शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अतिक्रमणावर पुन्हा बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:52 IST

शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमण बाबतीत शुक्रवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ करण्यात आली.

ठळक मुद्देनोटीसला तिलांजली : नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमण बाबतीत शुक्रवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ करण्यात आली.त्रिमूर्ती चौक ते शास्त्री चौक तथा शहराील अन्य मार्गावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात यावेळी पालिका किंवा बांधकाम खात्याने नोटीस न बजावता दवंडीव्दारे अतिक्रमण हटविण्याचे सूचना दिली होती. यात विशेष म्हणजे रस्त्याच्या दुर्तफा थाटलेल्या दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढायला सुरूवात होती. पर्यायी व्यवस्था न करता दरवेळी होत असलेल्या कारवाईमुळे फुटपाथ दुकादारांमध्ये कमालीचा असंतोष दिसून आला.गत तीन वर्षात जवळपास तीनवेळा शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबविण्यात आली. मात्र त्यानंतर स्थिती जैसे थे अशीच आहे. स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनानेही पर्यायी व्यवस्थेबाबत अजुनपर्यंत ठोस पाऊले उचललेली नाहीत. पर्यायी जागेबाबत फक्त सुचना व सल्ला देण्याची मानसीकता प्रशासनाने ठेवल्याने फुटपाथ दुकानदारांमध्येही कमालीचा असंतोष व्याप्त आहे.व्यवसाय हिरावल्याने रोषअतिक्रमण काढण्यापूर्वी फुटपाथ दुकानदारांची पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन फुटपाथ शिवसेना संघटनेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले होते. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी १५ फेब्रुवारी २०१८ ला नगर पालिका प्रशासनाला पत्र बजावून पर्यायी व्यवस्थेसाठी सूचना दिली होती. मात्र, पालिकेने त्या पत्रावर अजुनपर्यंत दखल घेतलेली नाही. फुटपाथ दुकानदारांची नोंदणीकरीता पालिकेने २१० रूपये घेवून पावतीही दिली. तसेच प्रतिदिन १० रूपये रोज करवसुलीही सुद्धा घेण्यात येते. त्याउलट शुक्रावरी सरळ कारवाई करून फुटपाथ दुकानदारांचा व्यवसाय हिसकावून घेण्यात आला, असा आरोप फुटपाथ शिवसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अख्तर बेग मिर्झा यांनी केला आहे.पार्किंगला तिलांजलीभंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या वर पोहचली आहे. वाढत्या नागरीकरणाच्या माध्यमातून शहराची व्याप्तीही वाढू लागली. शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यामानाने व्यापारी प्रतिष्ठानेही झपाट्याने वाढली. विशेष म्हणजे पार्किंग व्यवस्था नसलेल्या भंडारा शहरात अतिक्रमणाने गंभीर रूप प्राप्त केले. मागील दोन दशकांपासून रस्त्याच्या कडेला फेरीवाले तथा लघु व्यवसायिकांनी दुकान थाटले आहेत. शहरातील मुख्य रस्ता आधीच अरूंद असताना त्याातही वाढत्या अतिक्रमणाने समस्येत भर घातली. मात्र पर्यायी व्यवस्थेबाबत प्रशासनानेही पुढाकार घेतला नाही. परिणामी शहरात पार्किंग व्यवस्थेला तिलांजली देण्यात आली आहे.नियमाप्रमाणे सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. मात्र शहरात दवंडी देवून अतिक्रमण काढण्याची सूचना देण्यात आली होती. पोलिस दलाचे सहकार्य मिळाल्याने संयुक्तपणे अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात जवळपास ३००च्या जवळपास अतिक्रमण काढण्यात आले.-ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, नगर पालिका, भंडारा