शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वेळेसोबत बदलणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:48 IST

वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट नागपुरचे अधिष्ठाता तथा प्राध्यापक डॉ. निरझर कुलकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देनिरझर कुलकर्णी : जे. एम. पटेल महाविद्यालयात ‘मॅनेजमेंट फोरम’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट नागपुरचे अधिष्ठाता तथा प्राध्यापक डॉ. निरझर कुलकर्णी यांनी केले.जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील पर्ल चेंबरमध्ये व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या ‘मॅनेजमेंट फोरम’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. कार्तिक पणिकर, व्यवस्थापन शास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे, मॅनेजमेंट फोरमचे पदव्युत्तर विभाग अध्यक्ष प्रशांत वाघाये, पदवी विभाग अध्यक्ष रोहित मुंडाफोडे उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी म्हणाले, व्यवस्थापनाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. चांगली कौशल्य, उत्तम संभाषण, वेळेचे महत्व, दूरदृष्टी या गोष्टी आपण स्वत:मध्ये बिंबवल्या पाहिजेत. आपल्या वाटेत अनेक अडथळे येतात ते खरं म्हणजे आपलं ज्ञान तपासण्यासाठी एक नवी संधी घेऊन आले आहेत, असा विचार करून त्याला सामोरे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या विचारकक्षा रुंदावल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी शिकणयासाठी मॅनेजमेंट फोरम हे उत्कृष्ठ व्यासपीठ आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त सर्व क्षेत्रात पुढे राहायला पाहिजे. चांगली कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. अशी कौशल्य की या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकण्यासाठी मदत करतील. असा संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमने यांनी विद्यार्थ्यांना दिला. व्यवस्थापन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातुन फोरमच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसंबधी माहिती दिली आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नव्या योजना कार्यान्वित केल्या जातील असे सांगितले.डॉ. पणिकर म्हणाले, व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी म्हणून या फोरमचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी केला गेला पाहिजे. चांगली नोकरी अथवा उत्तम व्यवसाय थाटण्यासाठी ज्ञानासोबतच अष्टपैलु व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे. आणि ते अष्टपैलु व्यक्तिमत्व या फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घडवावे. कार्यक्रमादरम्यान फोरमचे पदाधिकारी आणि सदस्यांचे स्वागत करण्यात आले.संचालन विशाल हटवार यांनी तर, आभार प्रदर्शन शुभांगी गणवीर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉ. पायल पशीने, प्रा. मनीष शेंडे, प्रा. सनी सत्यपाल, प्रा. भारती बारापात्रे, प्रा. मानसी यांचे तसेच एमबीए, बीबीए, बीसीसीएच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.