शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची उडविली तारांबळ

By admin | Updated: May 31, 2017 00:39 IST

रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होतो. नैऋत्य मौसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळत असल्याचा ....

उन्हाळी धानाचा शेतकरी घाबरला : शेतीकामाला मजूर टंचाई, वीज पुरवठा खंडित, पारा घसरलामुखरु बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होतो. नैऋत्य मौसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळत असल्याचा हवामान खात्याच्या अंदाजाने जिल्ह्यात सतत तीन दिवस पावसाने हजेरी लावली. यामुळे थोडा फार चढत्या पाऱ्याला ब्रेक आला असून शेती कामाला वेग आला आहे. मात्र मजूर टंचाईमुळे उन्हाळी धान उत्पादक प्रचंड घाबरला असून हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल होणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना खरीबाच्या तयारीत गुंतवित आहे. नर्सरी तयार करणे, बांध (धुरे) साफ करणे, झाडेझुडपे तोडणे, शेणखत शेतात टाकणे यासारखी कामे सुरु झाली आहेत. पावसावर सगळी शेतीची भिस्त असल्याने पावसाचा अंदाज घेऊनच शेतीकामे उरकविली जातात. असह्य उन्हाळ्यामुळे पाणी पातळी आटल्याने विहिर, बोअरवेल यांना पाणी नसल्याने कित्येक शेतकरी पऱ्हे घालायला घाई करणार नाही. वरुणराजाची कृपा झाल्याशिवाय जूनच्या पहिल्या आठवड्यानंतरच स्वतंत्र सिंचन साधनाचे शेतकरी पऱ्हे घालू शकण्याचा अंदाज आहे. हल्ली जिल्हाभर रोजगार हमी काम सुरु असल्याने शेती कामाला मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. शासनाने व प्रशासनाने वास्तविकतेचा अभ्यास करून रोजगार हमी योजना मार्फत आतापासूनच शेती कामे करण्याचा प्रयत्न करावा. लोकसहभागाच्या नावावर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या फसव्या प्रयत्नापेक्षा योजना कार्यान्वित आहे. तिला फक्त मोठे रुप देत शेतीला नवा आयाम देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायला मोठी मदत होईल.वादळवाऱ्यामुळे बांधाणातील धान जमीनदोस्त होत आहेत. धान कापणी यंत्र अशा धानावर काम करण्यास असमर्थ ठरत आहे. वीज खंडीतचे प्रमाण वाढले असून रात्रीला झोपमोड होत आहे. विजांच्या कडाडामुळे तांत्रिक बिघाड वाढत असल्याची प्रतिक्रिया महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. जग झपाट्याने बदलत. मात्र महावितरणचे नवीन बदल न आणल्याने थोडासाही वारा वादळ, पाऊस आला तरी हमखास वीज १-२ तासाकरिता खंडीत होते हे विशेष. महावितरणच्या कार्यप्रणालीवर नागरिकांमध्ये रोष आहे.