शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मिरचीचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:30 IST

९ ते १० रुपये किलो भावाने विकावे लागत असल्याने मिरची तोडण्याची मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. ...

९ ते १० रुपये किलो भावाने विकावे लागत असल्याने मिरची तोडण्याची मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. चौरास भाग म्हणून कोंढा परिसर तालुक्यात ओळखला जातो. परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी मोठया प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेत असतात ,त्यांना बऱ्यापैकी रुपये यामधून मिळतात . त्यावर त्यांचे कुटुंबातील लोकांचे उदरनिर्वाह चालते ,यावर्षी हिरव्या मिरचीला सुरुवातीस ६० ते ८० रुपये भाव मिळाले कधी कधी १०० रुपये प्रति किलो भाव मिळाले. मिरची घेण्यासाठी व्यापारी शेतावर येतात किंवा भंडारा येथील भाजीपाला मंडीमध्ये न्यावी लागत असते, तेथून मिरची दिल्ली , व इतर देशात निर्यात केली जाते, सध्या दिल्ली येथे शेतकऱ्याचे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्याचा चौरास भागातील मिरचीच्या भावावर याचा परिणाम झाला आहे,सध्या हिरवी मिरची ठोक ९ ते १० रुपये प्रति किलो या भावात व्यापारी घेत आहेत. दिल्ली किंवा परदेशात मिरची जात नसल्याने भाव पडले असे व्यापारी म्हणत असून माल घेऊन साठा करण्यास मागेपुढे पाहत आहेत, सध्या मिरची मुबंई मार्केटला पाठविली जात आहे. त्यामुळे भाव मिळत नसल्याची खंत आहे.याचा प्रभाव परिसरातील शेतकऱ्यावर पडला आहे, शेतीत मिरची तोडण्यासाठी १५० रुपये दररोज मजुरी मजुरांना दयावे लागते ते पैसे देखिल निघत नाही अशी खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत ,तेव्हा उदरनिर्वाह कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे ,कोंढा कोसरा परिसरात जवळपास २०० शेतकरी मिरची लागवड करणारे आहे, तेव्हा भाव गडगडल्याने काय करावे असा प्रश्न पडला आहे, तेव्हा या प्रश्नात केंद्र सरकारने व राज्य सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याची मागणी मिरची उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट बॉक्स

मिरची उत्पादन करणे माझे दरवर्षी असते ,यावर्षी भाव ९ रुपये प्रति किलो पर्यत पडल्याने शेतीतील माल काढण्यास जास्त मजुरी लागते, कुटूंब कसे चालवावे धनराज रेवतकर ,शेतकरी सोमनाळा