शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
7
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
8
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
9
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
10
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
12
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
13
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
14
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
15
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
16
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
17
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
18
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
19
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
20
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी रेतीची रॉयल्टी माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:26 IST

गरीब व ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. अडचणी येतात त्याचा निपटारा झाला पाहिजे, त्यासाठी या लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. तसेच लोकांच्या आकांक्षा समजून घेवून त्या पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद : नकाशा शुल्क रद्दसाठी प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गरीब व ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. अडचणी येतात त्याचा निपटारा झाला पाहिजे, त्यासाठी या लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. तसेच लोकांच्या आकांक्षा समजून घेवून त्या पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.घरकुलाच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती कुठलीही रॉयल्टी न घेता उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. घरकुल योजनेकरीता नकाशा मंजूर करण्यासाठी लागणारे शुल्क रद्द करण्यासाठी शासन पुढाकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारला लोकसंवाद या कार्यक्रमातून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेंतर्गत पलॉट व पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. भडारा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), रमाई व शबरी घरकुल योजनेतील २२ लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होते.घरकुल योजना राज्यातील शेवटच्या नागरिकापर्यत पोहचेपर्यत चालूच राहणार आहे. या योजनेत यादीत नसलेल्या नागरिकांना सामावून घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती रॉयल्टी न घेता मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.या योजनेद्वारे देशातील सर्वसामान्यांना स्वत:चे हक्काचे घर असावे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत आहे. राज्यात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करुन दिल्या जातील. प्रत्येक नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईपर्यत योजना चालूच राहणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोक संवाद’ साधून जाणून घेतली. लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही लाईव्ह पाहता आला.लोकसंवादच्या पहिल्या पर्वात राज्यातील नंदूरबार, वर्धा, ठाणे, सातारा, नांदेड, लातूर, अमरावती, नागपूर, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, नाशिक, गडचिरोली जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. तर ठाणे, लातूर, नाशिक व नागपूर या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या घरासमोरुन संवाद साधला गेला. पुढील कार्यक्रमात इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार असे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी लाभार्थ्यांनी सांगितले की, आम्हाला स्वत:चे घर नव्हते, होते ते कच्चे व कुडाचे होते. पाऊस, वारा आदी आपत्तीने घर पडण्यासारखे झाले होते. अशा वेळी आवास योजनेच्या माध्यमातून स्वत:चे घर मिळाले. त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण झाले. शासनाचे खुप खुप आभारी आहोत, अशा प्रतिक्रीया लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत.गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. त्याबाबत मनमोकळा संवाद मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाभार्थ्यांशी साधला.शासनाच्या योजना म्हटले की, त्यामध्ये त्रृटी व व्यवहार असा समज आहे. मात्र घरकुल योजना प्रशासनाने अतिशय प्रामाणिकपणे गरजु लाभार्थ्यांपर्यंत पोहचविली आहे. घरकुल मंजूरीसाठी कुणालाही काहीच द्यावे लागले नाही, असे ठामपणे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. प्रशासनाने घरकुल योजनेत उत्तम काम केले असून शासनाच्या इतर योजनामध्येही असेच काम करावे, असे सांगून मुख्यमत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी जिल्ह्यातील २२ लाभार्थी उपस्थित होते.