शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

चेकपोस्टला खासगी लोकांचा विळखा

By admin | Updated: March 21, 2016 00:32 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे,..

शासनाचा महसूल बुडतोय : वेळीच कारवाई करण्याची मागणीसिरपूरबांध : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व सदर चेकपोस्टरवर कार्यरत मोटार वाहन निरीक्षकांच्या बेजबाबदारीमुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सदर चेकपोस्टवरून रात्रीच्या वेळी ओव्हरलोड, अधिक उंच व गाडीच्या बाजूला निघालेले माल भरलेले वाहन सरळ हाय-वेने निघताना दिसले. चेकपोस्टवर कंत्राटी वाहनचालकाने त्या गाड्यांचा पाठलाग करून छत्तीसगडच्या सीमेवर थांबविले. तसेच मोटार वाहन निरीक्षकांना बोलावले. कार्यरत मोटार वाहन निरीक्षक हे घटनास्थळी पोहचले, पण त्या गाड्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्या या भोंगळ कारभारामुळे शासनाचा महसूल तर बुडतच आहे, पण कारवाई न झाल्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांची हिंमत अजून वाढतच आहे. अशा प्रकरणावर वेळीच कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून होत आहे. या प्रकरणामुळे चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या सुरक्षा गार्डाच्या जिवाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होवू शकते. तरी चेकपोस्टवर सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीने योग्य ती व्यवस्था करून होत असलेल्या प्रकरणांवर आळा घालण्याची गरज आहे. वार्डर चेकपोस्ट सिरपूरबांध येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक हे आपल्यासोबत बाहेरील मुले घेऊन येतात. पण शासनाच्या नियमानुसार चेकपोस्टवर खासगी लोक ठेवता येत नाही. पण प्रत्येक मोटार वाहन निरीक्षक आपल्या सोबत चार ते पाच लोक घेऊन येतात. बाहेरून आलेले ते लोक हे काम पाहत असतात. जर मोटारवाहन निरीक्षकांना काम करण्याकरिता बाहेरच्या लोकांची गरज भासत असेल तर त्यांनी गावातीलच मुलांना घेऊन काम करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बाहेरील लोकांना घेऊन काम न करता गावातील बेरोजगार युवकांना घेऊन काम करावे यासाठी ग्रामस्थांनी चेकपोस्टवर कार्यरत मोटारवाहन निरीक्षकांना विनंती केली. तसेच बाहेरील लोकांना आणून त्यांच्याकडून काम करविणे खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबीसुद्धा त्यांना देण्यात आली. रात्रीच्या वेळी पळून गेलेल्या ट्रकच्या प्रकाराबद्दल मोटार वाहन निरीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी, सदर प्रकरण गंभीर असून अशा प्रकारावर आळा घालण्याकरिता प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर व सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीला पत्र लिहून कळविले असल्याचे सांगीतले. (वार्ताहर)