इंदिरा सागर महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे काम शिल्लक कामे पूर्ण झाली असून धरणाची पातळी २४१.२०० मीटर आहे.

धरणाची पातळी २४१.२०० मीटरवर : दोन वक्रद्वारे उघडली, डाव्या, उजव्या कालव्यात पाणी सोडलेप्रकाश हातेल । लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : इंदिरा सागर महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे काम शिल्लक कामे पूर्ण झाली असून धरणाची पातळी २४१.२०० मीटर आहे. डावा, उजव्या दोन्ही कालव्यात पाणी सोडले असून धरणाची दोन वक्रद्वारे अर्ध्या मीटरने उघडले आहेत.२२ एप्रिल १९८८ मध्ये गोसे धरणाची निर्मिती झाली पायथ्याजवळ पाणी वाहुन जाण्याकरिता चार भुमिगत बोगदयाची ‘कडूळ’ निर्मिती करण्यात आली होती आज हे प्रकल्पपूर्ण पणे तयार असून शासनाने पाणी अडविल्याची भुमिका घेतल्याने सर्वत्र जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाचे २४२ मीटरचा दुसरा टप्पा अर्थात २० टीएमसी उद्दिष्ट पूर्ण केले गेले होते. यावर्षी त्यात वाढ करुन २४२.५०० मीटरपर्यंत जलसाठा साठविण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या गेट क्रमांक ८, ९, १० वरील चार भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्याने धरणातील जलसाठा टप्पाटप्प्याने कमी केले होते. तर धरणाचे ३३ वक्रद्वारे बंद केले असून आवश्यकतेनुसार पाणी ८ ते १० दिवसानी सोडले जात होते व कंडूळ बोगद्याचे कामे वक्रद्वाराने पाणी अडवून बोगद्याची कामे युध्दपातळीवर सुरु होती. ते चारही (कंडूळ) बोगद्याची कामे पुर्ण झाली असून धरणाची गेट क्र. १ व ३३ अर्ध्या मिटरने उघडले आहेत. सध्या स्थितीत प्रकल्पात पाण्याचा साठा २४१.२०० मीटर आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने रोवणी पावसाअभावी रखडल्याने प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. गोसे प्रकल्पाच्या पाण्यावर वीज निर्मिती करणाऱ्या पॉवर हाऊसची कामे अंतीम टप्प्यात आली असून धरणाच्या पोटातील कामे सुरु आहेत त्या पॉवर हाऊसच्या कामासाठी पुन्हा पाण्याची पातळी कमी करण्यात येणर आहे. पावर हॉऊसची पूर्ण कामे झाल्यावर डिसेंबर २०१७ ला धरणाचे संचयन पातळी गाठणार आहे.रोवणी होईपर्यंत कॅनल सुरु ठेवागोसेखुर्द परिसरातील १० किमी पर्यंतच्या गावाला या प्रकल्पात शासनाने पाणी अडविणे सुरु केले तेव्हापासून अल्प पाऊस पडत असल्याने चार वर्षा पासुन निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची रोवणी होत नाही आहेत. त्यामुळे डाव्या कालव्यात सोडलेले पाणी रोवणी होईपर्यंत बंद करु नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात अश्रूधरणाची कामे होताच पाणी अडविण्याची भुमिका शासनाने घेतली नदी काठावरील प्रकल्पग्रस्तांना गावे सोडावी लागली. मात्र बोगदयाचे कामाला धरण खाली केल्याने जुने गावाचे दर्शन झाले असून गावातील रस्ते, मंदिरे, चौकटीवरील वटवृक्ष पडलेली घरे या गावात गेलेले बालपण जुन्या आठवणी निर्माण करित असून प्रकल्पग्रस्तांची डोळे पाणावली आहेत. पुन्हा शासनाने पाणी साठवणूक केल्याने आठवणीवर पांघरुन झाकले गेले आहे.