शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

अतिक्रमणावर पुन्हा बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:52 IST

शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमण बाबतीत शुक्रवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ करण्यात आली.

ठळक मुद्देनोटीसला तिलांजली : नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमण बाबतीत शुक्रवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ करण्यात आली.त्रिमूर्ती चौक ते शास्त्री चौक तथा शहराील अन्य मार्गावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात यावेळी पालिका किंवा बांधकाम खात्याने नोटीस न बजावता दवंडीव्दारे अतिक्रमण हटविण्याचे सूचना दिली होती. यात विशेष म्हणजे रस्त्याच्या दुर्तफा थाटलेल्या दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढायला सुरूवात होती. पर्यायी व्यवस्था न करता दरवेळी होत असलेल्या कारवाईमुळे फुटपाथ दुकादारांमध्ये कमालीचा असंतोष दिसून आला.गत तीन वर्षात जवळपास तीनवेळा शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबविण्यात आली. मात्र त्यानंतर स्थिती जैसे थे अशीच आहे. स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनानेही पर्यायी व्यवस्थेबाबत अजुनपर्यंत ठोस पाऊले उचललेली नाहीत. पर्यायी जागेबाबत फक्त सुचना व सल्ला देण्याची मानसीकता प्रशासनाने ठेवल्याने फुटपाथ दुकानदारांमध्येही कमालीचा असंतोष व्याप्त आहे.व्यवसाय हिरावल्याने रोषअतिक्रमण काढण्यापूर्वी फुटपाथ दुकानदारांची पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन फुटपाथ शिवसेना संघटनेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले होते. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी १५ फेब्रुवारी २०१८ ला नगर पालिका प्रशासनाला पत्र बजावून पर्यायी व्यवस्थेसाठी सूचना दिली होती. मात्र, पालिकेने त्या पत्रावर अजुनपर्यंत दखल घेतलेली नाही. फुटपाथ दुकानदारांची नोंदणीकरीता पालिकेने २१० रूपये घेवून पावतीही दिली. तसेच प्रतिदिन १० रूपये रोज करवसुलीही सुद्धा घेण्यात येते. त्याउलट शुक्रावरी सरळ कारवाई करून फुटपाथ दुकानदारांचा व्यवसाय हिसकावून घेण्यात आला, असा आरोप फुटपाथ शिवसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अख्तर बेग मिर्झा यांनी केला आहे.पार्किंगला तिलांजलीभंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या वर पोहचली आहे. वाढत्या नागरीकरणाच्या माध्यमातून शहराची व्याप्तीही वाढू लागली. शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यामानाने व्यापारी प्रतिष्ठानेही झपाट्याने वाढली. विशेष म्हणजे पार्किंग व्यवस्था नसलेल्या भंडारा शहरात अतिक्रमणाने गंभीर रूप प्राप्त केले. मागील दोन दशकांपासून रस्त्याच्या कडेला फेरीवाले तथा लघु व्यवसायिकांनी दुकान थाटले आहेत. शहरातील मुख्य रस्ता आधीच अरूंद असताना त्याातही वाढत्या अतिक्रमणाने समस्येत भर घातली. मात्र पर्यायी व्यवस्थेबाबत प्रशासनानेही पुढाकार घेतला नाही. परिणामी शहरात पार्किंग व्यवस्थेला तिलांजली देण्यात आली आहे.नियमाप्रमाणे सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. मात्र शहरात दवंडी देवून अतिक्रमण काढण्याची सूचना देण्यात आली होती. पोलिस दलाचे सहकार्य मिळाल्याने संयुक्तपणे अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात जवळपास ३००च्या जवळपास अतिक्रमण काढण्यात आले.-ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, नगर पालिका, भंडारा