शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बदली प्रकरणात पैसे घेणाऱ्यांची लपाछपी सुरू

By admin | Updated: April 28, 2017 00:34 IST

भंडारा जिल्हा परिषदेने केलेल्या नियमबाह्य ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द झाल्या.

प्रकरण ११७ शिक्षकांच्या बदली रद्दचे : जिल्हा परिषदेत धडकले शिक्षक प्रशांत देसाई   भंडारा भंडारा जिल्हा परिषदेने केलेल्या नियमबाह्य ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द झाल्या. या आशयाचे वृत्त गुरूवारला ‘लोकमत’ने प्रकाशित केले. यामुळे बदलीप्रक्रियेत दिलेले पैसे परत मागण्यासाठी यातील २५ ते ३० शिक्षक जिल्हा परिषदमध्ये धडकले. ज्यांनी पैसे घेतले, त्यांना पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे पैसे घेऊन आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवले तर, अनेकांनी शहरातून बाहेर जाणे पसंत केले. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद भंडाराच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगणमत करून आर्थिक व्यवहारातून या बदल्या केल्याचे स्पष्ट झाले. बदलीत प्रकरणात अनियमितता झाल्याने ११७ शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे आदेश विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी २१ एप्रिलला बजावले. जिल्हा परिषदने तातडीने आदेशाची अंमलबजावणी करून ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. गुरूवारला ‘लोकमत’ने ‘११७ शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त प्रकाशित होताच बदली प्रकरणात पैसे देणाऱ्यांपैकी २५ ते ३० शिक्षक आज जिल्हा परिषदमध्ये धडकले. यात त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांना गराडा घातला. या सर्व संतप्त शिक्षकांनी डोंगरे यांना बदली प्रकरणात झालेल्या अनियमितता व पैशाने फसगत झाल्याची हकिकत कथन केली. यावर डोंगरे यांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिक्षक परत गेलेत. मात्र, पैसे दिल्यानंतरही बदल्या रद्द झाल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. यात शिक्षकांची आर्थिक फसगत झाली आहे. प्रक्रियेतील ‘दलाल’ यांना शिक्षकांनी भ्रमणध्वनी करून पैसे परत करण्याची मागणी केली. सुरूवातील या दलालांचे भ्रमणध्वनी सुरू होते. मात्र, शिक्षकांच्या त्रासाचा ससेमिरा वाढल्याने अनेकांनी भ्रमणध्वनी बंद करून ठेवले. तर अनेकांनी शहराबाहेर पळ काढला आहे. बदली प्रकरणात मोठी उलाढाल शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक येवले व निलंबित कनिष्ठ सहायक बुरडे यांनी मोठी भूमिका निभावल्याची चर्चा आता समोर येऊ लागली आहे. यासोबतच या प्रक्रियेसाठी शिक्षणाधिकारी, सामान्य प्रशासन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या सर्वांवर आता संशयाची सुई आहे. दुसरीकडे बदल्या रद्द झाल्याने शिक्षकांनी पैसे परत मागण्याचा तगादा सुरू केल्याने अनेकांची नावे आता समोर येऊ लागली आहे. यात काही पदाधिकारी तर काहिंनी पदाधिकारी जवळचे असल्याचे बतावणी करून शिक्षकांकडून मोठी रक्कम उकळल्याचेही समोर आले आहे. बदली प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल झाली याबाबत शंका नाही.