शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पदोन्नतीच्या कोट्यातील १०० टक्के जागा भरण्याचा निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST

साकोली : पदोन्नतीच्या कोट्यातून १०० टक्के जागा भरण्याचा निर्णय रद्द करावा. ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून उर्वरित पदे भरण्याबाबत ...

साकोली : पदोन्नतीच्या कोट्यातून १०० टक्के जागा भरण्याचा निर्णय रद्द करावा. ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून उर्वरित पदे भरण्याबाबत देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय कायम ठेवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. नेपाल रंगारी यांनी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील एका याचिकेवर ४ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द झाले होते. राज्यातील अनुसूचित जाती, जमाती तसेच भटक्या प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून उर्वरित पदे सर्वसाधारण सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय १८ फेब्रुवारी २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. त्यामुळे या प्रवर्गातील समाजावर अन्याय झाला. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविल्याने २० फेब्रुवारी रोजीचा निर्णय मागे घेऊन जुना निर्णय कायम ठेवण्यात आला. परंतु फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडी सरकारने ७ मे रोजी पुन्हा रद्द करीत पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के जागा रिक्त न ठेवता सेवाज्येष्ठता यादीनुसार भरण्याचा निर्णय घेतला. अनुसूचित जाती, जमाती तसेच व्हीजेएनटी प्रवर्गातील समाजाच्या संवैधानिक हक्कावर ही गदा आहे. महाविकास आघाडी सरकारने ७ मे रोजीचा निर्णय त्वरित रद्द केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा डाॅ. नेपाल रंगारी यांनी दिला आहे.