शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेळेसोबत बदलणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:48 IST

वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट नागपुरचे अधिष्ठाता तथा प्राध्यापक डॉ. निरझर कुलकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देनिरझर कुलकर्णी : जे. एम. पटेल महाविद्यालयात ‘मॅनेजमेंट फोरम’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट नागपुरचे अधिष्ठाता तथा प्राध्यापक डॉ. निरझर कुलकर्णी यांनी केले.जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील पर्ल चेंबरमध्ये व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या ‘मॅनेजमेंट फोरम’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. कार्तिक पणिकर, व्यवस्थापन शास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे, मॅनेजमेंट फोरमचे पदव्युत्तर विभाग अध्यक्ष प्रशांत वाघाये, पदवी विभाग अध्यक्ष रोहित मुंडाफोडे उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी म्हणाले, व्यवस्थापनाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. चांगली कौशल्य, उत्तम संभाषण, वेळेचे महत्व, दूरदृष्टी या गोष्टी आपण स्वत:मध्ये बिंबवल्या पाहिजेत. आपल्या वाटेत अनेक अडथळे येतात ते खरं म्हणजे आपलं ज्ञान तपासण्यासाठी एक नवी संधी घेऊन आले आहेत, असा विचार करून त्याला सामोरे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या विचारकक्षा रुंदावल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी शिकणयासाठी मॅनेजमेंट फोरम हे उत्कृष्ठ व्यासपीठ आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त सर्व क्षेत्रात पुढे राहायला पाहिजे. चांगली कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. अशी कौशल्य की या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकण्यासाठी मदत करतील. असा संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमने यांनी विद्यार्थ्यांना दिला. व्यवस्थापन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातुन फोरमच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसंबधी माहिती दिली आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नव्या योजना कार्यान्वित केल्या जातील असे सांगितले.डॉ. पणिकर म्हणाले, व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी म्हणून या फोरमचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी केला गेला पाहिजे. चांगली नोकरी अथवा उत्तम व्यवसाय थाटण्यासाठी ज्ञानासोबतच अष्टपैलु व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे. आणि ते अष्टपैलु व्यक्तिमत्व या फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घडवावे. कार्यक्रमादरम्यान फोरमचे पदाधिकारी आणि सदस्यांचे स्वागत करण्यात आले.संचालन विशाल हटवार यांनी तर, आभार प्रदर्शन शुभांगी गणवीर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉ. पायल पशीने, प्रा. मनीष शेंडे, प्रा. सनी सत्यपाल, प्रा. भारती बारापात्रे, प्रा. मानसी यांचे तसेच एमबीए, बीबीए, बीसीसीएच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.