शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

भंडारा : दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होत्या. मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या ...

भंडारा : दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होत्या. मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होणार आहेत. मात्र शिक्षण मंडळाने परीक्षेची तयारी करुन कोऱ्या उत्तरपत्रिका संबंधित जिल्ह्यांच्या कस्टडीत पाठविल्या होत्या. आता या उत्तरपत्रिका मुख्याध्यापकांच्या जबाबदारीत असल्याने टेंशन अधिकच बळावले आहे. भंडारा जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या १८ हजार ११० तर बारावीचे १५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला बसणार आहेत. कोरोना परिस्थितीमुळे तब्बल एक महिना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तयारी अंतर्गत बोर्डाने उत्तरपत्रिका व अन्य साहित्य संबंधित जिल्ह्यात पाठविले. आता हेच साहित्य सुरक्षिततेच्या दृष्टीने डोईजड ठरल्याचेही दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात कस्टडीयन म्हणून भंडारा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची निवड करण्यात आली.

परीक्षा कधी? पुढील प्रवेश कधी?

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या व जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. मात्र यात विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन शैक्षणिक करिअरवर परिणाम होऊ नये याची काळजी शिक्षण विभागाने घेतली आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर निकालाचे टेंशन राहणार आहे. त्यासोबतच पुढील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी ऑगस्ट महिना प्राथमिकदृष्ट्या गृहित धरण्यात आल्याची माहिती आहे. मात्र कोरोना परिस्थिती पाहता यात बदल होईल काय अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मुख्याध्यापक म्हणतात....

तब्बल एक महिना परीक्षा समोर ढकलल्याने नियोजनही थोडेफार विस्कटले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने नियोजन आखून काम करावे लागणार आहे.

-गौरीशंकर सलामे, सावरला

कोरोना स्थितीमुळे दहावी व बारावीच्या परीक्षा लांबल्या आहेत. विद्यार्थ्यांची कसोटी पणाला लागली आहे. त्यातच मुख्याध्यापकांचे ही टेंशन वाढले आहे.

-सुनील घोल्लर, फुलमोगरा

शहरातील ऐतिहासिक शाळा असलेली लालबहादूर शाळेत कोविड सेंटर आहे. त्यातच आता कस्टडीयनची जबाबदारी अंतर्गत परीक्षेच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व अन्य साहित्य आहेत. वेळीच कोरोना स्थितीमुळे विविध साहित्याची मागणी केली जाते. अशा स्थितीत शिक्षकांचीही नियुक्ती व अन्य कामांमुळे टेंशन अधिकच बळावले आहे. शास्त्री विद्यालयाचे परीक्षा केंद्रही अन्य ठिकाणी नेण्यात येईल अशी प्राथमिक माहिती आहे.

-केशर बोकडे, मुख्याध्यापिका, लालबहादूर विद्यालय, भंडारा.

हे साहित्य कस्टडीत

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरु होणार आहेत. दहावी - बारावीचे विद्यार्थी एकत्रित केल्यास आकडा ३४ हजारांच्या वर जातो. अशा स्थितीत कोऱ्या उत्तरपत्रिकांचा ढीग शाळेत ठेवण्यात आला आहे.

अन्य साहित्यांमध्ये पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राफ्टर, स्टीकर, एबी लिस्ट, विषयनिहाय व माध्यम निहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदी बोर्डाकडून प्राप्त झाले आहेत. या साहित्यांची सुरक्षितता व काळजी घ्यायची आहे.

विद्यार्थ्यांची परीक्षाच

नियोजनाप्रमाणे एप्रिल महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा होणार होत्या. मात्र कोरोना रुग्णांच्या उद्रेकामुळे परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आल्या. आधीच शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाईन होतील अशी घोषणा केली होती. यात कुठलाही बदल सध्यातरी झालेला नाही. एप्रिल महिन्याच्या परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी सुरु केली होती. वेळेवर परीक्षा समोर ढकलण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला. पेपर देऊन एकदाचे टेंशन फ्री व्हावे असे विद्यार्थ्यांना वाटते. मात्र कोरोनामुळे परीक्षाच लांबणीवर गेल्याने विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जोमाने अभ्यासाला लागायचे आहे. आधी तयारी नंतर नियोजन विस्कटल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची परीक्षाच देण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाच्या काहिलीत या परीक्षा होणार आहेत.