शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चेकपोस्टला खासगी लोकांचा विळखा

By admin | Updated: March 21, 2016 00:32 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे,..

शासनाचा महसूल बुडतोय : वेळीच कारवाई करण्याची मागणीसिरपूरबांध : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व सदर चेकपोस्टरवर कार्यरत मोटार वाहन निरीक्षकांच्या बेजबाबदारीमुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सदर चेकपोस्टवरून रात्रीच्या वेळी ओव्हरलोड, अधिक उंच व गाडीच्या बाजूला निघालेले माल भरलेले वाहन सरळ हाय-वेने निघताना दिसले. चेकपोस्टवर कंत्राटी वाहनचालकाने त्या गाड्यांचा पाठलाग करून छत्तीसगडच्या सीमेवर थांबविले. तसेच मोटार वाहन निरीक्षकांना बोलावले. कार्यरत मोटार वाहन निरीक्षक हे घटनास्थळी पोहचले, पण त्या गाड्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्या या भोंगळ कारभारामुळे शासनाचा महसूल तर बुडतच आहे, पण कारवाई न झाल्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांची हिंमत अजून वाढतच आहे. अशा प्रकरणावर वेळीच कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून होत आहे. या प्रकरणामुळे चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या सुरक्षा गार्डाच्या जिवाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होवू शकते. तरी चेकपोस्टवर सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीने योग्य ती व्यवस्था करून होत असलेल्या प्रकरणांवर आळा घालण्याची गरज आहे. वार्डर चेकपोस्ट सिरपूरबांध येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक हे आपल्यासोबत बाहेरील मुले घेऊन येतात. पण शासनाच्या नियमानुसार चेकपोस्टवर खासगी लोक ठेवता येत नाही. पण प्रत्येक मोटार वाहन निरीक्षक आपल्या सोबत चार ते पाच लोक घेऊन येतात. बाहेरून आलेले ते लोक हे काम पाहत असतात. जर मोटारवाहन निरीक्षकांना काम करण्याकरिता बाहेरच्या लोकांची गरज भासत असेल तर त्यांनी गावातीलच मुलांना घेऊन काम करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बाहेरील लोकांना घेऊन काम न करता गावातील बेरोजगार युवकांना घेऊन काम करावे यासाठी ग्रामस्थांनी चेकपोस्टवर कार्यरत मोटारवाहन निरीक्षकांना विनंती केली. तसेच बाहेरील लोकांना आणून त्यांच्याकडून काम करविणे खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबीसुद्धा त्यांना देण्यात आली. रात्रीच्या वेळी पळून गेलेल्या ट्रकच्या प्रकाराबद्दल मोटार वाहन निरीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी, सदर प्रकरण गंभीर असून अशा प्रकारावर आळा घालण्याकरिता प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर व सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीला पत्र लिहून कळविले असल्याचे सांगीतले. (वार्ताहर)