शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

होळी पेटवून नव्हे, वृक्ष पूजनाने साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:31 IST

वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याची गरज आहे. पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांची होळी पेटवून स्वच्छतेचा जागर करण्याची आवश्यकत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींचे आवाहन : होळीमध्ये जळतात हजारो टन लाकडे, होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांचे दहन करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याची गरज आहे. पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांची होळी पेटवून स्वच्छतेचा जागर करण्याची आवश्यकत आहे.भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात होळीच्या दिवशी लाकडे गोळा करून त्याचे दहन केले जाते. दरवर्षी होळीमध्ये हजारो टन लाकडांची आहुती दिली जाते. सण उत्सव साजरे करण्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र अशा सण उत्सवातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. यातून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि वृक्ष जतन करण्याचा संदेश जाईल. अलीकडे होळीच्या दिवशी वृक्ष पूजनाची एक चांगली परंपरा पर्यावरण प्रेमींनी सुरु केली आहे. होळी न पेटविता एखाद्या वृक्षाचे पूजन करून त्याठिकाणी होळी साजरी केली जाते. होळी साजरी करायची असल्यास शक्यतो लहान करावी. कमीत कमी लाकडांचा उपयोग करावा, अनावश्यक वस्तूंची व पालापाचोळ्यांची होळी करावी. ज्यातून वृक्ष वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल. यासाठी गरज आहे ती पर्यावरण प्रेमींना पुढे येण्याची. पर्यावरणप्रेमींनी जनजागृती केली तर होळी ही पर्यावरण पूरक होण्यास वेळ लागणार नाही.जिल्ह्यात पेटणार २७९४ ठिकाणी होळीरंगांचा सण असलेला होळी हा सण २० मार्च रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात २७९४ ठिकाणी होळी पेटविली जाणार असल्याची माहिती आहे. त्यात १८६७ ठिकाणी सार्वजनिक तर ९२७ ठिकाणी वैयक्तिक होळी पेटविली जाणार आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास एका वेळी १०० किलो लाकडे धरली तरी हजारो क्विंटल लाकडे एका दिवसात भस्मसात होणार आहेत. त्यामुळे गावागावातील नागरिकांनी कमीत कमी लाकडांचा वापर करणे गरजेचे आहे.बंदोबस्तासाठी दीड हजार पोलीसजिल्ह्यात होळी सणानिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५८० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. होळीत गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरही पोलीस दल तयार राहणार आहेत. पोलीस अधीक्षकांसह दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५० उपनिरीक्षक, १०६१ पोलीस कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात राहणार आहे. तसेच ४०० गृहरक्षक दलाचे जवानही तैनात राहणार आहेत.रासायनिक रंग टाळाधुळवळ साजरी करताना रासायनिक रंग वापरणे टाळा. हे रंग आरोग्यसाठी घातक असतात. नैसर्गिक रंगाचा वापर करून पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करून आनंद लुटता येतो.गवराळात पेटते केरकचऱ्याची होळीविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे गत २६ वर्षांपासून लाकडाऐवजी केरकचरा दहन करण्याची परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे. या गावात किसनबाबा अवसरे महाराजांचे वास्तव्य होते. हनुमान मंदिरात त्यांचा निवास होता. श्रमदानातून त्यांनी मंदिराचे बांधकाम केले. परिसरात ते प्रसिद्ध होते. श्रमप्रतिष्ठेला चालना देणाऱ्या किसनबाबाचे १९ मार्च १९९२ रोजी होळीच्या दिवशी देहावसान झाले. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. त्याचवेळी गावकºयांनी होळी साजरा न करण्याचा निर्णय घेतला. सर्वत्र रंगांची उधळण होत असताना गवराळात मात्र किसनबाबा अवसरे यांच्या स्मृतीत त्रिदिवसीय पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला जातो. यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा केला जातो.