शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तक्रारकर्त्या महिलांविरोधात केला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:50 IST

वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.

ठळक मुद्देगोबरवाही येथील महावितरण विभागाचा प्रकार : तीन महिन्यांपासून जीवंत विद्युत तारा लोंबकळतच

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.तालुक्यातील गोबरवाही येथील रेल्वे क्रॉसींग नजिक रेणुका लेकचंद मोहनकर यांची ४२ आर शेती आहे. शेतातच त्यांचे राहते घरही आहे. घरात एकूण १० व्यक्ती राहतात. त्या १० व्यक्तींमध्ये सात महिला आहेत. त्यांच्या शेतात एक रोहित्र व सहा खांब आहेत. ११ फेब्रुवारी २०१८ ला वादळासह जोरदार पाऊस पडल्यामुळे डिपीवरुन विद्युत तारांचे कनेक्शन तुटले. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयात रितसर लेखी तक्रारीची नोंदणीही तक्रार नोंदणी रजिस्टरवर केली होती. दरम्यान पाच दिवसानंतर विद्युत विभागाचे टवाळखोर कर्मचारी तिथे गेले असता त्यांनी व तिथे राहणाऱ्या मुलींची छेड काढली. त्यांना खडेबोल सुनावित वारंवार तुम्ही तक्रारी करता असे म्हणून ते निघून गेलेत. उलट विद्युत अभियंता यांनी तिथे राहणाºया रेणुका मोहनकर, मिनाक्षी मोहनकर, सिमा मोहनकर व हिरा मोहनकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी भादंवी ३५३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.दरम्यान घटनेसंबंधीची माहिती लोकप्रतिनिधीनांही देण्यात आली. परंतु अद्यापर्यंत कर्मचाºयांवरील कारवाईचे तर सोडाच ते पडलेले विद्युत तारही जोडण्यात न आल्याने तिथे जिवीत हानी होण्याची महावितरण विभाग वाट तर बघत नसावे ना? असा संतप्त सवाल पिडितांनी लोकमतशी बोलतांनी सांगितले.या घटनेसंदर्भात गोबरवाही येथील सहायक अभियंता अरविंदकुमार पंधरे यांची प्रतिक्रीया घेण्याकरिता दुरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.महावितरण विभागातील कर्मचाºयांनी आपले दृष्कर्म लपविण्यासाठी पोलिसांत खोटी तक्रार केली आहे. याबाबद उर्जामंत्र्यांनाही दोनदा निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापही विद्युत तारांची जोडणी झाली नाही, याला काय म्हणावे.- सुनिता मोहनकरजिल्हाध्यक्षा, क्रांतीदल सेना, तुमसर