शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम पैसेवारीच्या तारखेत बदल

By admin | Updated: December 22, 2015 00:37 IST

ब्रिटिशकालीन पैसेवारी काढण्याच्या पद्घतीत यंदा सुधारणा करण्यात आल्या आहेत.

नवतंत्रज्ञानाचा वापर : ब्रिटिशकालीन पैसेवारीत सुधारणादेवानंद नंदेश्वर भंडाराब्रिटिशकालीन पैसेवारी काढण्याच्या पद्घतीत यंदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानानुसार शास्त्रोक्त पद्धतीने पीक पैसेवारी घोषित करण्यात येत आहे. अंतिम पैसेवारी घोषित करण्याच्या तारखेतही देखील बदल करण्यात आले आहेत. याशिवाय केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या (एनडीआरएफ) आधारे ३३ टक्के पीक नुकसान ग्राह्य धरून ६७ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न आलेल्या कोरडवाहू पिकाखालील क्षेत्रास निविष्ठा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.राज्यात वारंवार निर्माण होणारी टंचाई परिस्थिती जाहीर करण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना जाहीर करण्याच्या अनुषंगाने पैसेवारीचे निकष लागू असल्याने आणेवारी पद्धतीत बदल करण्याची मागणी वारंवार विधिमंडळात चर्चेच्या दरम्यान होत होती. यासंदर्भात केंद्राच्या धोरणाप्रमाणे शिफारस करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्याच्या पीक पैसेवारीबाबतचा अभ्यास करून या समितीने शासनास २३ जुलै २०१५ रोजी अहवाल सादर केला होता. समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळ उपसमिती व मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन शासनाने समितीच्या अहवालातील काही शिफारशी स्वीकारले आहेत. त्यानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे व खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या तारखेत बदल करण्यात आला. यानुसार ही पैसेवारी १५ जानेवारीऐवजी ३१ डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निकषावर होणार दुष्काळ घोषितदुष्काळ जाहीर करण्याच्या अन्य निकषांपैकी पैसेवारी हा एक प्रमुख निकष आहे. पर्जन्यमानाच्या तीनपैकी एक निकष म्हणजे संपूर्ण मान्सून कालावधीत दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पर्जन्यमानात खंड व त्यामुळे पीक परिस्थितीवर विपरीत परिणाम होणे हा आहे. या निकषाच्या आधारे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती जाहीर करावी, असा अहवाल जिल्हाधिकारी शासनाला सादर करु शकतात.३१ डिसेंबरला होणार अंतिम पैसेवारीनागपूर व अमरावती विभागासाठी सुधारित पैसेवारी जाहीर करण्याची तारीख १५ नोव्हेंबर होती. ती ३१ आॅक्टोबर करण्यात आली. खरिपाची अंतिम पैसेवारी ही १५ जानेवारीला जाहीर होणार होती ती सुधारित निकषाप्रमाणे ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार मिळणार मदतकेंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीचे (एनडीआरएफ) निकष राज्याला बंधनकारक आहे. राज्यानेदेखील निकष स्वीकृत केले असून राज्यात १ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आले आहे. या निकषांच्याआधारे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) स्थापित करण्यात आला आहे. पैसेवारीसाठी दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापरपैसेवारी पुनर्रचना समितीचा अहवाल व त्यातील शिफारशींचा अभ्यास करून ‘एमआरएसएसी’कडे उपलब्ध असलेले दूरसंवेदन तंत्रज्ञान वापरून उत्पादकता मोजून पैसेवारी घोषित करणे. ‘अ‍ॅटोमेटेड वेदर स्टेशन’द्वारे उत्पादकतेवर परिणाम करणारे पाऊस, तापमान, आर्दता या घटकांच्या आधारे थेट पैसेवारी ठरविणे, या पध्दती प्रस्तावित आहेत.