शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

परस्परांविरूद्ध तक्रारी दाखल

By admin | Updated: September 24, 2015 00:45 IST

शेतीच्या वहिवाटीच्या मुद्यावरून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारला तारखेवर आलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला.

भंडारा : शेतीच्या वहिवाटीच्या मुद्यावरून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारला तारखेवर आलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. यात झालेल्या मारहाण प्रकरणाची दोघांनीही परस्परांविरूध्द भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.मोहाडी तालुक्यातील घाटकुरोडा येथील धनराज चिंतनवार यांनी बुधवारला ‘लोकमत’ कार्यालयात बाजू मांडताना म्हणाले, हरिचंद्र एंचिलवार यांचा धनराज चिंतनवार, शंकर चिंतनवार, ग्यानीराम लकडेस्वार व भय्या ठवकर यांच्याशी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या मुद्यावरून २००६ पासून वाद सुरू आहे. याप्रकरणी मोहाडीचे तत्कालीन तहसीलदार शिंगाडे यांच्याकडे दाद मागितली. २००६ त्यावेळी तहसीलदारांनी रस्ता करुन दिला होता. त्यानंतर एंचिलवार यांनी २००८ मध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केली. हा रस्ता १४ शेतकऱ्यांच्या शेतीवर जाण्याचा असल्याने रस्ता देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, एंचिलवार यांनी २०१४ मध्ये पुन्हा रस्ता अडविला. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार कल्याण डहाट यांनी, मामलेदार कायद्यानुसार रस्ता वहिवाटीसाठी मोकळा करून दिला. एंचिलवार यांनी या प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केली. मंगळवारला या प्रकरणाची तारीख असल्याने हे दोन्ही शेतकरी कार्यालयात पोहोचले असता मामलेदार कायद्यानुसार निर्णय झाला असल्याचे सांगून एंचिलवार यांची अपील फेटाळून लावली. हा निर्णय मान्य न झाल्याने जितेंद्र एंचिलवार याने माझ्या लहान भावाला व्हरांड्यात मारहाण केली. त्याला मारहाणीतून सोडवून भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दरम्यान हरिचंद्रचा मुलगा जितेंद्रने २०१४ मध्ये धनराजचे वडील कवडू यांच्यावर याच वादातून कुऱ्हाडीने हल्ला वार केले होते. याप्रकरणी जितेंद्रविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि ३२४, ३२६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. एंचिलवार कुटुंबाकडून माझ्या परिवाराला धोका असून प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही चिंतनवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. (शहर प्रतिनिधी)