शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सर्दी, खोकला होताच उभा राहतोय नागरिकांच्या अंगावर काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:25 IST

कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाची धास्ती वातावरणातील बदलाने संसर्गजन्य आजारात वाढ

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वातावरणातील बदलाने अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसह तापाची लक्षणे जाणवत आहे. कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे. दवाखान्यात जावे तर कोरोना तपासणीची धास्ती आणि नाही जावे तर प्रकृती आणखी खालावते काय, याची चिंता.

भंडारा जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार ७३६ वर शनिवारी पोहचला होता. तर ८० जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. अशातच वातावरणातील बदलाने विषाणूजन्य आजारांची लागण झाली आहे. तसेही दरवर्षी या महिन्यात सर्दी, ताप, खोकला होताच. त्यावर रुग्णालयात जावून उपचारही केला जातो. परंतु यावर्षी स्थिती वेगळी आहे. साध्या शिंका यायला सुरूवात झाली तर मनात नाना शंका घर करून बसतात. सर्दी आणि खोकला झाला तर भीतीत भर पडते आणि ताप आला तर कुठेतरी आपण कोणाच्या संपर्कात तर आलो नाही ना याचा दहादा विचार सुरू होतो. याचे कारण म्हणजे सध्या कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव होय.

याच कारणाने अनेक जण अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला झाला तरी अंगावरच काढत आहे. एकीकडे सोशल मीडियातून कोरोनावर नीट उपचार होत नसल्याची ओरडच आहे. खासगी रुग्णालयात जावे तर अनेक डॉक्टरांचे दार बंद असते. विनंती केल्यानंतर तपासणी करायची म्हटले तरी आधी कोरोना टेस्टचा आग्रह केला जातो. हे सर्व माहित असतानाही नियमांचे पालन मात्र कुणी करताना दिसत नाही. मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले आहे. प्रशासनाने दंडाची तरतूद केली आहे. त्यानंतरही अनेक जण मास्कशिवाय फिरताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यासाठी माझे कुटुंब सुरक्षित कुटुंब मोहीम राबविली जात आहे. यासोबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्हा रुग्णालयासह कोविड केअर सेंटरला भेट देवून तेथील पाहणी केली. प्रशासन गांभीर्याने कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र त्याला तडे देताना दिसत आहे. जिल्ह्यात गावागावांत जनता कर्फ्यू आयोजित करूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत कुठे घट होताना दिसतस नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नागरिक बिनधास्तपणे आजही फिरताना दिसून येतात.वैद्यकीय उपचार महत्वाचेकोणत्याही आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. अलिकडे अनेक जण दुखणे अंगावर काढताना दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य साथ निर्माण झाली आहे. भंडारा शहरात आलेल्या पुरामुळेही अनेक जण आजारी पडले आहेत. अशा स्थितीत रुग्णांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच आजाराची लक्षणे दिसतातच तपासणी करणे महत्वाचे आहे. यासोबतच पुरेशी झोप, दैनंदिन योग प्राणायम, गरम पाणी प्राशन, बाहेरचे खाणे टाळणे, फल आहार वाढविणे आणि कुटुंबात आनंदी राहणे आवश्यक असल्याचे येथील साई क्लिनिकचे डॉ. दिलीप गुरीपुंजे यांनी सांगितले आहे. मनात कोणतीही शंका आली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणालेघरगुती उपचारावरच भरविषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते. परंतु शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे जाण्यासाठी अनेक जण टाळतात. तर खाजगी रुग्णालयात डॉक्टर प्रतिसाद देत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळेच आता अनेक जण घरच्या घरीच उपचार करताना दिसतात. विविध वनस्पतींचा काढा, हळदीयुक्त दूध, निंबू पाणी, मिठाच्या पाण्याच्या गोळ्या, अद्रकाचा चहा घेण्यावर नागरिकांचा भर आहे. घरातील एक जण आजारी पडला की दुसराही आजारी पडतो. त्यामुळे कोरोनाची धास्ती वाढत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लक्षणांना न घाबरता थेट डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार करण्याची खरी गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस