शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या उद्धारासाठी एकत्र या

By admin | Updated: August 25, 2016 00:33 IST

ज्या कुटुंबामध्ये चार ते पाच व्यक्ती शासकीय सेवेत आहेत, त्यांच्या कुटुंबातील शासकीय सेवेतील व्यक्ती कमी करून ज्यांच्या कुटुंबात काही व्यक्ती शासकीय सेवेत नाही, ...

मातंग समाजाचा मेळावा : चंद्रकात वानखेडे यांचे आवाहनभंडारा : ज्या कुटुंबामध्ये चार ते पाच व्यक्ती शासकीय सेवेत आहेत, त्यांच्या कुटुंबातील शासकीय सेवेतील व्यक्ती कमी करून ज्यांच्या कुटुंबात काही व्यक्ती शासकीय सेवेत नाही, त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतल्यास त्या कुटुंबाचा उद्धार होईल. त्यांच्या येणाऱ्या पिढीचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दर्जा वाढेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक चंद्रकांत वानखेडे यांनी केले.विदर्भ लहुजी सेना शाखा भंडाराच्या येथील संत तुकाराम सभागृहात मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.उद्घाटन खासदार नाना पटोले यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार रामचंद्र अवसरे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हरिष मोरे, विदर्भ लहुजी सेनेचे विदर्भ अध्यक्ष मेजर खंडारे, भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, प्रसिद्ध उद्योजक सुनील मेंढे, नगरसेवक सुर्यकांत इलमे, भाजपा अनु. जाती जमाती कोर कमिटीचे अध्यक्ष लहानुजी इंगळे, विदर्भ लहुजी सेना भंडाराचे अध्यक्ष रमेश गायकवाड, उपाध्यक्ष विठ्ठल हिवराळे, सचिव किशोर तेलंगे, उपकोषाध्यक्ष प्रकाश बावने, सल्लागार प्रदीप बावने आदी उपस्थित होते.खासदार नाना पटोले यांनी मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे आवाहन केले. लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी समाजाला उद्देशून म्हणाले की, मातंग समाज हा पुर्वीपासून पराक्र मी व हुशार होता. परंतु, स्वत:ची प्रगती करू शकला नाही. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपला व समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगिकारा. आतापर्यत समाजबांधवांनी समाजासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. हे सहकार्य भविष्यातही मिळावे, असे आवाहन केले. खा. पटोले व आ. अवसरे यांनी मातंग समाजाकरीता जास्तीत जास्त सवलती उपलब्ध करून शासकीय सेवेत समाविष्ठ करण्याकरीता सहकार्य करण्याचे तसेच लहुजी साळवे यांचा पुतळा, समाजाकरीता समाज मंदिर शासकीय जागेत मंजूर करून देण्याची विनंती केली. यावेळी आ. रामचंद्र अवसरे, हरिष मोरे, मेजर खंडारे, चंद्रशेखर रोकडे, सुर्यकांत इलमे, सुनील मेंढे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी खा. नाना पटोले यांनी लहुजी साळवे यांचा पुतळा, समाजाकरीता समाज मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्र मादरम्यान, खा. पटोले यांच्या हस्ते मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन दाढी यांनी केले. प्रास्तविक प्रकाश बावने यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठलराव हिवराळे यांनी केले. यावेळी विदर्भ लहुजी सेनेचे अनिता हिरवाळे, मिरा खडसे, चित्रा तेलंगे, कल्पना गायकवाड, मंगल बावने, लहूजी जाधव व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)