शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

येदरबुची येथे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:21 IST

अतिथी देवो भवं असे म्हटले जाते, परंतु दुष्काळात तीव्र पाणीटंचाईच्या रौद्र रुपाने नातेवाईकांनी गावात मागील तीन वर्षापासून येणे बंद केले आहे. गावाच्या मुलींनी माहेराकडे पाठ फिरविल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. पाणीटंचाईमुळे नाते तुटलेले गाव अशी ओळख व प्रसिद्धी तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल येदरबुचीला मिळत आहे.

ठळक मुद्देव्यथा गावाची : सलग तीन वर्षापासून पाणीटंचाई, प्रशासनाच्या योजना तोकड्या

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अतिथी देवो भवं असे म्हटले जाते, परंतु दुष्काळात तीव्र पाणीटंचाईच्या रौद्र रुपाने नातेवाईकांनी गावात मागील तीन वर्षापासून येणे बंद केले आहे. गावाच्या मुलींनी माहेराकडे पाठ फिरविल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. पाणीटंचाईमुळे नाते तुटलेले गाव अशी ओळख व प्रसिद्धी तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल येदरबुचीला मिळत आहे. आदिवासी बांधवांच्या विकासाकरिता शासन घसा कोरडा होतपर्यंत कटीबद्ध असल्याचे सांगते. परंतु वास्तविक परिस्थिती मोठी भयानक असल्याने गावाला भेट दिल्यानंतर प्रत्यय येतो.तुमसर तालुक्यातील येदरबुची हे गाव १०० टक्के आदिवासी बहुल आहे. गावाची लोकसंख्या १२०० इतकी आहे.या गावात मागील तीन वर्षापासून दुष्काळसदृष्य स्थिती असून तीव्र पाणीटंचाई सुरु आहे. गावापासून एक ते दीड किमी अंतरावरील शेतशिवारातील विहिरीतून पहाटे तीन पासून पाण्याकरिता महिला पुरुष पाण्याकरिता पायपीट करताना दिसतात.गावाशेजारी आंतरराज्यीय बावनथडी धरण आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावाला ३० हजार लिटरचा जलकुंभ बांधण्यात आला. मात्र तो आठवड्यातून केवळ एकदाच केवळ १५ हजार लिटरच भरला जातो. दैनंदिन गरज या पाण्याने कशी भागणार याकरिता ग्रामस्थ शेतशिवाराकडे पाण्यासाठी धाव घेताना येथे दिसतात. पहाटे ३ पासून ग्रामस्थांच्या रांगा विहिरीवर लागत आहेत.विहिरीतील गढूळ पाण्याने तृष्णा भागवावी लागत असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल टेकाम यांनी केली.प्रशासनाच्या नियोजनाअभावी येदरबुी ग्रामस्थांना त्याचा मोठा फटका बसत आहे. गावातील इतर विहिरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. केवळ एका विहिरीवर हे गाव सध्या तहान भागवित आहेत. पाणी मिळविणे येथे मोठे अग्नीदिव्य ठरत आहे. धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती येथे दिसत आहे.पाणीटंचाईमुळे नातलगांनी फिरविली पाठयेदरबुची येथे मागील तीन ते चार वर्षापासून तीव्र पाणी टंचाई आहे. येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नातेवाईकांनी या गावाकडे पाठ फिरविली आहे. मागील तीन वर्षापासून येदरबुची येथे पाहुणेमंडळी येत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. येथील महिला राजलिला टेकाम, भीमाबाई कुंभारे यांनी मोठ्या जळजळीत प्रतिक्रिया दिल्या. गावातील मुली माहेरी येत नाही, तर येथील बहिणीकडे भाऊ व बहिणी दुष्काळामुळे आमच्या गावाला येत नाही.प्रशासनाचे तेच उत्तरयेदरबुची येथील पाणीटंचाईबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही. ग्रामस्थांबरोबर जनावरेही गढूळ पाणी पीत आहेत. पाण्याअभावी घरकुलांचे बांधकाम येथे थांबले आहे. येथील स्थानिक प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवणार असल्याचे ठराविक उत्तरे देत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई