शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

हवामानानुसार पीक पद्धती बदला

By admin | Updated: June 28, 2017 00:29 IST

जून ते आॅक्टोबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीतील खरीप हंगाम निर्भर असतो.

खरिपाला सुरूवात : कोरडवाहू शेतीत आंतरपीक महत्त्वाचेलोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : जून ते आॅक्टोबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीतील खरीप हंगाम निर्भर असतो. मात्र मागील पाच वर्षांचा आढावा घेता पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हवामान बदलत असताना पीक पद्धतीही बदलणे गरजेचे आहे. पिकांच्या उत्पादकतेत स्थिरता आणण्यासाठी आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.दरवर्षी पावसाची अनिश्चितता कायम आहे. कधी अधिक पाऊस, तर कधी पावसात खंड यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. कमी पावसाच्या भागात प्रामुख्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत कमी कालावधीची पिके घेणे व वाणांची निवड करणे आवश्यक आहे. मूग, उडीद व जमिनीवर पसरून कमी उंचीची पिके व जमिनीची धूप थांबविण्यासाठी मूग, उडीद व सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून अवलंब करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून सूक्ष्म जिवांच्या संख्येत वाढ होते. मुख्य पीक व आंतरपीक यांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरात वाढणारी असावीत. कपाशीची मुळे जमिनीच्या खालच्या स्तरातून अन्नद्रव्य शोषून घेतात. आंतरपीक म्हणून मूग व उडीद पिकांची मुळे जमिनीच्या वरच्या स्तरातून पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेतात. मुख्य पीक व आंतरपिके एकमेकांना पूरक अशी अधिक उत्पादन देणारी निवडावी. अधिक अन्नद्रव्यांची गरज असणाऱ्या पिकांचा आंतरपीकातील समावेश टाळावा.हवामानात होणारा बदल शेती पिकावर विपरीत परिणाम करतो. पावसाचा खंड व दररोज वाढणारे तापमान बिजांकुरावर व रोपांवर परिणाम करतात. यासाठी पावसाचे व्यवस्थापन व आंतरपीक पद्धतीच्या पिकांसाठी नत्राचा योग्य वापर करणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज ठरत आहे.सोयाबीनमध्ये हवे तुरीचे आंतरपीक जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र सोयाबीनचे आहे. कोरडवाहू क्षेत्रात जिथे कमी अधिक पाऊस पडतो, अशा क्षेत्रात सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे. सोयाबीनच्या दोन, चार ओळीनंतर तुरीची ओळ पेरावी. यामुळे तुरीची वाढ झाल्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत कीटकनाशकांची फवारणी करणे सोईचे होते. ही पेरणी जुलैच्या १५ तारखेपर्यंत करता येईल. आंतरपीक पद्धतीचे व्यवस्थापन महत्त्वाचेमध्यम किंवा भारी जमिनीत कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिके घ्यावीत. तसेच लवकरच पसरणाऱ्या नत्राची निवड करावी. दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्टरी रोपांची व झाडांची संख्या योग्य ठेवावी. पेरणीमध्ये रूंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्यास पावसाच्या पाण्याचे संवर्धन योग्यरितीने करता येते.आंतरपीक पद्धतीचे फायदेसरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस झाला तरीही आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहते.पट्टापेर पद्धतीत एक पीक तृणधान्य व एक पीक कडधान्य घेतल्यास जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.कडधान्य वर्गातील मूग, उडीद, तूर किंवा सोयाबीन पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास त्या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जिवाणू वातावरणातील नत्र शोषून जमिनीतून पिकांसाठी उपलब्ध करून देतात. या पिकांची पानगळ व अवशेष यामुळे जमिनीची सुपिकता व सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.कपाशी अधिक मूग आंतरपीक हवेकापूस अधिक मूग व उडीद यासारखी आंतरपिके घेता येतात.कपाशीच्या बीटी वाणासाठी ९० बाय ६० सेमी. आणि ९० बाय ९० अंतरावर शिफारस करण्यात आली आहे. कापसाच्या दोन ओळीमध्ये टोकन करून उडीद किंवा मुगाचे आंतरपीक घेता येते.कपाशीत तुरीचे आंतरपीक नकोकापसाच्या ६ ते ८ ओळीनंतर तुरीच्या दोन ओळी पेराव्यात. वास्तविकत: कपाशी व तूर दोन्ही ऊंच वाढणारी, विस्तारणारी आणि दीर्घ (१६० ते १८० दिवस) अवधीची पिके असल्याने तसेच सूर्यप्रकाश, ओलावा व अन्नद्रव्यांच्या गरजा समान असल्याने ही पिके एकमेकास स्पर्धक ठरतात.