शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

रेतीचे अवैध उत्खनन बंद करा

By admin | Updated: October 18, 2014 22:59 IST

जिल्हा प्रशासनाने रेतीचे अवैध उत्खननप्रकरणी सक्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी, बेटाळानजीकच्या वैनगंगा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याचा थेट फटका रस्ता तसेच

भंडारा : जिल्हा प्रशासनाने रेतीचे अवैध उत्खननप्रकरणी सक्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी, बेटाळानजीकच्या वैनगंगा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याचा थेट फटका रस्ता तसेच धानपिकाला बसत आहे. रेतीचे अवैध उत्खनन बंद करण्याची मागणी बेटाळा येथील मुरलीधर शेंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.बेटाळा गावालगत वैनगंगा नदीच्या पात्रातील रेतीचा उपसा जोमात सुरू असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. त्या रस्त्याने दिवस-रात्र १५० ट्रॅक्टर जवळपास १०० ट्रक व दोन जेसीबी जात असतात. रहदारीच्या रस्त्याने बैलबंडी व पायदळ जाणाऱ्यांसाठी तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये धानपिक उभे आहे. या पिकांवर रस्त्यावरची धूळ बसत आहे. परिणामी पिकाची हानी होत आहे. रेतीच्या प्रचंड उपसामुळे विहिरीची पातळी खालावली आहे. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. रेतीघाटाच्या रॉयल्टीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. परंतु रेतीचा उपसा अद्यापही निरंतर सुरू आहे. शेतकऱ्यांनी रेतीची वाहतूक होवू नये यासाठी ट्रक अडविले असता त्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.यासंबंधी अनेकदा पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदने देण्यात आली. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, खनिकर्म विभागाचे मुख्य आयुक्त, उपविभागीय अधिकारी तुमसर यांना दिले आहे. (नगर प्रतिनिधी)