शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यास शासनाकडून ...

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुकास्तरावर विशेष शिबिरांच्या माध्यमातून शिक्षकांचे लसीकरण केले जात आहे. यासोबतच ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी पालकांकडून परवानगी घेणेसुद्धा बंधनकारक राहील. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून त्यामध्ये सदस्य म्हणून तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही बहुतांश ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीत नाहीत. तसेच अनेक ग्रामपंचायतीचे ठरावच झालेले नाहीत. ठराव नसल्याने शिक्षण विभागाची दुविधा वाढली आहे.

बॉक्स

अशी राहणार व्यवस्था

▪️ एका बाकावर एकच विद्यार्थी

▪️ दोन बाकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर

▪️ एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थ्यांची उपस्थिती

▪️ सतत साबणाने हात धुणे

▪️ मास्कचा वापर

▪️ कोणती लक्षणे आढळताच विद्यार्थ्याला त्वरित घरी पाठवून त्याची चाचणी करून घेणे.

बॉक्स

पालकांना नसणार परवानगी

शाळा सुरू करण्यापूर्वी किमान एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आलेला नसावा, शंभर टक्के लसीकरण या प्रमुख अटी असल्या तरी गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळा प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. ज्या शाळेत एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ती शाळा तत्काळ बंद करण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत.

कोट

मुरमाडी (तुपकर), शिवनी (मोगरा) ग्रामपंचायतीचे ठराव आलेले आहेत. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीचे ठराव आलेले नाहीत. सायंकाळपर्यंत किती ग्रामपंचायतीचे ठराव येतात हे बघणार आहोत. त्यामुळे प्रत्यक्षात किती शाळा सुरू होणार हे १५ जुलैलाच माहीत होईल.

- सुभाष बावनकुळे, गटशिक्षणाधिकारी, लाखनी