शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची उडविली तारांबळ

By admin | Updated: May 31, 2017 00:39 IST

रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होतो. नैऋत्य मौसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळत असल्याचा ....

उन्हाळी धानाचा शेतकरी घाबरला : शेतीकामाला मजूर टंचाई, वीज पुरवठा खंडित, पारा घसरलामुखरु बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होतो. नैऋत्य मौसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळत असल्याचा हवामान खात्याच्या अंदाजाने जिल्ह्यात सतत तीन दिवस पावसाने हजेरी लावली. यामुळे थोडा फार चढत्या पाऱ्याला ब्रेक आला असून शेती कामाला वेग आला आहे. मात्र मजूर टंचाईमुळे उन्हाळी धान उत्पादक प्रचंड घाबरला असून हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल होणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना खरीबाच्या तयारीत गुंतवित आहे. नर्सरी तयार करणे, बांध (धुरे) साफ करणे, झाडेझुडपे तोडणे, शेणखत शेतात टाकणे यासारखी कामे सुरु झाली आहेत. पावसावर सगळी शेतीची भिस्त असल्याने पावसाचा अंदाज घेऊनच शेतीकामे उरकविली जातात. असह्य उन्हाळ्यामुळे पाणी पातळी आटल्याने विहिर, बोअरवेल यांना पाणी नसल्याने कित्येक शेतकरी पऱ्हे घालायला घाई करणार नाही. वरुणराजाची कृपा झाल्याशिवाय जूनच्या पहिल्या आठवड्यानंतरच स्वतंत्र सिंचन साधनाचे शेतकरी पऱ्हे घालू शकण्याचा अंदाज आहे. हल्ली जिल्हाभर रोजगार हमी काम सुरु असल्याने शेती कामाला मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. शासनाने व प्रशासनाने वास्तविकतेचा अभ्यास करून रोजगार हमी योजना मार्फत आतापासूनच शेती कामे करण्याचा प्रयत्न करावा. लोकसहभागाच्या नावावर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या फसव्या प्रयत्नापेक्षा योजना कार्यान्वित आहे. तिला फक्त मोठे रुप देत शेतीला नवा आयाम देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायला मोठी मदत होईल.वादळवाऱ्यामुळे बांधाणातील धान जमीनदोस्त होत आहेत. धान कापणी यंत्र अशा धानावर काम करण्यास असमर्थ ठरत आहे. वीज खंडीतचे प्रमाण वाढले असून रात्रीला झोपमोड होत आहे. विजांच्या कडाडामुळे तांत्रिक बिघाड वाढत असल्याची प्रतिक्रिया महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. जग झपाट्याने बदलत. मात्र महावितरणचे नवीन बदल न आणल्याने थोडासाही वारा वादळ, पाऊस आला तरी हमखास वीज १-२ तासाकरिता खंडीत होते हे विशेष. महावितरणच्या कार्यप्रणालीवर नागरिकांमध्ये रोष आहे.