शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

मातीत राबण्यास बैल झाले सज्ज

By admin | Updated: June 15, 2016 00:45 IST

आपल्या कामाचे दिवस आले, उत्सवाचे दिवस आले की सर्वांना आनंद वाटतो. अशीच स्थिती प्रत्येक पशु-पक्ष्यांत आणि जनावरांमध्येसुध्दा पहायला मिळते.

शेतीच्या कामांना वेग : पेरणीच्या कामासाठी बळीराजाची तयारीवरठी : आपल्या कामाचे दिवस आले, उत्सवाचे दिवस आले की सर्वांना आनंद वाटतो. अशीच स्थिती प्रत्येक पशु-पक्ष्यांत आणि जनावरांमध्येसुध्दा पहायला मिळते. पावसाळ्याचा पहिला पाऊस पडताच बैलांनासुध्दा आनंद वाटतो. आपली शिंगे मातीत गाडून चेहरा-मोहरा रंगवून बैल या नवीन हंगामाचा आनंद व्यक्त करताना दिसतात.पावसाळ्याचे दिवस येताच बळीराजा सावधान होतो आणि आपल्या शेतीच्या कामाला लागून राहतो. शेतीचे कामे नसल्याने फेब्रुवारीपासून बैलांनासुध्दा आराम करायला मिळतो. उन्हाळा माणसालाच नाही तर जनावरांनासुध्दा कष्टदायी असतो. या काळात पिण्याच्या पाण्याची अडचण, चाऱ्यांची समस्या, उष्णतेचा उकाडा आदी समस्या निर्माण होत असल्याने उन्हाळ्याचे दिवस सर्वांनाच न आवडणारे असतात. भारतीय संस्कृतीत शेती कामाला, सण उत्सवाला अशा अनेक कार्यात नक्षत्राला खूप महत्व दिले आहे. मृग नक्षत्र ७ जूनला लागल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येतो. याच नक्षत्रात पेरण्याचे काम जोमात सुरू केले जातात. रोहणी नक्षत्र आणि मृृग नक्षत्र आले की शेतीच्या कामाचे दिवस आल्याची भावना सर्वसामान्यात दृढ झाल्याचे दिसून येते. या नक्षत्रात भरपूर पाऊस आला तर बळीराजा सुखावला व आनंदीत झाला, अशी सर्वांची समजूत असते. यावर्षीसुध्दा रोहणी आणि मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसहीत जनावरातसुध्दा आनंद निर्माण झालेला आहे. रोहिणीचे पाणी पडले तेव्हा बैलांनासुध्दा आनंद झालेला आहे. बैलांना असा आभास झाला असावा की, आता आपल्या कामाचे दिवस आलेत. म्हणजेच बैलांच्या श्रमाचे दिवस जवळ आलेले आहेत. (वार्ताहर)