शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:13 IST

गेल्या अनेक वर्षापासून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. शहराची वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता भंडारा शहराचा सर्वकष आराखडा तयार करणे आवश्यक असून नगर पालिकेने पुढील ३० वर्षाचा डोळयासमोर ठेवून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : नगर पालिका कामाचा आढावा, दूषित पाणी असलेल्या प्रभागात ‘आरो प्लांट’चा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गेल्या अनेक वर्षापासून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. शहराची वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता भंडारा शहराचा सर्वकष आराखडा तयार करणे आवश्यक असून नगर पालिकेने पुढील ३० वर्षाचा डोळयासमोर ठेवून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.नगर पालिकेच्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडाळे, उपनगराध्यक्ष आशु गोंडाणे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक व विभाग प्रमुख उपस्थित होते.भंडारा शहरासाठी शासनाने ५६ कोटी रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्णत्वास येण्यास दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत भंडारा शहरवासियांना पुरेसे पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी नगर परिषदेने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.प्रत्येक प्रभागात एक आरो प्लांट बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून चर्चा करावी, असे ते म्हणाले. दिवाळीच्या आत किमान २० आरो प्लाँट बसविण्याचे नियोजन करावे. नगरपालिकेच्या विविध विभागाचा अखर्चित निधी ५२ कोटी रुपयांच्या जवळपास असून अखर्चित निधीची माहिती कारणासह सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगर पालिकेची बैठक दर महिन्याला घेवून लेखा विभागाने अखर्चित निधी विकास कामाबाबत नगरसेवकांनी माहिती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विकास कामांचे नियोजन करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात यावेत, असे ते म्हणाले. विकास कामाचे जिओ टॅगिग, छायाचित्र व चित्रिकरण अनिवार्य असून या बाबतची माहिती वेळोवेळी नगरपरिषद सदस्यांना देण्याची सूचना त्यांनी केली.जिल्हा नियोजनचा निधी दिवाळी पूर्वी खर्च करण्यात यावा अन्यथा निधी परत घेवू असेही पालकमंत्री यांनी सांगितले. नगर परिषदेचा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक असून जो विभाग निधी परत करेल त्या विभागाच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले. पहिले निधी खर्च करा व नंतरच निधी मिळवा, असे ते म्हणाले.नगर पालिकेच्या बजेटची एक प्रत नगर सेवकांना देण्यात यावी असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शहरातील गरजू व्यक्तींना घरकूल देण्याबाबत प्रधानमंत्री आवास योजना प्राधान्याने राबविण्यात यावी. यासाठी नगर पालिकेने म्हाडाला प्रस्ताव पाठवावा, असे त्यांनी सांगितले. घरकूल योजनेसाठी लागणाºया आवश्यक परवानग्या घेतांनाच जागेचा अभाव असल्यास बहुमजली इमारतीचा आराखडा तयार करावा. नगर पालिकेच्या विकास कामाचे आराखडे तपासण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्तरीय अधिकारी व नगर रचनाकार यांची नियुक्ती करावी, असे त्यांनी सूचविले.दलित वस्ती योजनेत सिमेंट रस्ते न घेता मुलभूत सुविधेची कामे करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या तक्रारी असून कचरा व्यवस्थापन योग्य रितीने करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.