शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

तक्रारकर्त्या महिलांविरोधात केला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:50 IST

वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.

ठळक मुद्देगोबरवाही येथील महावितरण विभागाचा प्रकार : तीन महिन्यांपासून जीवंत विद्युत तारा लोंबकळतच

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.तालुक्यातील गोबरवाही येथील रेल्वे क्रॉसींग नजिक रेणुका लेकचंद मोहनकर यांची ४२ आर शेती आहे. शेतातच त्यांचे राहते घरही आहे. घरात एकूण १० व्यक्ती राहतात. त्या १० व्यक्तींमध्ये सात महिला आहेत. त्यांच्या शेतात एक रोहित्र व सहा खांब आहेत. ११ फेब्रुवारी २०१८ ला वादळासह जोरदार पाऊस पडल्यामुळे डिपीवरुन विद्युत तारांचे कनेक्शन तुटले. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयात रितसर लेखी तक्रारीची नोंदणीही तक्रार नोंदणी रजिस्टरवर केली होती. दरम्यान पाच दिवसानंतर विद्युत विभागाचे टवाळखोर कर्मचारी तिथे गेले असता त्यांनी व तिथे राहणाऱ्या मुलींची छेड काढली. त्यांना खडेबोल सुनावित वारंवार तुम्ही तक्रारी करता असे म्हणून ते निघून गेलेत. उलट विद्युत अभियंता यांनी तिथे राहणाºया रेणुका मोहनकर, मिनाक्षी मोहनकर, सिमा मोहनकर व हिरा मोहनकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी भादंवी ३५३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.दरम्यान घटनेसंबंधीची माहिती लोकप्रतिनिधीनांही देण्यात आली. परंतु अद्यापर्यंत कर्मचाºयांवरील कारवाईचे तर सोडाच ते पडलेले विद्युत तारही जोडण्यात न आल्याने तिथे जिवीत हानी होण्याची महावितरण विभाग वाट तर बघत नसावे ना? असा संतप्त सवाल पिडितांनी लोकमतशी बोलतांनी सांगितले.या घटनेसंदर्भात गोबरवाही येथील सहायक अभियंता अरविंदकुमार पंधरे यांची प्रतिक्रीया घेण्याकरिता दुरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.महावितरण विभागातील कर्मचाºयांनी आपले दृष्कर्म लपविण्यासाठी पोलिसांत खोटी तक्रार केली आहे. याबाबद उर्जामंत्र्यांनाही दोनदा निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापही विद्युत तारांची जोडणी झाली नाही, याला काय म्हणावे.- सुनिता मोहनकरजिल्हाध्यक्षा, क्रांतीदल सेना, तुमसर