शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जातीयवादी मानसिकतेचे निर्मूलन झाले पाहिजे

By admin | Updated: November 8, 2014 22:33 IST

महाराष्ट्रात दलितांच्या हत्याकांडाची संख्या सारखी वाढत चालली आहे. पोलीस तपासातील आणि न्याय प्रक्रियेतील विलंबामुळे व अनिश्चितेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात अविश्वासात व नैराश्य वाढत चालले आहे.

भंडारा : महाराष्ट्रात दलितांच्या हत्याकांडाची संख्या सारखी वाढत चालली आहे. पोलीस तपासातील आणि न्याय प्रक्रियेतील विलंबामुळे व अनिश्चितेमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात अविश्वासात व नैराश्य वाढत चालले आहे. खरे तर अशा अमानुष हत्याकांडांना जबाबदार असलेल्या जातीयवादी मानसिकतेचे पूर्ण निर्मूलन करण्याची गरज आहे. अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील विविध पुरोगामी संस्था-संघटनांच्यातर्फे करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड दलित हत्याकांडांचा तीव्र धिक्कार करणारी एक निषेधसभा भंडारा येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात आली होती. माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या निषेध सभेत भंडारा जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक सांस्कृतिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जवखेड दलित हत्याकांडाचा जळजळीत निषेध व्यक्त केला.या निषेध सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी या राजकीय पक्षांसह युगसंवाद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, युगदर्पण, ब्ल्यू पँथर ग्रुप, वैनाकाठ फाऊंडेशन इत्यादी सामाजिक-सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी समाजातील दलितविरोधी मानसिकेतेचा तीव्र धिक्कार केला. यावेळी सुभंत रहाटे यांनी शासनाने आपले दलितविरोधी अध्यादेश परत घेण्याची मागणी केली. अमृत बन्सोड यांनी महाराष्ट्रातील दलित शक्तीच्या विघटनामुळेच दलितविरोधी मानसिकता बळावत चालल्याचे समाजवास्तव म ांडले. दलितांच्या अमानुष हत्याकांडाच्या प्रसंगी केवळ निषेध नोंदवून शांत बसण्यापेक्षा समाजातील सर्व घटकांनी सनदशीर मार्गाने प्रखर प्रतिकार केला पाहिजे, असे मत महेंद्र गडकरी यांनी मांडले. या निषेध सभेत सी.एम. बागडे, डॉ.सुरेश खोब्रागडे, हर्षल मेश्राम, यशवंत वैद्य, सदानंद इलमे, हिवराज उके, विष्णू लोणारे, हाजी सलाम, असित बागडे, गुलशन गजभिये, निर्मला गोस्वामी या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सर्व उपस्थितांच्या वतीने निषेधाचा ठराव प्रमोदकुमार अणेराव यांनी मांडला. निषेध सभेचे संचालन प्रा.विनोद मेश्राम यांनी तर समारोप डॉ.अनिल नितनवरे यांनी केला. यावेळी विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)