शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकचळवळीच्या रूपाने अभियान राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 21:43 IST

स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते, गावांची स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला रोगराईपासून मुक्त करता येते. त्यामुळे स्वच्छता ही सेवा व्यापक जनजागृती अभियान ग्रामस्तरावर लोकचळवळीच्या रूपाने राबवावे, असे आवाहन आरोग्य व बांधकाम समिती सभापती प्रेमदास वनवे यांनी केले.

ठळक मुद्देप्रेमदास वनवे : भंडारा जिल्ह्यात 'स्वच्छता ही सेवा' जनजागृती अभियानाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते, गावांची स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला रोगराईपासून मुक्त करता येते. त्यामुळे स्वच्छता ही सेवा व्यापक जनजागृती अभियान ग्रामस्तरावर लोकचळवळीच्या रूपाने राबवावे, असे आवाहन आरोग्य व बांधकाम समिती सभापती प्रेमदास वनवे यांनी केले.जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांचे वतीने जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचे जिल्हास्तरीय शुभारंभ व कार्यशाळेप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांचे समन्वयाने भंडारा जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, कार्यकारी अभियंता एम.बी मैदमवार, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, उप शिक्षणाधिकारी दुबे, भंडाराचे गट विकास अधिकारी नुतन सावंत, पवनीचे गट विकास अधिकारी अनिता तेलंग, तुमसरचे गट विकास अधिकारी मिलींद बडगे, साकोलीचे गट विकास अधिकारी सुनील तडस, मोहाडीचे गट विकास अधिकारी रविंद्र वंजारी, लाखनीचे गट विकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर, आरोग्य विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. लतीका गरूड, बालविकास प्रकल्प अधिकारी शितल फडके व अधिका-यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले. या प्रसंगी पाणी गुणवत्ता सल्लागार प्रशांत मडामे यांनी स्वच्छता ही सेवेची शपथ देवून स्वच्छतेसाठी कार्य, श्रमदान करण्याचे आवाहन केले.कृती आराखड्याचे सादरीकरणकार्यशाळे प्रसंगी वित्त नि संपादणूक सल्लागार बबन येरणे यांनी अंमलबजावणी आराखडयाचे वाचन करून ग्रामस्तरावर राबविण्यात येणा-या उपक्रमाची माहिती दिली. १५ सप्टेंबरपासून दर दिवशी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नियोजन सांगितले. अभियान काळात गट विकास अधिकारी यांनी ग्रामस्तरावर स्वच्छता ही सेवेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता तालुकास्तरावरून संपर्क अधिकारी नियुक्त करून संनियंत्रण करावे असे आवाहन करण्यात आले.कलापथकाच्या सादरीकरणातून प्रबोधनजिल्हास्तरीय शुभारंभ तथा कार्यशाळेत असर फाउंडेशनच्या वतीने कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा व्यापक जनजागृती अभियान कार्यक्रमाचे सादरीकरण कलापथकाचे माध्यमातून मांडण्यात आले. शाश्वत स्वच्छता, समग्र स्वच्छता, सेवा दिवस, स्वच्छता श्रमदानाचा महायज्ञ, स्वच्छ भारत दिवस व या अभियानाला लोकसहभागाची असलेली गरज यावर गित व बतावणी करून असरच्या फाऊडेशनच्या कलावंतांनी कार्यक्रमाचे सादरीकरण करून स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.ग्रामपंचायतींचा गौरवसन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होवून उत्कृष्ठ कार्य करणाºया ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळी करण्यात आला. अतिथींच्या हस्ते जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषीकाचे मानकरी ठरलेल्या ग्राम पंचातींचे सरपंच, उपसरपंच, सचिव यांना सन्मानपत्र व धनादेशाचे वितरण करण्यात आले. संचालन व आभार पाणी गुणवत्ता सल्लागार प्रशांत मडामे यांनी मानले.