शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता यात्रा ठरली सवांदाचे माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:03 IST

घरासमोर घाण नसावी हे प्रत्येकाला वाटते. पण दुसऱ्याच्या घरासमोर किंवा परिसरात आपणच घाण पसरवतो याचा विसर पडताना दिसते. स्वच्छता मोहीम ही सार्वजनिक व्हावी व प्रत्येकाने जबाबदारी समजून या मोहिमेत सहभाग घ्यावा म्हणून आमदार चरण वाघमारे यांनी स्वच्छता संवाद यात्रेचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्दे१५० कि.मी.चा प्रवास : चरण वाघमारे यांचा पुढाकार, मोहाडी-तुमसर तालुक्यात उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : घरासमोर घाण नसावी हे प्रत्येकाला वाटते. पण दुसऱ्याच्या घरासमोर किंवा परिसरात आपणच घाण पसरवतो याचा विसर पडताना दिसते. स्वच्छता मोहीम ही सार्वजनिक व्हावी व प्रत्येकाने जबाबदारी समजून या मोहिमेत सहभाग घ्यावा म्हणून आमदार चरण वाघमारे यांनी स्वच्छता संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. २ आॅक्टोबर पासून सुरु झालेल्या या मोहिमेत ७० च्यावर गावात जाऊन हि मोहीम लोकात पोहचवली असून यासाठी त्यांनी जवळपास १५० किमीचा प्रवास पायी केला आहे.रविवारी स्वच्छता संवाद पदयात्रेचे वरठी येथे आगमन झाले. सकाळी १० वाजे पासून दुपारी १ वाजेपर्यंत वरठी येथे हि पदयात्रा फिरत होती. यावेळी आमदार चरण वाघमारे, माजी सरपंच निरंजना साठवणे, पंचायत समिती सदस्य पुष्पां भुरे, मोहाडी पंचायत समितीच्या सभापती निशा बांडेबुचे, माजी उपसभापती विलास गोबाडे, माजी सभापती हरिश्चंद्र बंधाटे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, ग्राम पंचायत सदस्य संदीप बोन्द्रे, शुभांगी येळणे, रवी लांजेवार, श्वेता नारनवरे, सुजाता भाजीपाले, वंदना वंजारी, बाबू ठवकर, अनिल राऊत, एकनाथ बांगरे, घनश्याम बोन्द्रे, अश्विन वासनिक व विद्या भिवगडे उपस्थित होते. दुपारनंतर यात्रा आपल्या पुढील प्रवासाला निघाली. दरम्यान यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह जोमात दिसला. वरठीचा एक एक भागात हि संवाद यात्रा फिरली व स्वच्छतेचे संदेश व प्रत्येक्ष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.स्वच्छता ही संकल्पना माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जुडून आहे. स्वत:चे घराबरोबर परिसर स्वच्छ असल्याखेरीज माणसाचे आरोग्य सदृढ राहू शकत नाही. प्रत्येक मनुष्य हा वयक्तिक स्वच्छेतेवर लक्ष ठेवून असतो. पण या भानगडीत परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पासून स्वच्छता संवाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. दर रविवारी मोहाडी व तुमसर तालुक्यात हि मोहीम राबवण्यात येणार आहे. आज वरठी जिल्हा परिषद क्षेत्रातील वरठी, एकलारी, बोथली-पांजरा, मोहगाव, दहेगाव, बेटाळा, रोहा इत्यादी गावात ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी आमदार चरण वाघमारे हे स्वत: हातात झाडू आणि स्वच्छता मोहीम याबद्दल माहिती देणारे पत्र घेऊन फिरत होते. गावातील कचरा व घाण झाडून काढून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसले. स्वच्छता हि सवार्ना पाहिजे पण यासाठी पुढाकार घेणाºयाची खरी गरज आहे.स्वच्छता संवाद यात्रा हे जागरूकतेची प्रभावी माध्यम असून संवादाचे शस्त्र असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान