शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

पीक वाचविण्यासाठी कालव्याचे खोदकाम

By admin | Updated: September 19, 2016 00:36 IST

पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली.

८५० एकर शेतीला लाभ : बाळा काशिवार यांच्या प्रयत्नाला यशलाखांदूर : पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली. मात्र यावर्षी नेरला उपसा सिंचनचे पाणी गावाजवळून वाहत असल्याने तब्बल तीन किमी कालव्याचे खोदकाम करून शेतीला पाणी देण्यात आले. आमदार बाळा काशिवार यांच्या प्रयत्नाला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मागील चार वर्षांपासून अपुरा पाऊस, वर थेंबी शेती त्यामुळे या भागातील शेती पिकवने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीची झाली होती. कशी-बशी पेरलेली पिके पाण्याअभावी करपल्याने पेटवल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. एकूणच या भागातील उत्पन्नात कमालीची घट झाली होती. मात्र जवळूनच नेरला उपसा सिंचन योजनेचा कालवा भरभरून वाहत सुटल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु कालव्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचणे कठीणच नाही तर अशक्य होते. परंतु धान पीक या वर्षी तरी वाचवायचे म्हणून शेतकऱ्यांनी कंबर कसली. आमदार बाळा काशिवार व किशोर पंचाभाई यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांचे धान पीक मरू देणार नाही पाणी शेतात पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, म्हणून दोन जेसीबी च्या साहायाने चक्क तीन किमी कालव्याचे खोदकाम करण्यात आले. यावेळी जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांनी श्रमदान केले. आमदार बाळा काशिवार यांनी नेरला उपसा सिंचन योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी देण्याचे मान्य केले.पेंढरी, सोनेगाव, हारादोली या तीन गावातील जवळपास ८५० एकर धान शेती सिंचीत होणार असून सतत कोरडे राहणारे चार तलाव पाण्याने तुडुंब भरणार आहेत. सदर कालव्याचे बांधकाम केल्यास या भागातील हजारो हेक्टर शेतजमीन सिंचित होऊन उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थीक स्तर नक्कीच उंचावणार आहे. यावेळी आ. बाळा काशिवार, किशोर पंचभाई, मनोज चुटे, माजी पं.स.सदस्य देविदास भोयर, सरपंच पेंढारी प्रदीप शेंडे, सरपंच तिरखुरी हरिषचंद्र गेडाम, पंचायत समिती सदस्य पुंडलिक पेलणे, बंडू बारसागडे, व शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणारतालुक्यातील चौरास भागात गोसे खुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे जाळे पसरले आहेत. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. ही बोंब या वर्षी सर्वच भागात ऐकायला मिळाली. त्यामुळे सर भागातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन सोडविल्या. शेतकऱ्यांची बाजू रास्त समजून त्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आमदार बाळा काशिवार यांनी सांगितले.