शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची उडविली तारांबळ

By admin | Updated: May 31, 2017 00:39 IST

रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होतो. नैऋत्य मौसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळत असल्याचा ....

उन्हाळी धानाचा शेतकरी घाबरला : शेतीकामाला मजूर टंचाई, वीज पुरवठा खंडित, पारा घसरलामुखरु बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होतो. नैऋत्य मौसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळत असल्याचा हवामान खात्याच्या अंदाजाने जिल्ह्यात सतत तीन दिवस पावसाने हजेरी लावली. यामुळे थोडा फार चढत्या पाऱ्याला ब्रेक आला असून शेती कामाला वेग आला आहे. मात्र मजूर टंचाईमुळे उन्हाळी धान उत्पादक प्रचंड घाबरला असून हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल होणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना खरीबाच्या तयारीत गुंतवित आहे. नर्सरी तयार करणे, बांध (धुरे) साफ करणे, झाडेझुडपे तोडणे, शेणखत शेतात टाकणे यासारखी कामे सुरु झाली आहेत. पावसावर सगळी शेतीची भिस्त असल्याने पावसाचा अंदाज घेऊनच शेतीकामे उरकविली जातात. असह्य उन्हाळ्यामुळे पाणी पातळी आटल्याने विहिर, बोअरवेल यांना पाणी नसल्याने कित्येक शेतकरी पऱ्हे घालायला घाई करणार नाही. वरुणराजाची कृपा झाल्याशिवाय जूनच्या पहिल्या आठवड्यानंतरच स्वतंत्र सिंचन साधनाचे शेतकरी पऱ्हे घालू शकण्याचा अंदाज आहे. हल्ली जिल्हाभर रोजगार हमी काम सुरु असल्याने शेती कामाला मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. शासनाने व प्रशासनाने वास्तविकतेचा अभ्यास करून रोजगार हमी योजना मार्फत आतापासूनच शेती कामे करण्याचा प्रयत्न करावा. लोकसहभागाच्या नावावर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या फसव्या प्रयत्नापेक्षा योजना कार्यान्वित आहे. तिला फक्त मोठे रुप देत शेतीला नवा आयाम देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायला मोठी मदत होईल.वादळवाऱ्यामुळे बांधाणातील धान जमीनदोस्त होत आहेत. धान कापणी यंत्र अशा धानावर काम करण्यास असमर्थ ठरत आहे. वीज खंडीतचे प्रमाण वाढले असून रात्रीला झोपमोड होत आहे. विजांच्या कडाडामुळे तांत्रिक बिघाड वाढत असल्याची प्रतिक्रिया महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. जग झपाट्याने बदलत. मात्र महावितरणचे नवीन बदल न आणल्याने थोडासाही वारा वादळ, पाऊस आला तरी हमखास वीज १-२ तासाकरिता खंडीत होते हे विशेष. महावितरणच्या कार्यप्रणालीवर नागरिकांमध्ये रोष आहे.