शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

भंडारा : दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होत्या. मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या ...

भंडारा : दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होत्या. मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होणार आहेत. मात्र शिक्षण मंडळाने परीक्षेची तयारी करुन कोऱ्या उत्तरपत्रिका संबंधित जिल्ह्यांच्या कस्टडीत पाठविल्या होत्या. आता या उत्तरपत्रिका मुख्याध्यापकांच्या जबाबदारीत असल्याने टेंशन अधिकच बळावले आहे. भंडारा जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या १८ हजार ११० तर बारावीचे १५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला बसणार आहेत. कोरोना परिस्थितीमुळे तब्बल एक महिना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तयारी अंतर्गत बोर्डाने उत्तरपत्रिका व अन्य साहित्य संबंधित जिल्ह्यात पाठविले. आता हेच साहित्य सुरक्षिततेच्या दृष्टीने डोईजड ठरल्याचेही दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात कस्टडीयन म्हणून भंडारा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची निवड करण्यात आली.

परीक्षा कधी? पुढील प्रवेश कधी?

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या व जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. मात्र यात विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन शैक्षणिक करिअरवर परिणाम होऊ नये याची काळजी शिक्षण विभागाने घेतली आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर निकालाचे टेंशन राहणार आहे. त्यासोबतच पुढील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी ऑगस्ट महिना प्राथमिकदृष्ट्या गृहित धरण्यात आल्याची माहिती आहे. मात्र कोरोना परिस्थिती पाहता यात बदल होईल काय अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मुख्याध्यापक म्हणतात....

तब्बल एक महिना परीक्षा समोर ढकलल्याने नियोजनही थोडेफार विस्कटले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने नियोजन आखून काम करावे लागणार आहे.

-गौरीशंकर सलामे, सावरला

कोरोना स्थितीमुळे दहावी व बारावीच्या परीक्षा लांबल्या आहेत. विद्यार्थ्यांची कसोटी पणाला लागली आहे. त्यातच मुख्याध्यापकांचे ही टेंशन वाढले आहे.

-सुनील घोल्लर, फुलमोगरा

शहरातील ऐतिहासिक शाळा असलेली लालबहादूर शाळेत कोविड सेंटर आहे. त्यातच आता कस्टडीयनची जबाबदारी अंतर्गत परीक्षेच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व अन्य साहित्य आहेत. वेळीच कोरोना स्थितीमुळे विविध साहित्याची मागणी केली जाते. अशा स्थितीत शिक्षकांचीही नियुक्ती व अन्य कामांमुळे टेंशन अधिकच बळावले आहे. शास्त्री विद्यालयाचे परीक्षा केंद्रही अन्य ठिकाणी नेण्यात येईल अशी प्राथमिक माहिती आहे.

-केशर बोकडे, मुख्याध्यापिका, लालबहादूर विद्यालय, भंडारा.

हे साहित्य कस्टडीत

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरु होणार आहेत. दहावी - बारावीचे विद्यार्थी एकत्रित केल्यास आकडा ३४ हजारांच्या वर जातो. अशा स्थितीत कोऱ्या उत्तरपत्रिकांचा ढीग शाळेत ठेवण्यात आला आहे.

अन्य साहित्यांमध्ये पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राफ्टर, स्टीकर, एबी लिस्ट, विषयनिहाय व माध्यम निहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदी बोर्डाकडून प्राप्त झाले आहेत. या साहित्यांची सुरक्षितता व काळजी घ्यायची आहे.

विद्यार्थ्यांची परीक्षाच

नियोजनाप्रमाणे एप्रिल महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा होणार होत्या. मात्र कोरोना रुग्णांच्या उद्रेकामुळे परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आल्या. आधीच शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाईन होतील अशी घोषणा केली होती. यात कुठलाही बदल सध्यातरी झालेला नाही. एप्रिल महिन्याच्या परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी सुरु केली होती. वेळेवर परीक्षा समोर ढकलण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला. पेपर देऊन एकदाचे टेंशन फ्री व्हावे असे विद्यार्थ्यांना वाटते. मात्र कोरोनामुळे परीक्षाच लांबणीवर गेल्याने विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जोमाने अभ्यासाला लागायचे आहे. आधी तयारी नंतर नियोजन विस्कटल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची परीक्षाच देण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाच्या काहिलीत या परीक्षा होणार आहेत.