शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

मुख्यमंत्री गेले अन् संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखून धरला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 18:44 IST

२५ मिनिटे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत, चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ रवाना.

इंद्रपाल कटकवार

भंडारा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घ्यावे, या मागणीला घेऊन २७ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत आंदोलनाने आज वेगळेच वळण घेतले. शासन आपल्या दारी कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांचा निघून गेल्याचे कळताच संतप्त झालेल्या या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद चौकात महामार्ग रोखून धरला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची वाहतूक सुरू करण्याकरिता प्रचंड तारांबळ उडाली.

४:१४ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या रस्ता रोखो आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आरोग्य सेवेत कायम करावे या मुख्य मागणीला घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गत २७ दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. सोमवारी मुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. या निमित्ताने मुख्यमंत्री आमच्याशी दोन मिनिटे चर्चा करतील, अशी या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची आशा होती. मात्र ऐन वेळेवर मुख्यमंत्री तिथूनच निघून गेल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क महामार्ग रोखून धरला.

घोषणाबाजी देत शेकडो कर्मचारी रस्त्यावर बसल्याने नागपूर, रामटेक, साकोली व गणेशपुरहून आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जोपर्यंत मुख्यमंत्री येऊन स्वतः आमच्याशी चर्चा करीत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत- महामार्गावर वाहतुकीचा तणाव वाढत असतानाच रस्ता रोको आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह अन्य अधिकारी पोहोचले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणारे दिलीप उटाणे, अचल मेश्राम, हिवराज उके यांच्यासह कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली समजूत व शिष्टाई फळाला आली. नागपूर विमानतळावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळांची भेट घालून सकारात्मक तोडगा काढू, असे आश्वासन दिले. आंदोलनकर्त्यांनीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अवघ्या दोन मिनिटातच महामार्ग मोकळा केला. शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाला.

तीन मिनिटांचा झाला घोळ- शासन आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर जिल्हा परिषद चौकातूनच मुख्यमंत्र्यांचा ताफा शहापूर हेलिपॅडकडे रवाना होणार होता. यावेळी मुख्यमंत्री दोन मिनिट आमच्याशी संवाद साधतील, अशी भाबडी आशा आरोग्य कर्मचारी बाळगून होते. मात्र क्षणार्धातच मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथून निघून गेला. आंदोलनस्थळी बसलेल्या कर्मचाऱ्यांना याची पुसटशी कल्पनाही आली नाही. मुख्यमंत्री येत आहेत असेच त्यांना वाटले. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा निघून गेल्याचे कळताच संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. केवळ तीन मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या सगळ्या घडामोडीने जिल्हा प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. तीन मिनिटांपूर्वीच जर आंदोलनकर्ते रस्त्यावर आले असते तर त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच रोखून धरले असते.

गत पंधरा ते विस वर्षांपासून तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाजेष्ठतेनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाच्या मंजूर रिक्त पदांवर थेट सेवा समायोजन करण्याची गरज होती. बेमूदत कामबंद आंदोलनाच्या तेराव्या दिवशी मुंडण व काळे कपडे परिधान करून शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेधही केला होता. कोविड काळातील महामारीत आरोग्य विभागात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. २५ ऑक्टोबरपासून या अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचान्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले.

टॅग्स :bhandara-acभंडाराEknath Shindeएकनाथ शिंदेStrikeसंप