शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

होळी पेटवून नव्हे, वृक्ष पूजनाने साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:31 IST

वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याची गरज आहे. पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांची होळी पेटवून स्वच्छतेचा जागर करण्याची आवश्यकत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींचे आवाहन : होळीमध्ये जळतात हजारो टन लाकडे, होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांचे दहन करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याची गरज आहे. पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांची होळी पेटवून स्वच्छतेचा जागर करण्याची आवश्यकत आहे.भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात होळीच्या दिवशी लाकडे गोळा करून त्याचे दहन केले जाते. दरवर्षी होळीमध्ये हजारो टन लाकडांची आहुती दिली जाते. सण उत्सव साजरे करण्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र अशा सण उत्सवातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. यातून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि वृक्ष जतन करण्याचा संदेश जाईल. अलीकडे होळीच्या दिवशी वृक्ष पूजनाची एक चांगली परंपरा पर्यावरण प्रेमींनी सुरु केली आहे. होळी न पेटविता एखाद्या वृक्षाचे पूजन करून त्याठिकाणी होळी साजरी केली जाते. होळी साजरी करायची असल्यास शक्यतो लहान करावी. कमीत कमी लाकडांचा उपयोग करावा, अनावश्यक वस्तूंची व पालापाचोळ्यांची होळी करावी. ज्यातून वृक्ष वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल. यासाठी गरज आहे ती पर्यावरण प्रेमींना पुढे येण्याची. पर्यावरणप्रेमींनी जनजागृती केली तर होळी ही पर्यावरण पूरक होण्यास वेळ लागणार नाही.जिल्ह्यात पेटणार २७९४ ठिकाणी होळीरंगांचा सण असलेला होळी हा सण २० मार्च रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात २७९४ ठिकाणी होळी पेटविली जाणार असल्याची माहिती आहे. त्यात १८६७ ठिकाणी सार्वजनिक तर ९२७ ठिकाणी वैयक्तिक होळी पेटविली जाणार आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास एका वेळी १०० किलो लाकडे धरली तरी हजारो क्विंटल लाकडे एका दिवसात भस्मसात होणार आहेत. त्यामुळे गावागावातील नागरिकांनी कमीत कमी लाकडांचा वापर करणे गरजेचे आहे.बंदोबस्तासाठी दीड हजार पोलीसजिल्ह्यात होळी सणानिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५८० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. होळीत गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरही पोलीस दल तयार राहणार आहेत. पोलीस अधीक्षकांसह दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५० उपनिरीक्षक, १०६१ पोलीस कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात राहणार आहे. तसेच ४०० गृहरक्षक दलाचे जवानही तैनात राहणार आहेत.रासायनिक रंग टाळाधुळवळ साजरी करताना रासायनिक रंग वापरणे टाळा. हे रंग आरोग्यसाठी घातक असतात. नैसर्गिक रंगाचा वापर करून पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करून आनंद लुटता येतो.गवराळात पेटते केरकचऱ्याची होळीविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे गत २६ वर्षांपासून लाकडाऐवजी केरकचरा दहन करण्याची परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे. या गावात किसनबाबा अवसरे महाराजांचे वास्तव्य होते. हनुमान मंदिरात त्यांचा निवास होता. श्रमदानातून त्यांनी मंदिराचे बांधकाम केले. परिसरात ते प्रसिद्ध होते. श्रमप्रतिष्ठेला चालना देणाऱ्या किसनबाबाचे १९ मार्च १९९२ रोजी होळीच्या दिवशी देहावसान झाले. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. त्याचवेळी गावकºयांनी होळी साजरा न करण्याचा निर्णय घेतला. सर्वत्र रंगांची उधळण होत असताना गवराळात मात्र किसनबाबा अवसरे यांच्या स्मृतीत त्रिदिवसीय पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला जातो. यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा केला जातो.