शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

काेविडचा कचरा ठरताेय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याने अन्य ठिकाणी तत्काळ स्वरूपात काेविड सेंटर सुरू करण्यात आले ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याने अन्य ठिकाणी तत्काळ स्वरूपात काेविड सेंटर सुरू करण्यात आले हाेते. यापैकी शहरातील ऐतिहासिक शाळा असलेल्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात काेविड सेंटर उभारण्यात आले. हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेत गेली. परिणामी काेविड सेंटरही रिकामे झाले. मात्र, याठिकाणची स्वच्छता झाली नाही. आता हाच काेविडचा कचरा घातक ठरू पहात आहे. स्वच्छतेसाठी अजूनही जिल्हा आराेग्य विभागाची अनदेखी हाेत आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू झाल्यास आम्ही काय करावे असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीसमाेर उभा राहिला आहे.

विश्वात काेराेना महामारीने सर्वांनाच सळाे की पळाे करून साेडले. राज्यात त्यातही भंडारा जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत हाेती. १४०० पेक्षा रुग्ण एकाच दिवशी आढळत असल्याने तमाम शासकीय व खासगी काेविड रुग्णालये हाऊसफूल झाली. काेराेना रुग्णांना क्वाॅरंटाईन ठेवण्यासाठी जागा शाेधण्यात आली. शाळा बंद असल्याने तर काही ठिकाणी सभागृहांचा आसरा घेण्यात आला. शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील ज्युनिअर सेक्सनमधील तब्बल १२ खाेल्यांमध्ये काेविड रुग्णांची साेय करण्यात आली. सुरुवातीला सर्व काही आलबेल चालले. हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेत गेल्याने येथील रुग्णही घरी परतले. शेवटच्या वेळी चार ते पाच रुग्ण उपस्थित असताना या दिवशीपासूनच या परिसराची स्वच्छता ठप्प पडली. आताही खाेल्यांमध्ये गाद्या पडून असून धूळ साचली आहे. खाेल्यांबाहेर मास्क, कापसाचे बाेंडे व अन्य साहित्य पडले आहे. सध्या शाळा बंद आहे. मात्र, शाळा सुरु झाल्यास, अशा धाेकादायक परिसरात शाळांमध्ये पाल्य काेण पाठविणार असा सवाल उपस्थित हाेत आहे.

एकमेकांकडे बाेट

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर शाळेतील वर्गखाेल्या काेविड रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. आराेग्य विभागाचे साहित्य याठिकाणी आणण्यात आले. मात्र, यावेळी स्वच्छतेची जबाबदारी कुणाची अशा प्रश्न उपस्थित राहिला. आधीच जिल्ह्यात अनेक शिक्षकांची काेविड काळात नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यातच शिक्षकांनीच किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता करावी काय? आराेग्य विभागाचे कर्तव्य काेणते? यासाठी एकमेकांकडे बाेट दाखविण्याचा प्रतापही येथे पहावयास मिळत आहे. खऱ्या अर्थाने आराेग्य विभागाने शाळा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी घ्यायला हवी हाेती. मात्र तसे काही झाले नाही.

काेटबाॅक्स

सर्वांनाच आपल्या जीवाची भीती असते. मुख्याध्यापक म्हणून स्वच्छता संदर्भात आदेश द्यायला हरकत नाही. मात्र, येथे साधारण नव्हे तर काेविड सेंटर हाेते. या संदर्भात जिल्हा आराेग्य प्रशासनाने दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे.

- केशर बाेकडे

प्राचार्य शास्त्री विद्यालय भंडारा