शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

स्तुत्य प्रयत्न;  वृक्षारोपण करूनच बोहल्यावर चढला नवरदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 07:00 IST

Bhandara News लाखांदूर तालुक्यातील एका युवकाने आपल्या लग्नाच्यादिवशी लग्नमंडपात जाण्याआधी वृक्षारोपण करून आपलं लग्न संस्मरणीय करण्याचा स्तुत्य प्रयत्न करून आपल्या कृतीतून सर्वांना पर्यावरण संरक्षणाच्या संदेश दिला.

भंडारा : आपलं लग्न संस्मरणीय व्हावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. किंबहुना बरेचजण आपले लग्न स्मरणीय करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत असतात. त्यासाठी काही धनाढ्य लोक हवेत लग्न करतात, कुणी पाण्याच्या खाली लग्न करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील एका युवकाने आपल्या लग्नाच्यादिवशी लग्नमंडपात जाण्याआधी वृक्षारोपण करून आपलं लग्न संस्मरणीय करण्याचा स्तुत्य प्रयत्न करून आपल्या कृतीतून सर्वांना पर्यावरण संरक्षणाच्या संदेश दिला.

गुरुदेव यशवंतराव ठाकरे (रा. इटान) असे या नवरदेवाचे नाव आहे. एकीकडे शासन "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणेंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी विशेष भर घालत असूनही अलीकडे अनेकांना पर्यावरण संरक्षणाचा विसर पडत चालला आहे. मात्र, याला काही अपवादही आहेत. इटान येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक म्हणून कार्यरत असलेल्या गुरुदेव यशवंतराव ठाकरे यांचा शीतल सुरेश अलोने (रा. सावंगी, ता. देसाईगंज) हिच्यासोबत ६ फेब्रुवारी रोजी लग्न सोहळा पार पडला. गुरूदेवने स्वतःच्या लग्न समारंभदिनी लग्नमंडपात जाण्याआधी वृक्षारोपण करून आपलं लग्न संस्मरणीय करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. या युवकाने प्रत्यक्ष कृतीतून सर्वांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला . सर्वांनी आदर्श घेण्यासारखे कृत्य करणाऱ्या या नवरदेवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

             गावाची परंपरा जोपासली

यापूर्वी येथील उपसरपंच गिरीश भागडकार यांनीसुद्धा २०१८ मध्ये आपल्या लग्नाआधी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला होता. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून संगणक परिचालक गुरूदेवनेही आपल्या लग्नाआधी वृक्षारोपण करून लग्न मंडपात प्रस्थान केले.

टॅग्स :Socialसामाजिक