शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

तक्रारकर्त्या महिलांविरोधात केला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:50 IST

वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.

ठळक मुद्देगोबरवाही येथील महावितरण विभागाचा प्रकार : तीन महिन्यांपासून जीवंत विद्युत तारा लोंबकळतच

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.तालुक्यातील गोबरवाही येथील रेल्वे क्रॉसींग नजिक रेणुका लेकचंद मोहनकर यांची ४२ आर शेती आहे. शेतातच त्यांचे राहते घरही आहे. घरात एकूण १० व्यक्ती राहतात. त्या १० व्यक्तींमध्ये सात महिला आहेत. त्यांच्या शेतात एक रोहित्र व सहा खांब आहेत. ११ फेब्रुवारी २०१८ ला वादळासह जोरदार पाऊस पडल्यामुळे डिपीवरुन विद्युत तारांचे कनेक्शन तुटले. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयात रितसर लेखी तक्रारीची नोंदणीही तक्रार नोंदणी रजिस्टरवर केली होती. दरम्यान पाच दिवसानंतर विद्युत विभागाचे टवाळखोर कर्मचारी तिथे गेले असता त्यांनी व तिथे राहणाऱ्या मुलींची छेड काढली. त्यांना खडेबोल सुनावित वारंवार तुम्ही तक्रारी करता असे म्हणून ते निघून गेलेत. उलट विद्युत अभियंता यांनी तिथे राहणाºया रेणुका मोहनकर, मिनाक्षी मोहनकर, सिमा मोहनकर व हिरा मोहनकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी भादंवी ३५३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.दरम्यान घटनेसंबंधीची माहिती लोकप्रतिनिधीनांही देण्यात आली. परंतु अद्यापर्यंत कर्मचाºयांवरील कारवाईचे तर सोडाच ते पडलेले विद्युत तारही जोडण्यात न आल्याने तिथे जिवीत हानी होण्याची महावितरण विभाग वाट तर बघत नसावे ना? असा संतप्त सवाल पिडितांनी लोकमतशी बोलतांनी सांगितले.या घटनेसंदर्भात गोबरवाही येथील सहायक अभियंता अरविंदकुमार पंधरे यांची प्रतिक्रीया घेण्याकरिता दुरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.महावितरण विभागातील कर्मचाºयांनी आपले दृष्कर्म लपविण्यासाठी पोलिसांत खोटी तक्रार केली आहे. याबाबद उर्जामंत्र्यांनाही दोनदा निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापही विद्युत तारांची जोडणी झाली नाही, याला काय म्हणावे.- सुनिता मोहनकरजिल्हाध्यक्षा, क्रांतीदल सेना, तुमसर