शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मिरचीचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:30 IST

९ ते १० रुपये किलो भावाने विकावे लागत असल्याने मिरची तोडण्याची मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. ...

९ ते १० रुपये किलो भावाने विकावे लागत असल्याने मिरची तोडण्याची मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. चौरास भाग म्हणून कोंढा परिसर तालुक्यात ओळखला जातो. परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी मोठया प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेत असतात ,त्यांना बऱ्यापैकी रुपये यामधून मिळतात . त्यावर त्यांचे कुटुंबातील लोकांचे उदरनिर्वाह चालते ,यावर्षी हिरव्या मिरचीला सुरुवातीस ६० ते ८० रुपये भाव मिळाले कधी कधी १०० रुपये प्रति किलो भाव मिळाले. मिरची घेण्यासाठी व्यापारी शेतावर येतात किंवा भंडारा येथील भाजीपाला मंडीमध्ये न्यावी लागत असते, तेथून मिरची दिल्ली , व इतर देशात निर्यात केली जाते, सध्या दिल्ली येथे शेतकऱ्याचे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्याचा चौरास भागातील मिरचीच्या भावावर याचा परिणाम झाला आहे,सध्या हिरवी मिरची ठोक ९ ते १० रुपये प्रति किलो या भावात व्यापारी घेत आहेत. दिल्ली किंवा परदेशात मिरची जात नसल्याने भाव पडले असे व्यापारी म्हणत असून माल घेऊन साठा करण्यास मागेपुढे पाहत आहेत, सध्या मिरची मुबंई मार्केटला पाठविली जात आहे. त्यामुळे भाव मिळत नसल्याची खंत आहे.याचा प्रभाव परिसरातील शेतकऱ्यावर पडला आहे, शेतीत मिरची तोडण्यासाठी १५० रुपये दररोज मजुरी मजुरांना दयावे लागते ते पैसे देखिल निघत नाही अशी खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत ,तेव्हा उदरनिर्वाह कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे ,कोंढा कोसरा परिसरात जवळपास २०० शेतकरी मिरची लागवड करणारे आहे, तेव्हा भाव गडगडल्याने काय करावे असा प्रश्न पडला आहे, तेव्हा या प्रश्नात केंद्र सरकारने व राज्य सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याची मागणी मिरची उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.

कोट बॉक्स

मिरची उत्पादन करणे माझे दरवर्षी असते ,यावर्षी भाव ९ रुपये प्रति किलो पर्यत पडल्याने शेतीतील माल काढण्यास जास्त मजुरी लागते, कुटूंब कसे चालवावे धनराज रेवतकर ,शेतकरी सोमनाळा