शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
12
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
13
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
14
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
15
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
16
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
17
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
18
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
19
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
20
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले

अंतिम पैसेवारीच्या तारखेत बदल

By admin | Updated: December 22, 2015 00:37 IST

ब्रिटिशकालीन पैसेवारी काढण्याच्या पद्घतीत यंदा सुधारणा करण्यात आल्या आहेत.

नवतंत्रज्ञानाचा वापर : ब्रिटिशकालीन पैसेवारीत सुधारणादेवानंद नंदेश्वर भंडाराब्रिटिशकालीन पैसेवारी काढण्याच्या पद्घतीत यंदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानानुसार शास्त्रोक्त पद्धतीने पीक पैसेवारी घोषित करण्यात येत आहे. अंतिम पैसेवारी घोषित करण्याच्या तारखेतही देखील बदल करण्यात आले आहेत. याशिवाय केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या (एनडीआरएफ) आधारे ३३ टक्के पीक नुकसान ग्राह्य धरून ६७ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न आलेल्या कोरडवाहू पिकाखालील क्षेत्रास निविष्ठा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.राज्यात वारंवार निर्माण होणारी टंचाई परिस्थिती जाहीर करण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना जाहीर करण्याच्या अनुषंगाने पैसेवारीचे निकष लागू असल्याने आणेवारी पद्धतीत बदल करण्याची मागणी वारंवार विधिमंडळात चर्चेच्या दरम्यान होत होती. यासंदर्भात केंद्राच्या धोरणाप्रमाणे शिफारस करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्याच्या पीक पैसेवारीबाबतचा अभ्यास करून या समितीने शासनास २३ जुलै २०१५ रोजी अहवाल सादर केला होता. समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळ उपसमिती व मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन शासनाने समितीच्या अहवालातील काही शिफारशी स्वीकारले आहेत. त्यानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे व खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या तारखेत बदल करण्यात आला. यानुसार ही पैसेवारी १५ जानेवारीऐवजी ३१ डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निकषावर होणार दुष्काळ घोषितदुष्काळ जाहीर करण्याच्या अन्य निकषांपैकी पैसेवारी हा एक प्रमुख निकष आहे. पर्जन्यमानाच्या तीनपैकी एक निकष म्हणजे संपूर्ण मान्सून कालावधीत दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पर्जन्यमानात खंड व त्यामुळे पीक परिस्थितीवर विपरीत परिणाम होणे हा आहे. या निकषाच्या आधारे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती जाहीर करावी, असा अहवाल जिल्हाधिकारी शासनाला सादर करु शकतात.३१ डिसेंबरला होणार अंतिम पैसेवारीनागपूर व अमरावती विभागासाठी सुधारित पैसेवारी जाहीर करण्याची तारीख १५ नोव्हेंबर होती. ती ३१ आॅक्टोबर करण्यात आली. खरिपाची अंतिम पैसेवारी ही १५ जानेवारीला जाहीर होणार होती ती सुधारित निकषाप्रमाणे ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार मिळणार मदतकेंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीचे (एनडीआरएफ) निकष राज्याला बंधनकारक आहे. राज्यानेदेखील निकष स्वीकृत केले असून राज्यात १ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आले आहे. या निकषांच्याआधारे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) स्थापित करण्यात आला आहे. पैसेवारीसाठी दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापरपैसेवारी पुनर्रचना समितीचा अहवाल व त्यातील शिफारशींचा अभ्यास करून ‘एमआरएसएसी’कडे उपलब्ध असलेले दूरसंवेदन तंत्रज्ञान वापरून उत्पादकता मोजून पैसेवारी घोषित करणे. ‘अ‍ॅटोमेटेड वेदर स्टेशन’द्वारे उत्पादकतेवर परिणाम करणारे पाऊस, तापमान, आर्दता या घटकांच्या आधारे थेट पैसेवारी ठरविणे, या पध्दती प्रस्तावित आहेत.