शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

मिरचीचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:30 IST

९ ते १० रुपये किलो भावाने विकावे लागत असल्याने मिरची तोडण्याची मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. ...

९ ते १० रुपये किलो भावाने विकावे लागत असल्याने मिरची तोडण्याची मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. चौरास भाग म्हणून कोंढा परिसर तालुक्यात ओळखला जातो. परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी मोठया प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेत असतात ,त्यांना बऱ्यापैकी रुपये यामधून मिळतात . त्यावर त्यांचे कुटुंबातील लोकांचे उदरनिर्वाह चालते ,यावर्षी हिरव्या मिरचीला सुरुवातीस ६० ते ८० रुपये भाव मिळाले कधी कधी १०० रुपये प्रति किलो भाव मिळाले. मिरची घेण्यासाठी व्यापारी शेतावर येतात किंवा भंडारा येथील भाजीपाला मंडीमध्ये न्यावी लागत असते, तेथून मिरची दिल्ली , व इतर देशात निर्यात केली जाते, सध्या दिल्ली येथे शेतकऱ्याचे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्याचा चौरास भागातील मिरचीच्या भावावर याचा परिणाम झाला आहे,सध्या हिरवी मिरची ठोक ९ ते १० रुपये प्रति किलो या भावात व्यापारी घेत आहेत. दिल्ली किंवा परदेशात मिरची जात नसल्याने भाव पडले असे व्यापारी म्हणत असून माल घेऊन साठा करण्यास मागेपुढे पाहत आहेत, सध्या मिरची मुबंई मार्केटला पाठविली जात आहे. त्यामुळे भाव मिळत नसल्याची खंत आहे.याचा प्रभाव परिसरातील शेतकऱ्यावर पडला आहे, शेतीत मिरची तोडण्यासाठी १५० रुपये दररोज मजुरी मजुरांना दयावे लागते ते पैसे देखिल निघत नाही अशी खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत ,तेव्हा उदरनिर्वाह कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे ,कोंढा कोसरा परिसरात जवळपास २०० शेतकरी मिरची लागवड करणारे आहे, तेव्हा भाव गडगडल्याने काय करावे असा प्रश्न पडला आहे, तेव्हा या प्रश्नात केंद्र सरकारने व राज्य सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याची मागणी मिरची उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट बॉक्स

मिरची उत्पादन करणे माझे दरवर्षी असते ,यावर्षी भाव ९ रुपये प्रति किलो पर्यत पडल्याने शेतीतील माल काढण्यास जास्त मजुरी लागते, कुटूंब कसे चालवावे धनराज रेवतकर ,शेतकरी सोमनाळा