शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

गावाची स्वच्छता ग्रामस्थांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:26 IST

गावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही.

ठळक मुद्देअनिता तेलंग : अड्याळ येथे महिला मेळावा, लाभले मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतअड्याळ : गावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही. दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वत:चे दोष दूर करणे आवश्यक असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी अनिता तेलंग यांनी व्यक्त केले.ग्रामपंचायत अड्याळ कार्यालयातर्फे एकदिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी तेलंग बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर तर अतिथी म्हणून चकारा येथील सरपंच हेमलता ढवळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, तारा कुंभलकर, मुख्याध्यापिका मंगला आदे , जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील समुपदेशक प्राजक्ता पेठे, शुभांगी पवार, सुमन मुनिश्वर, विस्तार अधिकारी आर.एच. पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रभाकर लेपसे ग्रामपंचायतील महिला सदस्यगण मंचकावर उपस्थित होते.या कार्यक्रमात महिलांना व ग्रामस्थांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. दरवर्षी होणाºया महिला मेळाव्यापेक्षा यावर्षी मात्र या कार्यक्रमासाठी वेगळीच कल्पना समोर आली ती म्हणजे या मेळाव्यात आलेल्या महिलांची नावे वॉर्ड नंबर निहाय नोंदणीकृत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला ग्रामस्थांना भेटवस्तू दरवर्षी देण्यात येते.यावेळी मात्र हजारोच्या संख्येने उपस्थिती असल्याने कार्यक्रम शांततेत पार पडावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित नाव नोंदणी केल्या असलेल्या महिला ग्रामस्थांच्या घरोघरी ही भेटवस्तू पाठवणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते.यामुळे या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर काही नाराजही झाले. परंतु एवढ्या मोठ्या गर्दीत एकही गालबोट तथा कार्यक्रमाची शांतता भंग झाली नसल्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे यांनी केले. अड्याळ व परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांचा या मेळाव्यात सहभाग होता.ग्रामपंचायत कार्यालय अड्याळतर्फे आयोजित महिला मेळाव्यात उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे व महिला ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी अड्याळ व परिसरातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी नाटक, नृत्य, स्वच्छता अभियान पर नाट्य कला सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. यात जिल्हा परिषद शाळा ते विद्यालयातील लहान मोठ्या विद्यार्थीनींनी कला सादर करून सर्वांची मने जिंकली.लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केला गेला असल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथील सरपंच जयश्री कुंभलकर यांनी सांगितले. या सांस्कृतीक कार्यक्रमामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले. या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी यांनी सहकार्य केले.