शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

स्वच्छता यात्रा ठरली सवांदाचे माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:03 IST

घरासमोर घाण नसावी हे प्रत्येकाला वाटते. पण दुसऱ्याच्या घरासमोर किंवा परिसरात आपणच घाण पसरवतो याचा विसर पडताना दिसते. स्वच्छता मोहीम ही सार्वजनिक व्हावी व प्रत्येकाने जबाबदारी समजून या मोहिमेत सहभाग घ्यावा म्हणून आमदार चरण वाघमारे यांनी स्वच्छता संवाद यात्रेचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्दे१५० कि.मी.चा प्रवास : चरण वाघमारे यांचा पुढाकार, मोहाडी-तुमसर तालुक्यात उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : घरासमोर घाण नसावी हे प्रत्येकाला वाटते. पण दुसऱ्याच्या घरासमोर किंवा परिसरात आपणच घाण पसरवतो याचा विसर पडताना दिसते. स्वच्छता मोहीम ही सार्वजनिक व्हावी व प्रत्येकाने जबाबदारी समजून या मोहिमेत सहभाग घ्यावा म्हणून आमदार चरण वाघमारे यांनी स्वच्छता संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. २ आॅक्टोबर पासून सुरु झालेल्या या मोहिमेत ७० च्यावर गावात जाऊन हि मोहीम लोकात पोहचवली असून यासाठी त्यांनी जवळपास १५० किमीचा प्रवास पायी केला आहे.रविवारी स्वच्छता संवाद पदयात्रेचे वरठी येथे आगमन झाले. सकाळी १० वाजे पासून दुपारी १ वाजेपर्यंत वरठी येथे हि पदयात्रा फिरत होती. यावेळी आमदार चरण वाघमारे, माजी सरपंच निरंजना साठवणे, पंचायत समिती सदस्य पुष्पां भुरे, मोहाडी पंचायत समितीच्या सभापती निशा बांडेबुचे, माजी उपसभापती विलास गोबाडे, माजी सभापती हरिश्चंद्र बंधाटे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, ग्राम पंचायत सदस्य संदीप बोन्द्रे, शुभांगी येळणे, रवी लांजेवार, श्वेता नारनवरे, सुजाता भाजीपाले, वंदना वंजारी, बाबू ठवकर, अनिल राऊत, एकनाथ बांगरे, घनश्याम बोन्द्रे, अश्विन वासनिक व विद्या भिवगडे उपस्थित होते. दुपारनंतर यात्रा आपल्या पुढील प्रवासाला निघाली. दरम्यान यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह जोमात दिसला. वरठीचा एक एक भागात हि संवाद यात्रा फिरली व स्वच्छतेचे संदेश व प्रत्येक्ष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.स्वच्छता ही संकल्पना माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जुडून आहे. स्वत:चे घराबरोबर परिसर स्वच्छ असल्याखेरीज माणसाचे आरोग्य सदृढ राहू शकत नाही. प्रत्येक मनुष्य हा वयक्तिक स्वच्छेतेवर लक्ष ठेवून असतो. पण या भानगडीत परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पासून स्वच्छता संवाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. दर रविवारी मोहाडी व तुमसर तालुक्यात हि मोहीम राबवण्यात येणार आहे. आज वरठी जिल्हा परिषद क्षेत्रातील वरठी, एकलारी, बोथली-पांजरा, मोहगाव, दहेगाव, बेटाळा, रोहा इत्यादी गावात ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी आमदार चरण वाघमारे हे स्वत: हातात झाडू आणि स्वच्छता मोहीम याबद्दल माहिती देणारे पत्र घेऊन फिरत होते. गावातील कचरा व घाण झाडून काढून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसले. स्वच्छता हि सवार्ना पाहिजे पण यासाठी पुढाकार घेणाºयाची खरी गरज आहे.स्वच्छता संवाद यात्रा हे जागरूकतेची प्रभावी माध्यम असून संवादाचे शस्त्र असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान