शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

सुभाषने फुलविली मजुरांच्या आयुष्यात चैतन्याची बाग

By admin | Updated: February 20, 2016 01:29 IST

केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. या संत नामदेवाच्या अभंगातील ओळीतून एका तरूण शेतकरी पुत्राला स्फूर्ती मिळाली.

२५ एकरात भाजीपाला उत्पादन : शंभराहून अधिक मजुरांना दिला रोजगार रंजित चिंचखेडे चुल्हाडकेल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. या संत नामदेवाच्या अभंगातील ओळीतून एका तरूण शेतकरी पुत्राला स्फूर्ती मिळाली. शेती व्यवसायातून वर्षभर मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचेसाठी तो मायबापच ठरला असल्याचा प्रत्यय रेंगेपार गावात निदर्शनास आला आहे. प्रगतशील शेतकऱ्याचे श्रेणीत नाव लौकीक करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचे सुभाष हिरपा निशाने असे त्याचे नाव आहे.वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या रेंगेपार पांजरा गावात रोजगारांचा अभाव आहे. गावात सधन कुटूंब बोटावर मोजण्या इतपत आहे. बहुतांश कुटूंब रोजगारासाठी शहरात धाव घेत असल्याने मुलांचे शिक्षण प्रभावित होत आहे. गावात कामे असताना रोजगार निर्मिती दालने निर्माण होत नाही, अशी खंत गावातील मजुरांना आहे. या गावात एका शेतकरी पुत्राने मजुरांच्या स्थानांतरणाला ब्रेकअप दिला आहे. सुभाष हिरपा निशाने या युवा शेतकऱ्यांनी यशोगाथा प्रेरणादायी ठरणारी आहे. संत रामदेवाच्या अभंगातून घेतलेल्या ओडीतून प्रेरणा मिळाली असली तरी स्वत:चे व गावातील मजुरांना गावातच स्फूर्ती देणारी ठरली आहे. सुभाष या युवा शेतकऱ्याकडे वडिलोपार्जीत १० एकर शेती आहे. याशिवाय २५ एकर शेती त्यांनी ठेका पद्धतीने घेतली आहे.या शेतीत सुभाषने ऊस, वांगे, भेंडीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक असे चित्र या युवा शेतकऱ्याने निर्माण केले आहे. पारंपारिक पद्धतीच्या शेतीला तिलांजली व आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे कल या सुत्राचा अवलंब करित सुभाषने ३२ पुरूष आणि १८ महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेत शिवारात भाजीपाला उत्पादनाची लागवड झाली असता मजुरांच्या हाताला काम राहत नहाी. यामुळे त्यांचे कुटूंबावर उपासमारीची पाळी येत असल्याचे लक्षात येताच सुभाषने ऊस कापनीची टोळी तयार केली आहे. या टोळीला कापनीचे साहित्या स्व खर्चातून उपलब्ध करून दिले आहे. गावात ३०० एकर हुन अधिक शेत शिवारात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. या ऊस कापनीच्या कामावर मजुर उपलब्ध करून देण्यास सुभाषने हातकंडा निर्माण केला आहे. ऊस कापनीचे कंत्राट आता मजुर स्वत:च घेत आहे. थेट फायदा या मजुरांना होत आहे.यामुळे या मजुरांच्या आयुष्यात गवाात नवचैतन्याची बाग फुलविली आहे. सध्या ४ एकर जागेत भेंडीची लागवड सुभाषने केली आहे. भेंडीची लागवड भरभराटीला आली आहे. भेंडीचे विक्रमी उत्पादन घेण्याची वाटचाल सुभाषने सुरू केली आहे. जेमतेम १० वी पर्यंत शिक्षण पुर्ण केलेल्या सुभाषच्या आयुष्यात १२ वी उत्तीर्ण पत्नीचे मार्गदर्शन व मदत यशाची गुरूकिल्ली ठरत आहे. शेती व्यवसायात फळबाग तथा भाजीपाला उत्पादनात औषधी फवारणी करताना स्वत:च कौशल्य व बुद्धीमतेचा केलेला उपयोग रामबाण ठरत आहे. कृषी केंद्रावरून खरेदी करण्यात आलेली औषधी थेट फवारणी न करता औषधी मधील गुणधर्माचा अन्याय तथा अन्य औषधांचे मिसरण याची जोड दिली जात असल्याने किट नाशकात अतिशय उपयोगाचे असल्याचे सुभाषचे म्हणणे आहे. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी सेंद्रीय खतांचा आधार घेवून उत्पादनात वाढीसाठी उत्तुंग भरारी असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांचे शेत शिवारात उत्पादीत साहित्यांना बांधावरच मार्केटिंग मिळाली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीचा भुर्दंड बसणार नाही. अधिका अधिक नफा शेतकऱ्यांना थेट प्राप्त होणार आहे. वैनगंगा नदी काठालगत शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. या शेतकऱ्याचे दारात थेट मार्केटिंग मिळाल्यास संजीवनी ठरणार असल्याची प्रतिक्रिया युवा शेतकरी सुभाष निशाने यांनी दिली आहे.