शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तोडणीही परवडेना; हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी

By युवराज गोमास | Updated: May 2, 2024 20:18 IST

बाजारात मिरचीचे भाव कोसळले : शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेना

भंडारा: शेतकरी सध्या अवकाळी वादळी पाऊसाने तसेच शेतमालाचे भाव कोसळल्याने चांगलाच संकटात सापडला आहे. बाजारात हिरव्या मिरचीला किरकोळ विक्रीत ३० रूपयांचा भाव मिळतो आहे. परिणामी हिरव्या मिरच्यांनी तोड्याअभावी झाडावरच नांगी टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हीच स्थिती लाल मिरचीच्या बाबतीतही दिसून येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर २५० ते ३०० रूपयांपर्यंत कडाडणारी लाल मिरची यंदा १५० रूपयांपर्यंत खाली उतरली आहे.अवकाळी संकटाशी दोन हात करून बळीराजा शेती फुलवीत आहे. परंतु, घामाच्या थेंबांनी शेती हिरवीगार करणारा बळीराजा यंदा मात्र बाजारभाव गडगडल्याने पुरता खचला आहे. पडलेल्या बाजारभावाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाला. प्रति क्विंटल तीस हजार रुपयांपर्यंत भाव होता. उत्पादन अल्प झालं होतं. मात्र वाढलेल्या बाजारभावाने शेतकरी फायद्यात राहिले. मिरचीला मिळालेला योग्य भाव बघता यावर्षी जिल्ह्यात मिरचीचा पेरा वाढला. तुलनेत उत्पादन मोठे झाले. मात्र, बाजारभाव कोसळला. हिरव्या मिरचीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मिरची तोडणीचा खर्चही यातून भागताना दिसत नाही. घर खर्च चालविण्याची ऐपतही मिरची उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली नाही.

स्थानिक मजुरांच्या रोजगाराला फटका

सध्या शेतशिवारात मिरची तोडणी शेवटच्या टप्पा सुरू आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पहाटे ७ ते १२ वाजेपर्यंत मजूर मिरची तोडतात. यातून त्यांना दोनशे ते तीनशे रुपये मजुरी मिळत असते. मिरचीमुळे स्थानिक मजुरांच्या हातांना रोजगार मिळतो. परंतु, भाव गडगडल्याने स्थानिक मजुरांच्या रोजगारावर परिणाम जाणवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक खर्च परवडणारा नसल्साने तोडणी बंद केली आहे.

खर्च लाखाचा, उत्पन्न मात्र अत्यल्प

मिरची लागवडीसाठी एका एकराला साधारणता एक लाखाच्यावर खर्च अपेक्षित असते. परंतु, सध्या पडलेल्या भावामुळे मिरची लागवडीसाठी लावलेला खर्चही निघेना अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मिरची पिकाने दिलेला आर्थिक दगाफटका बघता पुढील वर्षी पेरा कमी होण्याची शक्यता शेतकरी श्रीकृष्ण वनवे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरी