शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आत्मसन्मान व मूलभूत गरजांच्या लढ्यात पुढे या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:40 IST

खायला अन्न नसेल व अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा भागत नसतील तर अस्मिता व आत्मसन्मानाचे काय करणार. तसेच या सोयी ज्यांना मिळत असतील व आत्मसन्मान नसेल तरीही याचा फायदा काय.

ठळक मुद्देजिग्णेश मेवानी : बुद्ध जयंती कार्यक्रमात केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खायला अन्न नसेल व अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा भागत नसतील तर अस्मिता व आत्मसन्मानाचे काय करणार. तसेच या सोयी ज्यांना मिळत असतील व आत्मसन्मान नसेल तरीही याचा फायदा काय. करिता जाती अंत व समानतेच्या लढ्यात आपले मूलभूत प्रश्न एकत्रित करून आत्मसन्मान व मूलभूत गरजांच्या लढ्यात आंबेडकरी युवकांनी पुढे यावे, असे प्रतिपादन गुजरातचे अपक्ष आमदार व दलित चळवळीचे तरूण नेते जिग्नेश मेवानी यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व रिपब्लिकन युथ फेडरेशन यांच्या संयुक्तवतीने बुद्ध जयंतीनिमित्त भीमनगर येथील बौद्धविहाराच्या मैदानात मंगळवारी (दि.२९) आयोजीत सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी विचारवंत रमेश जीवने, संजय भास्कर, अमित भालेराव, मिलिंद गणवीर, सतीष बंसोड, सुनील आवळे, अनील सुखदेवे, निलेश देशभ्रतार, निलेश कांबळे उपस्थित होते. पुढे बोलताना मेवानी यांनी, दलीत हक्कांकरिता व अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविणारे तरूण तुरूंगात पाठविले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारने चळवळीचे तरूण कार्यकर्ते चंद्रशेखर राव यांना रासुका अंतर्गत तुरूंगात डांबून ठेवले असून त्यांना आजाद करण्याचा लढा करा असे सांगीतले.याप्रसंगी जीवने यांनी, बौद्ध धम्माचा लग्न कायदा बनविण्याच्या मागणी संदर्भात महाराष्ट्रात निर्णय घेण्याची चुकीची परंपरा सुरू आहे. जे लोक बौद्ध विवाह कायदा सांगतात ते बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमासाठी देवा रूसे, सुशिल ठवरे, श्याम चौरे, लक्ष्मीकांत डहाटे, राजेश भोयर, रंजीत बंसोड, अरविंद नागदेवे, सुर्यकांत डोंगरे, स्वप्नील नंदागवळी, वेदांत गजभिये, नरेश मेश्राम, निशांत भालेराव, फिरोज कुरेशी, विक्रम भालेराव, अमोल नकाशे, बंटी डोंगरे, संजय चौरे, प्रशांत डोंगरे, ज्ञानीराम फरकुंडे, सुरेंद्र खोब्रागडे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.