शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

भंडाऱ्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:38 IST

हाकेच्या अंतरावर मुबलक पाणी असतानाही भंडारेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. रविवारी शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालाच नाही. परिणामी नागरिकांना मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागले.

ठळक मुद्देरविवारी पाणीपुरवठा ठप्प : जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ, ठिकठिकाणी होतोय टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाकेच्या अंतरावर मुबलक पाणी असतानाही भंडारेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. रविवारी शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालाच नाही. परिणामी नागरिकांना मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागले.भंडाºयाची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी भंडारा नगरपालिका प्रशासनाची आहे. भविष्यकालीन वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु झाली असली तरी त्यात आम्हाला वेग यायचा आहे. नवीन योजना कार्यान्वीत व्हायला दोन वर्षांचा तरी कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत मात्र भंडारेकरांना दूषित व अल्प पाणीपुरवठा होत आहे. पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते. मात्र ते नियोजनही ढासळल्याचे दिसून येते.उन्हाळ्याची चाहूल लागताच भंडारा शहरातही पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले होते. उल्लेखनीय म्हणजे नळाचे पाणी दूषित येत असल्यामुळे बहुतांश नागरिकांनी आरोचे पाणी पिणे सुरु केले आहे. गरीबांची मात्र चांगलीच फजीती होताना दिसून येते. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यात सपेशल प्रशासन फेल ठरले आहे.अड्याळमध्ये शुद्ध पाण्यासाठी भटकंतीअड्याळ येथे सर्वात जुनी व ज्वलंत समस्या ही पाण्याची ठरत आहे. गावात शुद्ध पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु असून दररोज विकत घेऊन पाणी प्यायचे काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारीत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अड्याळ ग्रामस्थांना नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा दूषित आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन महिन्यांपासून लाखो लक्ष रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी घालण्याची कामे होत आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार व अड्याळवासीयांना कधी शुद्ध पाणी प्यायला मिळणार असा प्रश्न अड्याळवासी करीत आहेत. याचा सर्वात जास्त फटका महिला वर्गाला सहन करावा लागत आहे. नाईलाजास्तव नागरिकांना आरोचे पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात शुद्ध पाण्याचा एक आरो सुद्धा काही महिन्यापूर्वी लावला होता. म्हणजेच नळातून शुद्ध पाणी मिळत नाही हे याचे उदाहरण म्हणावे लागेल.

टॅग्स :Waterपाणी