शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

चेकपोस्टला खासगी लोकांचा विळखा

By admin | Updated: March 21, 2016 00:32 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे,..

शासनाचा महसूल बुडतोय : वेळीच कारवाई करण्याची मागणीसिरपूरबांध : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व सदर चेकपोस्टरवर कार्यरत मोटार वाहन निरीक्षकांच्या बेजबाबदारीमुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सदर चेकपोस्टवरून रात्रीच्या वेळी ओव्हरलोड, अधिक उंच व गाडीच्या बाजूला निघालेले माल भरलेले वाहन सरळ हाय-वेने निघताना दिसले. चेकपोस्टवर कंत्राटी वाहनचालकाने त्या गाड्यांचा पाठलाग करून छत्तीसगडच्या सीमेवर थांबविले. तसेच मोटार वाहन निरीक्षकांना बोलावले. कार्यरत मोटार वाहन निरीक्षक हे घटनास्थळी पोहचले, पण त्या गाड्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्या या भोंगळ कारभारामुळे शासनाचा महसूल तर बुडतच आहे, पण कारवाई न झाल्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांची हिंमत अजून वाढतच आहे. अशा प्रकरणावर वेळीच कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून होत आहे. या प्रकरणामुळे चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या सुरक्षा गार्डाच्या जिवाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होवू शकते. तरी चेकपोस्टवर सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीने योग्य ती व्यवस्था करून होत असलेल्या प्रकरणांवर आळा घालण्याची गरज आहे. वार्डर चेकपोस्ट सिरपूरबांध येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक हे आपल्यासोबत बाहेरील मुले घेऊन येतात. पण शासनाच्या नियमानुसार चेकपोस्टवर खासगी लोक ठेवता येत नाही. पण प्रत्येक मोटार वाहन निरीक्षक आपल्या सोबत चार ते पाच लोक घेऊन येतात. बाहेरून आलेले ते लोक हे काम पाहत असतात. जर मोटारवाहन निरीक्षकांना काम करण्याकरिता बाहेरच्या लोकांची गरज भासत असेल तर त्यांनी गावातीलच मुलांना घेऊन काम करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बाहेरील लोकांना घेऊन काम न करता गावातील बेरोजगार युवकांना घेऊन काम करावे यासाठी ग्रामस्थांनी चेकपोस्टवर कार्यरत मोटारवाहन निरीक्षकांना विनंती केली. तसेच बाहेरील लोकांना आणून त्यांच्याकडून काम करविणे खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबीसुद्धा त्यांना देण्यात आली. रात्रीच्या वेळी पळून गेलेल्या ट्रकच्या प्रकाराबद्दल मोटार वाहन निरीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी, सदर प्रकरण गंभीर असून अशा प्रकारावर आळा घालण्याकरिता प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर व सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीला पत्र लिहून कळविले असल्याचे सांगीतले. (वार्ताहर)