शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी-शिंगोरी रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:37 IST

तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देनाल्यावर पुलाची मागणी : विद्यार्थ्यांसह अनेकांना होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गत पाच दिवसांपासून भंडारा तालुक्यात संततधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे शिंगोरी-चांदोरी दरम्यान असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या मार्गावरुन दवडीपार, पचखेडी, चांदोरी, शिंगोरी येथील नागरिकांना आवागमन करण्यास अडचणीचे ठरत आहे. चांदोरी येथील नागरिकांना भंडारा येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग चांदोरी-शिंगोरी मार्ग आहे. भंडारा, लाखनी, दवडीपार, तिरोडा असे मार्ग येथून जात असून गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यासंबंधी चांदोरी-शिंगोरी रस्त्यावरील नाल्यावर पुल बांधकामाची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांनी केली होती. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. दरवर्षी या पुलावर अनेक जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही या मार्गावर पुल बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत तर नाही ना, असा सवाल चांदोरी परिसरातील नागरिकांनी केला आहे.या मार्गावरून अनेक लोकप्रतिनिधी ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रशासन व लोकप्रतिनिधींशी नेहमीच नाल्यावर पुल बांधकामाची मागणी करीत असतात. मात्र त्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. चांदोरी, पचखेडी, दवडीपार येथील बहुतांश विद्यार्थी भंडारा, लाखनी येथे शिक्षणासाठी जात असतात. नाल्यावर पाणी वाहत असल्याने त्यांना शाळेत जाता येत नाही. पुलावर पाणी असल्याने तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना पोहचता येत नाही. परिणामी आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकार व राज्य शासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगत असले तरी याला चांदोरी नजीकचा नाला अपवाद ठरत आहे.अनेक वर्षांपासून पुलाची मागणी धूळखातलाखनी, भंडारा मार्गावर असलेल्या शिंगोरी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या चांदोरी गावानजीक एक मोठा नाला आहे. दरवर्षी या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. दमदार पावसाची हजेरी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी नाल्याद्वारे वैनगंगा नदीला पोहचते. या नाल्यावर दरवर्षी बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. जीवीतहानीसह प्राणहानी होत असली तरी पुल बांधकामासाठी कुणीच पुढाकार घेत नसल्याने पुल बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे. भंडारा तालुका काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी उन्हाळ्यात पुल बांधकामाची मागणी प्रशासनाकडे केली होती. असे असतानाही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनावरचा विश्वास उडाल्याचा संताप परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन आता तरी पुल बांधकामासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.