शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

गोसेखुर्द प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:22 IST

इंदिरा सागर महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे काम शिल्लक कामे पूर्ण झाली असून धरणाची पातळी २४१.२०० मीटर आहे.

धरणाची पातळी २४१.२०० मीटरवर : दोन वक्रद्वारे उघडली, डाव्या, उजव्या कालव्यात पाणी सोडलेप्रकाश हातेल । लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : इंदिरा सागर महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे काम शिल्लक कामे पूर्ण झाली असून धरणाची पातळी २४१.२०० मीटर आहे. डावा, उजव्या दोन्ही कालव्यात पाणी सोडले असून धरणाची दोन वक्रद्वारे अर्ध्या मीटरने उघडले आहेत.२२ एप्रिल १९८८ मध्ये गोसे धरणाची निर्मिती झाली पायथ्याजवळ पाणी वाहुन जाण्याकरिता चार भुमिगत बोगदयाची ‘कडूळ’ निर्मिती करण्यात आली होती आज हे प्रकल्पपूर्ण पणे तयार असून शासनाने पाणी अडविल्याची भुमिका घेतल्याने सर्वत्र जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाचे २४२ मीटरचा दुसरा टप्पा अर्थात २० टीएमसी उद्दिष्ट पूर्ण केले गेले होते. यावर्षी त्यात वाढ करुन २४२.५०० मीटरपर्यंत जलसाठा साठविण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या गेट क्रमांक ८, ९, १० वरील चार भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्याने धरणातील जलसाठा टप्पाटप्प्याने कमी केले होते. तर धरणाचे ३३ वक्रद्वारे बंद केले असून आवश्यकतेनुसार पाणी ८ ते १० दिवसानी सोडले जात होते व कंडूळ बोगद्याचे कामे वक्रद्वाराने पाणी अडवून बोगद्याची कामे युध्दपातळीवर सुरु होती. ते चारही (कंडूळ) बोगद्याची कामे पुर्ण झाली असून धरणाची गेट क्र. १ व ३३ अर्ध्या मिटरने उघडले आहेत. सध्या स्थितीत प्रकल्पात पाण्याचा साठा २४१.२०० मीटर आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने रोवणी पावसाअभावी रखडल्याने प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. गोसे प्रकल्पाच्या पाण्यावर वीज निर्मिती करणाऱ्या पॉवर हाऊसची कामे अंतीम टप्प्यात आली असून धरणाच्या पोटातील कामे सुरु आहेत त्या पॉवर हाऊसच्या कामासाठी पुन्हा पाण्याची पातळी कमी करण्यात येणर आहे. पावर हॉऊसची पूर्ण कामे झाल्यावर डिसेंबर २०१७ ला धरणाचे संचयन पातळी गाठणार आहे.रोवणी होईपर्यंत कॅनल सुरु ठेवागोसेखुर्द परिसरातील १० किमी पर्यंतच्या गावाला या प्रकल्पात शासनाने पाणी अडविणे सुरु केले तेव्हापासून अल्प पाऊस पडत असल्याने चार वर्षा पासुन निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची रोवणी होत नाही आहेत. त्यामुळे डाव्या कालव्यात सोडलेले पाणी रोवणी होईपर्यंत बंद करु नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात अश्रूधरणाची कामे होताच पाणी अडविण्याची भुमिका शासनाने घेतली नदी काठावरील प्रकल्पग्रस्तांना गावे सोडावी लागली. मात्र बोगदयाचे कामाला धरण खाली केल्याने जुने गावाचे दर्शन झाले असून गावातील रस्ते, मंदिरे, चौकटीवरील वटवृक्ष पडलेली घरे या गावात गेलेले बालपण जुन्या आठवणी निर्माण करित असून प्रकल्पग्रस्तांची डोळे पाणावली आहेत. पुन्हा शासनाने पाणी साठवणूक केल्याने आठवणीवर पांघरुन झाकले गेले आहे.