शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

चांदोरी-शिंगोरी रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:37 IST

तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देनाल्यावर पुलाची मागणी : विद्यार्थ्यांसह अनेकांना होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गत पाच दिवसांपासून भंडारा तालुक्यात संततधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे शिंगोरी-चांदोरी दरम्यान असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या मार्गावरुन दवडीपार, पचखेडी, चांदोरी, शिंगोरी येथील नागरिकांना आवागमन करण्यास अडचणीचे ठरत आहे. चांदोरी येथील नागरिकांना भंडारा येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग चांदोरी-शिंगोरी मार्ग आहे. भंडारा, लाखनी, दवडीपार, तिरोडा असे मार्ग येथून जात असून गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यासंबंधी चांदोरी-शिंगोरी रस्त्यावरील नाल्यावर पुल बांधकामाची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांनी केली होती. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. दरवर्षी या पुलावर अनेक जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही या मार्गावर पुल बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत तर नाही ना, असा सवाल चांदोरी परिसरातील नागरिकांनी केला आहे.या मार्गावरून अनेक लोकप्रतिनिधी ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रशासन व लोकप्रतिनिधींशी नेहमीच नाल्यावर पुल बांधकामाची मागणी करीत असतात. मात्र त्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. चांदोरी, पचखेडी, दवडीपार येथील बहुतांश विद्यार्थी भंडारा, लाखनी येथे शिक्षणासाठी जात असतात. नाल्यावर पाणी वाहत असल्याने त्यांना शाळेत जाता येत नाही. पुलावर पाणी असल्याने तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना पोहचता येत नाही. परिणामी आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकार व राज्य शासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगत असले तरी याला चांदोरी नजीकचा नाला अपवाद ठरत आहे.अनेक वर्षांपासून पुलाची मागणी धूळखातलाखनी, भंडारा मार्गावर असलेल्या शिंगोरी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या चांदोरी गावानजीक एक मोठा नाला आहे. दरवर्षी या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. दमदार पावसाची हजेरी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी नाल्याद्वारे वैनगंगा नदीला पोहचते. या नाल्यावर दरवर्षी बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. जीवीतहानीसह प्राणहानी होत असली तरी पुल बांधकामासाठी कुणीच पुढाकार घेत नसल्याने पुल बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे. भंडारा तालुका काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी उन्हाळ्यात पुल बांधकामाची मागणी प्रशासनाकडे केली होती. असे असतानाही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनावरचा विश्वास उडाल्याचा संताप परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन आता तरी पुल बांधकामासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.