शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

भंडाऱ्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:38 IST

हाकेच्या अंतरावर मुबलक पाणी असतानाही भंडारेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. रविवारी शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालाच नाही. परिणामी नागरिकांना मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागले.

ठळक मुद्देरविवारी पाणीपुरवठा ठप्प : जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ, ठिकठिकाणी होतोय टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाकेच्या अंतरावर मुबलक पाणी असतानाही भंडारेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. रविवारी शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालाच नाही. परिणामी नागरिकांना मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागले.भंडाºयाची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी भंडारा नगरपालिका प्रशासनाची आहे. भविष्यकालीन वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु झाली असली तरी त्यात आम्हाला वेग यायचा आहे. नवीन योजना कार्यान्वीत व्हायला दोन वर्षांचा तरी कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत मात्र भंडारेकरांना दूषित व अल्प पाणीपुरवठा होत आहे. पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते. मात्र ते नियोजनही ढासळल्याचे दिसून येते.उन्हाळ्याची चाहूल लागताच भंडारा शहरातही पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले होते. उल्लेखनीय म्हणजे नळाचे पाणी दूषित येत असल्यामुळे बहुतांश नागरिकांनी आरोचे पाणी पिणे सुरु केले आहे. गरीबांची मात्र चांगलीच फजीती होताना दिसून येते. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यात सपेशल प्रशासन फेल ठरले आहे.अड्याळमध्ये शुद्ध पाण्यासाठी भटकंतीअड्याळ येथे सर्वात जुनी व ज्वलंत समस्या ही पाण्याची ठरत आहे. गावात शुद्ध पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु असून दररोज विकत घेऊन पाणी प्यायचे काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारीत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अड्याळ ग्रामस्थांना नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा दूषित आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन महिन्यांपासून लाखो लक्ष रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी घालण्याची कामे होत आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार व अड्याळवासीयांना कधी शुद्ध पाणी प्यायला मिळणार असा प्रश्न अड्याळवासी करीत आहेत. याचा सर्वात जास्त फटका महिला वर्गाला सहन करावा लागत आहे. नाईलाजास्तव नागरिकांना आरोचे पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात शुद्ध पाण्याचा एक आरो सुद्धा काही महिन्यापूर्वी लावला होता. म्हणजेच नळातून शुद्ध पाणी मिळत नाही हे याचे उदाहरण म्हणावे लागेल.

टॅग्स :Waterपाणी