शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

निवड समिती अभावी रखडले प्रकरण

By admin | Updated: April 12, 2015 01:11 IST

राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची निवड समिती गठित झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

लाखनी : राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची निवड समिती गठित झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. तालुक्यात संजय गांधी निराधार योजना राबविण्यासाठी फक्त एक कर्मचारी कार्यरत आहे. एक नायब तहसिलदार व एका लिपीकांची गरज विशेष सहाय्य योजना राबविण्यासाठी आहे. संजय गांधी निराधार योजनेची २,९३९ लाभार्थी आहेत. अद्याप ३०० व्यक्ती लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांचे ८,८०९ लाभार्थ्यांना ६०० रुपये देण्यात येतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनांचे ५,४१० लाभार्थी आहेत यांना प्रत्येक महिन्याला ६०० रुपये देण्यात येतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे ३५ लाभार्थी आहेत. त्यांना २०० रुपये केंद्र शासनाकडून दिले जातात. इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्ती योजनेचे २५ लाभार्थी आहेत. आम आदमी विमा योजनेचे १०० लाभार्थी असून त्याना ७५ हजार ते ३५ हजार रुपयापर्यंतची मदत दिली जाणार आहे. राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेला कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास २० हजार रुपयाची मदत करित असते. दिनांक २० एप्रिल रोजी तालुक्यातील ४० लाभार्थ्यांना धनादेश देण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०१५ चे विशेष सहाय्य योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले आहे. मार्च महिण्याचे पैसे दिलेली नाही. प्रत्येक लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डबरोबर जोडायची मोहिम सुरु आहे. तसेच बोगस लाभार्थ्यांचा शोध घेणे सुरु आहे. मयत झालेल्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन खाते बंद करण्यात येत आहे. तालुक्यात तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे काम सांभाळण्यासाठी एक नायब तहसिलदार दोन लिपीकाची गरज आहे. तालुक्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे पालक निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. तलाठ्यांच्या माध्यमातून निराधार व विशेष आर्थिक सहाय्य योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेणे व बोगस लाभार्थ्यांनी लाभ नाकारणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)