शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

‘त्या’ पुलाचे बांधकाम करा

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

पहेला-गोलेवाडी मार्गावरील प्रलंबित पुलाचे बांधकाम व त्यासमोरील रस्त्याचे दुरूस्तीच्या बांधकामाचे ग्रामपंचायत गोलेवाडी व मिन्सीकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोलेवाडी, मिन्सीवासीयांची मागणीभंडारा : पहेला-गोलेवाडी मार्गावरील प्रलंबित पुलाचे बांधकाम व त्यासमोरील रस्त्याचे दुरूस्तीच्या बांधकामाचे ग्रामपंचायत गोलेवाडी व मिन्सीकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पहेला ते गोलेवाडी मार्गावर नाल्यावरील १० ते १५ वर्षापासून पूल व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्याकरिता संबंधित विभागासी विविध प्रकारचा पत्रव्यवहार, निवेदने, ठराव आदी प्रकारचे दस्तऐवज सादर केल्यानंतरही त्याकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष केले जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देवून वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर काम सुरू करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व गोसेखुर्द विभाग या दोन्ही विभागाचे योग्य ताळमेळ जुळत नसल्यामुळे काम सुरू करण्यासाठी अडसर निर्माण होत आहे. काम सुरू करण्यासंदर्भात दोन्ही विभागामार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण असून सुद्धा काम सुरू करता येत नसल्याचे सांगितले जात आहे. या मार्गाने गोलेवाडी, मिन्सी, पन्नासी, लहानमिन्सी, येटेवाही, तिर्री आदी गावावरून नागरिक येणे जाणे करतात. पहेला हीच परिसरातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे व्यापाऱ्यांना खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पहेला येथे शैक्षणिक केंद्र असल्यामुळे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास अडचण निर्माण होत आहे. रस्त्यावरून जाता येताना अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. रात्रीच्या वेळेस जाण्या येण्यास नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्याच्या दिवसात तर नाल्याला पूर आल्यानंतर ४-५ दिवस रस्ता बंद असल्यामुळे व्यापारी वर्गाला आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील पुरामुळे वाहतूक बंद असतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून प्रलंबित पुलाचे बांधकाम व त्यापुढील रस्ता दुरूस्तीचे काम येत्या १० दिवसात तत्काळपणे सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले. तत्काळपणे काम सुरू न केल्यास गोलेवाडी, मिन्सी, पन्नासी, लहानमिन्सी, येटेवाही, तिर्री आदी सर्व नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. होणाऱ्या संबंधित परिणामास आपण स्वत: जबाबदार असला, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सरपंच दिपक पाटील, सरपंच रूपा शेंडे, दिपक बांगडे, सदस्य पराग हटवार, प्रभू मडावी, जालंदर दहिवले, गिता मडावी, आरती गणवीर, अनिता गणवीर, अनिता मडावी, राधा शेंद्रे, उपसरपंच मिलिंद रंगारी, अजित काटेखाये, एकनाथ शेंडे, ब्रम्हानंद शेंडे, जयंता शेंडे, अमृत शेंडे, संगणक परिचालक जितेंद्र वंजारी हजर होते. (नगर प्रतिनिधी)