शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वाघ नदीवर बंधारा बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:16 IST

राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे .....

ठळक मुद्देप्रकल्प मागणी प्रस्ताव : सिंचन व पाणीटंचाईला मिळणार जीवन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांसाठी सिंचन व पाणी टंचाईला नवजीवन मिळणार आहे.आमगाव व सालेकसा तालुक्यातील राज्य सीमेवर वाघनदीमधून जलस्त्रोताचे मोठे साधन आहे. परंतु या नदीवर सिंचनासाठी बंधारे प्रकल्प उभारले नसल्याने सिंचनासाठी वाव नाही. परिणामी मोठे जलस्त्रोत जवळ असून दरवर्षी या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणी टंचाई असल्यामुळे शेतकºयांना ओलीत शेतीमध्ये पीक घेण्यापासून वंचित व्हावे लागले आहे.आमगाव तालुक्यातील भौगोलिक परिक्षेत्र ३२१०५.६७ हे. आहे. यात बागाईत सिंचन जमिनीचे क्षेत्र ११८५१ हे. आहे. तर २१९३४.६८ हेक्टर जमीन पिकाखाली आहे. तालुक्यातील जलसिंचनाच्या साधनांमध्ये ३१ कालवे, तलाव ६१ व विहिरी १८०९ यात ११८५१ हेक्टर परिक्षेत्र व्यापले आहे. जलसिंचन स्त्रोतांचे साधने २९७ आहेत. परंतु या जलस्त्रांमध्ये स्थिर सिंचन स्त्रोत नाही. नदी, कालवे यांच्या पात्रातून वाहणारे पाण्यामुळे फक्त काही कालावधीपुरते जलसिंचन होते. परंतु बदलत्या वातावरणात हिवाळा व उन्हाळ्यामध्येच पाणी टंचाईला समोर जावे लागते. तर उपलब्ध जलस्त्रोत कमी पावसामुळे व सिंचन साधनांची उपयोगिता कालबाह्य झाल्यामुळे हे स्त्रोतही सिंचनासाठी उपयोगाचे ठरले नाही. आमगाव-सालेकसा हे तालुके राज्य सीमेवर आहेत. यात आमगाव तालुक्याची लोकसंख्या एकंदरीत एक लाख ५० हजारच्या जवळ पोहोचली आहे.शेतकºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु दरवर्षी पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे शेतकºयांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अनेक शेतकरी सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पीक घेण्यापासून वंचित होतात. त्यामुळे या परिक्षेत्रात मोठ्या सिंचन सुविधेसाठी उपलब्ध असलेल्या वाघनदीवर बंधारा बांधण्याची मागणी आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्प उभारल्यास शेतकरी व नागरिकांना मुबलक पाणी, सिंचनासाठी पाणी मिळेल व पाणी टंचाईची समस्या मार्गी लागेल. यासाठी या प्रकल्पाचे प्रारूप प्रस्ताव सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी तयार केले आहे. सदर प्रकल्पाचा प्रस्ताव शेतकरी व नागरिकांच्या हिताचा असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळावी व निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी लेखी निवेदन शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे.प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांना आधारजलस्त्रोत वाहते असल्याने फक्त काही कालावधी पुरते सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. परंतु वर्षातील उर्वरित सलग दहा महिन्याच्या कोरड्या व ओसाड दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळाले नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या नदीवर बंधारा प्रकल्प उभारल्यास शेतकरी व नागरिकांना आधार मिळू शकेल. या प्रकल्पाचा प्रस्ताव भविष्यात अधिक फलदायी ठरणार आहे. या प्रकल्पाला शासनाने मंजुरी द्यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर, महारीटोला येथील सरपंच भरतलाल बावनथडे, निर्जला टेंभरे (टाकरी), शोभा मेश्राम (गिरोला), मनोज ब्राम्हणकर (सुपलीपार), सुनील ब्राम्हणकर (भोसा), सुमेंद्र उपराडे (सावंगी), रेखा मच्छिरके (पिपरटोला), भेजलाल पटले (बाम्हणी), आशा बिसेन (ननसरी), खेमराज बावनकर (जामखारी), सुनिता तुरकर (अंजोरा) यांनी पुढाकार घेतला आहे.