शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गावाची स्वच्छता ग्रामस्थांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:26 IST

गावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही.

ठळक मुद्देअनिता तेलंग : अड्याळ येथे महिला मेळावा, लाभले मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतअड्याळ : गावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही. दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वत:चे दोष दूर करणे आवश्यक असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी अनिता तेलंग यांनी व्यक्त केले.ग्रामपंचायत अड्याळ कार्यालयातर्फे एकदिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी तेलंग बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर तर अतिथी म्हणून चकारा येथील सरपंच हेमलता ढवळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, तारा कुंभलकर, मुख्याध्यापिका मंगला आदे , जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील समुपदेशक प्राजक्ता पेठे, शुभांगी पवार, सुमन मुनिश्वर, विस्तार अधिकारी आर.एच. पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रभाकर लेपसे ग्रामपंचायतील महिला सदस्यगण मंचकावर उपस्थित होते.या कार्यक्रमात महिलांना व ग्रामस्थांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. दरवर्षी होणाºया महिला मेळाव्यापेक्षा यावर्षी मात्र या कार्यक्रमासाठी वेगळीच कल्पना समोर आली ती म्हणजे या मेळाव्यात आलेल्या महिलांची नावे वॉर्ड नंबर निहाय नोंदणीकृत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला ग्रामस्थांना भेटवस्तू दरवर्षी देण्यात येते.यावेळी मात्र हजारोच्या संख्येने उपस्थिती असल्याने कार्यक्रम शांततेत पार पडावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित नाव नोंदणी केल्या असलेल्या महिला ग्रामस्थांच्या घरोघरी ही भेटवस्तू पाठवणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते.यामुळे या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर काही नाराजही झाले. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीत एकही गालबोट तथा कार्यक्रमाची शांतता भंग झाली नसल्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे यांनी केले. अड्याळ व परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांचा या मेळाव्यात सहभाग होता.ग्रामपंचायत कार्यालय अड्याळतर्फे आयोजित महिला मेळाव्यात उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे व महिला ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी अड्याळ व परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी नाटक, नृत्य, स्वच्छता अभियान पर नाट्य कला सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. यात जिल्हा परिषद शाळा ते विद्यालयातील लहान मोठ्या विद्यार्थीनींनी कला सादर करून सर्वांची मने जिंकली.लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केला गेला असल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर यांनी सांगितले. या सांस्कृतीक कार्यक्रमामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले. या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी यांनी सहकार्य केले.