शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:04 IST

शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत.

ठळक मुद्देउपेक्षा कायम : वर्षाकाठी मिळतोय लक्षावधींचा महसूल

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला भाजीपाला, ओट्यांची दुरवस्था, अतिक्रमण हीच खरी या बाजाराची ओळख ठरली आहे. प्रशासन मात्र प्रस्तावाच्या मंजुरीवर लक्ष केंद्रित करून आहे.जिल्ह्याचीे लोकसंख्या १५ लाखांच्या वर पोहोचली आहे. यात भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे. दर आठवड्यातून दोन वेळा आठवडी बाजार भरतो. रविवारी मोठा तर बुधवारी मिनी बाजार भरतो. रविवारपेक्षा बुधवारी भाजी विक्रेत्यांची संख्या कमी असते. या बाजारारत टाकळी, पांढराबोडी, गणेशपूर, कारधा, भिलेवाडा, पलाडी, करचखेडा, सुरेवाडा, माडगी, सातोना, मोहदुरा, खोकरला, टेकपार, भोजापूर आदी गावातील लहान-मोठे भाजीविक्रेते येत असतात. लोकसंख्येच्या मानाने शहराच्या विविध ठिकाणीही बाजार भरतो. यात महात्मा गांधी चौक, बीटीबी मार्केट मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक मार्ग, खात रोड मार्ग आदी ठिकाणचा समावेश आहे. प्रविवारी व बुधवारी भरणाऱ्या बाजाराची शान आजही कमी झालेली नाही. मात्र सुविधांअभावी या बाजाराला अजुनही उठाव आलेला नाही.हजारो नागरिक येथे बाजारासाठी येत असले तरी विकासाअभावी त्यांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेचे स्वच्छता कर्मचारी अहोरात्र राबतात, पण अस्वच्छता करणाऱ्यांची कमी नाही. याला सर्वस्वी जबाबदार नगर पालिक प्रशासन आहे, असेही म्हणता येणार नाही. याला नागरिकांसह भाजीविक्रेत्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे. योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार? हाच खरा प्रश्न आहे. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती व पालिका प्रशासन यामध्ये बाजार ओटा संदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. परिणामी बाजार विकासासाठी निर्णय होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.अशा आहेत प्रमुख समस्याआठवडी बाजार ओसरल्यानंतर सडलेला भाजीपाला साहित्य तिथेच फेकून दिला जातो. कर देतोय तर सुविधा का मिळत नाही, असा थेट सवाल भाजीविक्रेत्यांचा आहे. आठवडी बाजाराचा कंत्राट कुणालाही असो मात्र लिलावातून मिळणारी रक्कम थेथ पालिका प्रशासनालाच मिळते. सडक्या भाजीपाल्यांवर यथेच्छ ताव मारणारे मोकाट जनावरे, अतिक्रमण निर्मूलनानंतर वाईट स्थितीत आलेले बाजारओटे, २४ तास येणारी दुर्गंधी, पाण्याची टंचाई, नाल्यांचे सदोष बांधकाम, साचलेला कचरा या बाजाराच्या प्रमुख समस्या आहेत.बाजाराच्या विकासासंदर्भात पालिका प्रयत्नशिल आहे. सर्वप्रथम मटण बाजारासाठी जवळपास ५० लक्ष रूपयांचा प्रस्ताव सादर केलेला आहे.-नितीन धकाते, सभापती,स्वच्छता समिती, नगर परिषद भंडारा