शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्री गेले अन् संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखून धरला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 18:44 IST

२५ मिनिटे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत, चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ रवाना.

इंद्रपाल कटकवार

भंडारा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घ्यावे, या मागणीला घेऊन २७ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत आंदोलनाने आज वेगळेच वळण घेतले. शासन आपल्या दारी कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांचा निघून गेल्याचे कळताच संतप्त झालेल्या या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद चौकात महामार्ग रोखून धरला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची वाहतूक सुरू करण्याकरिता प्रचंड तारांबळ उडाली.

४:१४ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या रस्ता रोखो आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आरोग्य सेवेत कायम करावे या मुख्य मागणीला घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गत २७ दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. सोमवारी मुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. या निमित्ताने मुख्यमंत्री आमच्याशी दोन मिनिटे चर्चा करतील, अशी या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची आशा होती. मात्र ऐन वेळेवर मुख्यमंत्री तिथूनच निघून गेल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क महामार्ग रोखून धरला.

घोषणाबाजी देत शेकडो कर्मचारी रस्त्यावर बसल्याने नागपूर, रामटेक, साकोली व गणेशपुरहून आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जोपर्यंत मुख्यमंत्री येऊन स्वतः आमच्याशी चर्चा करीत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत- महामार्गावर वाहतुकीचा तणाव वाढत असतानाच रस्ता रोको आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह अन्य अधिकारी पोहोचले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणारे दिलीप उटाणे, अचल मेश्राम, हिवराज उके यांच्यासह कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली समजूत व शिष्टाई फळाला आली. नागपूर विमानतळावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळांची भेट घालून सकारात्मक तोडगा काढू, असे आश्वासन दिले. आंदोलनकर्त्यांनीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अवघ्या दोन मिनिटातच महामार्ग मोकळा केला. शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाला.

तीन मिनिटांचा झाला घोळ- शासन आपल्या दारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर जिल्हा परिषद चौकातूनच मुख्यमंत्र्यांचा ताफा शहापूर हेलिपॅडकडे रवाना होणार होता. यावेळी मुख्यमंत्री दोन मिनिट आमच्याशी संवाद साधतील, अशी भाबडी आशा आरोग्य कर्मचारी बाळगून होते. मात्र क्षणार्धातच मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथून निघून गेला. आंदोलनस्थळी बसलेल्या कर्मचाऱ्यांना याची पुसटशी कल्पनाही आली नाही. मुख्यमंत्री येत आहेत असेच त्यांना वाटले. मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा निघून गेल्याचे कळताच संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. केवळ तीन मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या सगळ्या घडामोडीने जिल्हा प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. तीन मिनिटांपूर्वीच जर आंदोलनकर्ते रस्त्यावर आले असते तर त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच रोखून धरले असते.

गत पंधरा ते विस वर्षांपासून तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाजेष्ठतेनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाच्या मंजूर रिक्त पदांवर थेट सेवा समायोजन करण्याची गरज होती. बेमूदत कामबंद आंदोलनाच्या तेराव्या दिवशी मुंडण व काळे कपडे परिधान करून शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेधही केला होता. कोविड काळातील महामारीत आरोग्य विभागात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. २५ ऑक्टोबरपासून या अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचान्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले.

टॅग्स :bhandara-acभंडाराEknath Shindeएकनाथ शिंदेStrikeसंप