शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

कोका अभयारण्यातील वनतलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:32 IST

यंदाच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. हिवाळा जेमतेम सुरु झाला असतांनाच कोका अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांची भटकंती : वन्यजीव व मानव यांचा संघर्ष वाढणार, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : यंदाच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. हिवाळा जेमतेम सुरु झाला असतांनाच कोका अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र, दहा किमी परिसरातील उंच दऱ्याखोऱ्यातून जलसंचय होणारा सोनकुंड वनतलाव कोरडा झाला. तर राजडोह तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय झाला असून वन्यजीवांची भटकंती सुरू झाली आहे. यातून मानव आणि वन्यप्राणी यांचा संर्घष होण्याची भीती आहे.कोका वन्यजीव अभयारण्याची निर्मिती सन २०१३ मध्ये करण्यात आली. त्यामुळे वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळाला. परिणामी जंगलात वन्यजीवांची संख्या झपाट्याने वाढली. सोयीसुविधा उभारण्यावर व पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला.यावर्षी अत्यल्प पावसामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष पराकोटीला पोहचण्याचा अंदाज आहे. अभयारण्यातील महत्वपूर्ण वनतलावांत, बोड्यात, नाल्यांत पाण्याचा ठणठाणाट आहे. जानेवारी २०१९ पर्यंतही पुरेल एवढे पाणी तलावांत दिसून येत नाही. अभयारण्यातील बहुतेक मोठ्या तलावांची हीच अवस्था आहे. मागील वर्षी साकोली ते पालोरा राज्यमार्गालगत असलेल्या सोनकुंड वनतलावांचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. लाखोंचा खर्च यावर करण्यात आला. मात्र, खोलीकरण झालेल्या भागातही पावसाचे पाणी साठविलेले नाही. या तलावात जंगलटेकडींच्या दहा किमी परिसरातील पाण्याचा जलसंचय होत असतांनाही भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय असून वनधिकाऱ्यांनी आतापासूनच त्यावर उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.अभयारण्याच्या बफरझोनमध्ये वन्यजीवांमुळे भीतीचे वातावरण आहे. मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाळीव प्राण्यांचा फडसा व मनुष्यहाणीला सुध्दा सामोरे जावे लागत आहे. नागरीक सायंकाळी दहशतीत जीवन जगण्यास मजबूर आहेत. आता तर पाण्याच्या शोधात व्याकूळ वन्यजिव गावकुसात शिरण्याची भीती आहे. त्यातून नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. यासाठी उपाय योजण्याची गरज आहे. तसेच नागरिकांना दिलेले रोजगार निर्मितीचे व अन्य सोयीसुविधांचे आश्वासन पुर्ण करण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरल्याची बोंब गावागावात आहे.शेतकऱ्यांपुढे भीषण दुष्काळाचे संकटगत दोन वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचा सामना जिल्ह्याला करावा लागत आहे. यावर्षीही शेतकऱ्यांसमोर भीषण दुष्काळाचे संकट आहे. शेतकºयांनी केलेली मेहनत मातीज गेली. एका पाण्याचे हजारो एकर शेतीचे धानाचे पीक वाळले. पेरणी, नागरटी, खत, किटकनाशके, मंजुरीचा पैसा शेतकऱ्यांच्या माथ्यावर बसला. परंतू अजूनही शासन-प्रशासनाने नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे व मदतीचे आदेश दिलेले नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या नावाने विविध योजनांची घोषणा करीत असला तरी जमिनीवरील परिस्थिती वेगळीच आहे. कर्जमाफी, पीकविता या बाबीच आता शेतकºयांना जाचक वाटू लागल्या आहेत.

टॅग्स :forestजंगल