शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
2
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
3
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
4
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
5
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
6
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
7
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
8
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
9
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
10
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
11
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
12
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
13
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
14
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
15
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
16
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
17
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
18
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
19
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
20
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?

भंडाऱ्यातील नागरिकांना होतोय लोड शेडींगचा त्रास; ब्रेक डाऊनच्या नावाखाली भारनियमन केले जाते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:04 IST

उन्हाळ्यात जीव उकळून निघणार ? : शहरांसह ग्रामीण भागात विजेच्या मागणीत होतेय वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाचा तडाखा वाढला तसे वीजमीटर पळू लागले आहे. वाढत्या वीजवापरामुळे शहरांसह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून, घामाघूम होत आहेत.

पूर्वी हिवाळ्यात शेतीसाठी विजेच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे तीन ते चार महिने वीजटंचाई निर्माण होत असे. अलीकडच्या काळात मात्र बाराही महिने वीजसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या शेतीसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. तोही सुरळीत होत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड होत आहे. शहरी भागातही वीज समस्येला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. किमान या दिवसांत तरी महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी वीजग्राहकांतून होत आहे. वीजबिलापोटी थकबाकीचा डोंगरही वाढत असून वसुलीस अडचणी येत आहे. 

दिवसरात्र राहतात फॅन, एसी, कूलर फूल स्पीडवर !फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच प्रखर ऊन आणि वातावरणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे फॅन, एसीचा वापर वाढला असून, वीजमीटर पळू लागले आहे. अडगळीत पडलेले कूलरही आता दुरुस्तीसाठी काढण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ब्रेक डाऊनच्या नावाखाली भारनियमन केले जाते का?सध्या शहरात भारनियमन करण्यात येत नसले, तरी ग्रामीण भागात मात्र ब्रेकडाऊनच्या नावाखाली भारनियमन सुरू आहे. शेतीसाठी तर केवळ आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. अशा परिस्थितीत पिकांना पाणी कसे द्यावे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

तर तेथे जास्त भारनियमनविजेच्या मागणीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे वीजगळतीही वाढत आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत करणे महावितरणपुढे आव्हान ठरत आहे. त्यातच वीजचोरीचे प्रकारही सुरू असल्याने डोकेदुखी वाढली आहे

आता ही स्थिती तर पुढे काय?उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वीज समस्या गंभीर बनत चालली आहे. येणाऱ्या दिवसांत तर विजेच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना वीज समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

वाढते ऊन अन् वीजदर फोडतोय ग्राहकांचा घाममहिनाभरापासून प्रखर ऊन आणि वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा वातावरणाचा आबालवृद्धांना त्रास होत आहे. नागरिकांना फॅन, एसी, कूलरशिवाय घरात बसणेही शक्य होत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

८ तास कृषीपंपांना होतोय वीज पुरवठामार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यामुळे विजेवर आधारित उपकरणांचा वापर वाढला आहे. वीज पुरवठा खंडितने समस्या वाढली आहे. 

टॅग्स :electricityवीजbhandara-acभंडारा