शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

पीक वाचविण्यासाठी कालव्याचे खोदकाम

By admin | Updated: September 19, 2016 00:36 IST

पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली.

८५० एकर शेतीला लाभ : बाळा काशिवार यांच्या प्रयत्नाला यशलाखांदूर : पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली. मात्र यावर्षी नेरला उपसा सिंचनचे पाणी गावाजवळून वाहत असल्याने तब्बल तीन किमी कालव्याचे खोदकाम करून शेतीला पाणी देण्यात आले. आमदार बाळा काशिवार यांच्या प्रयत्नाला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मागील चार वर्षांपासून अपुरा पाऊस, वर थेंबी शेती त्यामुळे या भागातील शेती पिकवने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीची झाली होती. कशी-बशी पेरलेली पिके पाण्याअभावी करपल्याने पेटवल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. एकूणच या भागातील उत्पन्नात कमालीची घट झाली होती. मात्र जवळूनच नेरला उपसा सिंचन योजनेचा कालवा भरभरून वाहत सुटल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु कालव्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचणे कठीणच नाही तर अशक्य होते. परंतु धान पीक या वर्षी तरी वाचवायचे म्हणून शेतकऱ्यांनी कंबर कसली. आमदार बाळा काशिवार व किशोर पंचाभाई यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांचे धान पीक मरू देणार नाही पाणी शेतात पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, म्हणून दोन जेसीबी च्या साहायाने चक्क तीन किमी कालव्याचे खोदकाम करण्यात आले. यावेळी जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांनी श्रमदान केले. आमदार बाळा काशिवार यांनी नेरला उपसा सिंचन योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी देण्याचे मान्य केले.पेंढरी, सोनेगाव, हारादोली या तीन गावातील जवळपास ८५० एकर धान शेती सिंचीत होणार असून सतत कोरडे राहणारे चार तलाव पाण्याने तुडुंब भरणार आहेत. सदर कालव्याचे बांधकाम केल्यास या भागातील हजारो हेक्टर शेतजमीन सिंचित होऊन उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थीक स्तर नक्कीच उंचावणार आहे. यावेळी आ. बाळा काशिवार, किशोर पंचभाई, मनोज चुटे, माजी पं.स.सदस्य देविदास भोयर, सरपंच पेंढारी प्रदीप शेंडे, सरपंच तिरखुरी हरिषचंद्र गेडाम, पंचायत समिती सदस्य पुंडलिक पेलणे, बंडू बारसागडे, व शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणारतालुक्यातील चौरास भागात गोसे खुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे जाळे पसरले आहेत. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. ही बोंब या वर्षी सर्वच भागात ऐकायला मिळाली. त्यामुळे सर भागातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन सोडविल्या. शेतकऱ्यांची बाजू रास्त समजून त्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आमदार बाळा काशिवार यांनी सांगितले.