शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

भंडाऱ्यातील नागरिकांना होतोय लोड शेडींगचा त्रास; ब्रेक डाऊनच्या नावाखाली भारनियमन केले जाते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:04 IST

उन्हाळ्यात जीव उकळून निघणार ? : शहरांसह ग्रामीण भागात विजेच्या मागणीत होतेय वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाचा तडाखा वाढला तसे वीजमीटर पळू लागले आहे. वाढत्या वीजवापरामुळे शहरांसह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून, घामाघूम होत आहेत.

पूर्वी हिवाळ्यात शेतीसाठी विजेच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे तीन ते चार महिने वीजटंचाई निर्माण होत असे. अलीकडच्या काळात मात्र बाराही महिने वीजसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या शेतीसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. तोही सुरळीत होत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड होत आहे. शहरी भागातही वीज समस्येला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. किमान या दिवसांत तरी महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी वीजग्राहकांतून होत आहे. वीजबिलापोटी थकबाकीचा डोंगरही वाढत असून वसुलीस अडचणी येत आहे. 

दिवसरात्र राहतात फॅन, एसी, कूलर फूल स्पीडवर !फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच प्रखर ऊन आणि वातावरणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे फॅन, एसीचा वापर वाढला असून, वीजमीटर पळू लागले आहे. अडगळीत पडलेले कूलरही आता दुरुस्तीसाठी काढण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ब्रेक डाऊनच्या नावाखाली भारनियमन केले जाते का?सध्या शहरात भारनियमन करण्यात येत नसले, तरी ग्रामीण भागात मात्र ब्रेकडाऊनच्या नावाखाली भारनियमन सुरू आहे. शेतीसाठी तर केवळ आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. अशा परिस्थितीत पिकांना पाणी कसे द्यावे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

तर तेथे जास्त भारनियमनविजेच्या मागणीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे वीजगळतीही वाढत आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत करणे महावितरणपुढे आव्हान ठरत आहे. त्यातच वीजचोरीचे प्रकारही सुरू असल्याने डोकेदुखी वाढली आहे

आता ही स्थिती तर पुढे काय?उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वीज समस्या गंभीर बनत चालली आहे. येणाऱ्या दिवसांत तर विजेच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना वीज समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

वाढते ऊन अन् वीजदर फोडतोय ग्राहकांचा घाममहिनाभरापासून प्रखर ऊन आणि वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा वातावरणाचा आबालवृद्धांना त्रास होत आहे. नागरिकांना फॅन, एसी, कूलरशिवाय घरात बसणेही शक्य होत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

८ तास कृषीपंपांना होतोय वीज पुरवठामार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यामुळे विजेवर आधारित उपकरणांचा वापर वाढला आहे. वीज पुरवठा खंडितने समस्या वाढली आहे. 

टॅग्स :electricityवीजbhandara-acभंडारा