शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

नागरिकांनी संविधानातील हक्काबाबत जागरूक बनावे!

By admin | Updated: February 1, 2017 00:23 IST

राजकारणी संविधानाचे नाव घेतात. पण अंमलबजावणी व पालन करत नाहीत. प्रशासनात संविधान रुजविणे गरजेचे आहे.

ई. झेड. खोब्रागडे : १६ वे राष्ट्रीय संविधान प्रबोधन साहित्य संमेलन, बहुजन प्रबोधन मंचचे आयोजनलाखांदूर : राजकारणी संविधानाचे नाव घेतात. पण अंमलबजावणी व पालन करत नाहीत. प्रशासनात संविधान रुजविणे गरजेचे आहे. संविधानातील हक्कासोबत नागरिकांनी कर्तव्याप्रती जागरूक बनून अवलंब करावा, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरच्या वतीने लाखांदूर येथे संविधान, धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक बहुसंख्यांक - अल्पसंख्यांक आणि आरक्षण या विषयावर १६ वे राष्ट्रीय संविधान प्रबोधन साहित्य संमेलन पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस, ई. झेड. खोब्रागडे, रझिया सुलतान, डॉ. सुनिल कुमार सुमन, नागेश चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सबनीस यांनी, संविधानावर साहित्य संमेलन प्रथमच बघत असल्याचे सांगितले. संविधान धर्मनिरपेक्ष आहे, परंतु संविधान राबविणारे धर्मनिरपेक्ष नाहीत, असे प्रतिपादन केले. नागेश चौधरी यांनी, देशात राजसत्ता, धर्मसत्ता, संस्कृतीसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता ज्यांच्या हाती आहे ते संविधानाचा आदर करतात का हा प्रश्न निर्माण होतो. संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली असती तर देशाचे चित्र वेगळे राहिले असते. नागरिकांनी संविधानाप्रती जागृत होवून संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यास राजकारण्यांना भाग पाडावे, असे प्रतिपादन केले. सुनिलकुमार सुमन यांनी, संविधान एस.सी.एस.टी., ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्यांकाची ताकद आहे. तर उच्चवर्गीयांची कमजोरी आहे. ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्यांचे आरक्षण पूर्ण भरले गेले नाही. आरक्षण बंद करण्याचे विचार पेरले जात आहेत. म्हणून सर्व आरक्षण भगीनी एकत्र येऊन आरक्षण विरोधकांचे मनसुबे संविधानिक मार्गाने उधळून लावले पाहिजे असे प्रतिपादन केले. तर रझिया सुलतान यांनी, मुस्लिम समाजाला संविधान समजावून सांगणे गरजेचे आहे. मुस्लिमांनी ध्यानात घ्यावे की, माणसाला माणूस बनण्याचे शिक्षण भारताचे संविधान देते. म्हणून मुस्लिमांनी संविधान वाचून समजून घ्यावे, असे प्रतिपादन केले.संमेलनाचे आयोजक अनिल कानेकर यांनी प्रास्ताविकातून संविधान प्रबोधन साहित्य संमेलन आयोजन करण्यामागची भूमिका तसेच यावर्षी चर्चेला ठेवलेल्या विषयाची भूमिका समजावून सांगितले.संमेलनात केशवराव घोडीचोर, डॉ. जगदीश बारसागडे, डॉ. सचिन घरडे, प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे, प्रा. डॉ. राकेश वासनिक, प्रा. डॉ. राकेश तलमले, प्रा. डॉ. विरेंद्र तुरकर, संविधान व स्मृतीचिन्ह पाहुण्यांच्या हस्ते देवून संमेलनाच्या आयोजकांनी सत्कार केला. संचालन प्रदीप भावे यांनी तर आभार उपरीकर यांनी मानले.द्वितीय सत्रातील कवी संमेलन हरिश्चंद्र लाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात हितेंद्र रामटेके, जयंत टेंभुर्णे, प्रा.अशोक डहाके, सपना भावे आणि इतर कविंनी महापुरुषांच्या जीवनावर वर्तमान सामाजिक परिस्थितीवर तसेच संविधानाचे गुणगाण करणाऱ्या कविता सादर करून श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या. संचालन अजय तिडके यांनी केले. तर आभार होमकांत उपरीकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)