शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पूर्व विदर्भातील चिन्नोर तांदूळ जाणार जागतिक बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:34 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध चिन्नोर तांदळाला लावकच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रपरिषदेत खासदार सुनील मेंढे आणि ईरीचे संचालक अरविंदकुमार यांनी दिली.

ठळक मुद्देईरीच्या शास्त्रज्ञांकडून पाहणीखासदारांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा -गोंदिया जिल्ह्यातील उच्च दर्जाचा तांदला खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर ओळखच मिळाली नाही. परिणामी पूर्व विदर्भातील भात उत्पादकांना पुरेपूर मोबदला मिळत नाही. हीबाब ओखळून खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारात आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राच्या (ईरी) पाच शास्त्रज्ञांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्याला भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रयत्नातून प्रसिद्ध चिन्नोर तांदळाला लावकच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रपरिषदेत खासदार सुनील मेंढे आणि ईरीचे संचालक अरविंदकुमार यांनी दिली.खासदार सुनील मेंढे म्हणाले, ईरीच्या पाच शास्त्रज्ञांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शनिवार व रविवारी अभ्यास दौरा केला. प्रमुख धान पिकासह अन्य बाबींची इंत्थभूत माहिती संकलीत करण्यात आली. यात तांत्रिकरित्या कोणते धान उत्कृष्ट आहे, अधिकाअधिक वापरण्यात येणाºया तांदळाच्या वाणाला विकसित कसे करता येईल, बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांना कसे अवगत करता येईल या विषयी या अभ्यास दौऱ्यात माहिती संकलीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.विशेषत: हलका, मध्यम व भारी धानाच्या वाणाबाबत माहिती घेत शेतकऱ्यांना कुठले वाण पिकविण्यास सोयीचे होईल तसेच चिन्नोर तांदळाबाबत त्यांचे मत काय ही बाबही जाणून घेण्यात आली. आगामी खरीप हंगामापासून चिन्नोर तांदळाचे उत्पादन दोनही जिल्ह्यात वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात ईरीची चमू सातत्याने शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करीत राहणार आहे. यावेळी वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्र (दक्षिण आशियाई विभाग) संचालक अरविंदकुमार यांच्यासह पाच शास्त्रज्ञ व भंडारा जिल्ह्यातील कृषीतज्ज्ञ आणि वरिष्ठ कृषी अधिकारी उपस्थित होते.चिन्नोरची जीआय चाचणीपूर्व विदर्भातील प्रख्यात तांदूळ म्हणजे चिन्नोर. या चिन्नोर तांदळाचे उत्पादन चांगले व्हावे, ब्रॅडिंग दर्जेदार व्हावी याअंतर्गत पहिल्या टप्प्यात चिन्नोर तांदळाची जीआय चाचणी केली जात आहे. प्रारंभी दोन अहवालानंतर त्याचा प्रस्ताव चेन्नईतील कार्यालयाला सादर करण्यात येणार असल्याचेही संचालक अरविंदकुमार यांनी सांगितले. क्षेत्रीय भेटीनंतर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी चिन्नोर तांदळाची लागवड करण्यास इच्छूक आहेत. येत्या जून महिन्यापासून या तांदळाची लागवड करण्याचा मानस असून जवळपास तीन वर्षात दोनही जिल्ह्यातून २५ हजार हेक्टरमध्ये चिन्नोरचे उत्पादन घेण्याचा मानस आहे. त्यानंतरच त्यावर प्रक्रियेच्या माध्यमातून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चिन्नोर तांदळाची छाप उमटणार असल्याचे अरविंदकुमार म्हणाले.

टॅग्स :agricultureशेती