शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वाघ नदीवर बंधारा बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:16 IST

राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे .....

ठळक मुद्देप्रकल्प मागणी प्रस्ताव : सिंचन व पाणीटंचाईला मिळणार जीवन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांसाठी सिंचन व पाणी टंचाईला नवजीवन मिळणार आहे.आमगाव व सालेकसा तालुक्यातील राज्य सीमेवर वाघनदीमधून जलस्त्रोताचे मोठे साधन आहे. परंतु या नदीवर सिंचनासाठी बंधारे प्रकल्प उभारले नसल्याने सिंचनासाठी वाव नाही. परिणामी मोठे जलस्त्रोत जवळ असून दरवर्षी या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणी टंचाई असल्यामुळे शेतकºयांना ओलीत शेतीमध्ये पीक घेण्यापासून वंचित व्हावे लागले आहे.आमगाव तालुक्यातील भौगोलिक परिक्षेत्र ३२१०५.६७ हे. आहे. यात बागाईत सिंचन जमिनीचे क्षेत्र ११८५१ हे. आहे. तर २१९३४.६८ हेक्टर जमीन पिकाखाली आहे. तालुक्यातील जलसिंचनाच्या साधनांमध्ये ३१ कालवे, तलाव ६१ व विहिरी १८०९ यात ११८५१ हेक्टर परिक्षेत्र व्यापले आहे. जलसिंचन स्त्रोतांचे साधने २९७ आहेत. परंतु या जलस्त्रांमध्ये स्थिर सिंचन स्त्रोत नाही. नदी, कालवे यांच्या पात्रातून वाहणारे पाण्यामुळे फक्त काही कालावधीपुरते जलसिंचन होते. परंतु बदलत्या वातावरणात हिवाळा व उन्हाळ्यामध्येच पाणी टंचाईला समोर जावे लागते. तर उपलब्ध जलस्त्रोत कमी पावसामुळे व सिंचन साधनांची उपयोगिता कालबाह्य झाल्यामुळे हे स्त्रोतही सिंचनासाठी उपयोगाचे ठरले नाही. आमगाव-सालेकसा हे तालुके राज्य सीमेवर आहेत. यात आमगाव तालुक्याची लोकसंख्या एकंदरीत एक लाख ५० हजारच्या जवळ पोहोचली आहे.शेतकºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु दरवर्षी पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे शेतकºयांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अनेक शेतकरी सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पीक घेण्यापासून वंचित होतात. त्यामुळे या परिक्षेत्रात मोठ्या सिंचन सुविधेसाठी उपलब्ध असलेल्या वाघनदीवर बंधारा बांधण्याची मागणी आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्प उभारल्यास शेतकरी व नागरिकांना मुबलक पाणी, सिंचनासाठी पाणी मिळेल व पाणी टंचाईची समस्या मार्गी लागेल. यासाठी या प्रकल्पाचे प्रारूप प्रस्ताव सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी तयार केले आहे. सदर प्रकल्पाचा प्रस्ताव शेतकरी व नागरिकांच्या हिताचा असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळावी व निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी लेखी निवेदन शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे.प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांना आधारजलस्त्रोत वाहते असल्याने फक्त काही कालावधी पुरते सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. परंतु वर्षातील उर्वरित सलग दहा महिन्याच्या कोरड्या व ओसाड दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळाले नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या नदीवर बंधारा प्रकल्प उभारल्यास शेतकरी व नागरिकांना आधार मिळू शकेल. या प्रकल्पाचा प्रस्ताव भविष्यात अधिक फलदायी ठरणार आहे. या प्रकल्पाला शासनाने मंजुरी द्यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर, महारीटोला येथील सरपंच भरतलाल बावनथडे, निर्जला टेंभरे (टाकरी), शोभा मेश्राम (गिरोला), मनोज ब्राम्हणकर (सुपलीपार), सुनील ब्राम्हणकर (भोसा), सुमेंद्र उपराडे (सावंगी), रेखा मच्छिरके (पिपरटोला), भेजलाल पटले (बाम्हणी), आशा बिसेन (ननसरी), खेमराज बावनकर (जामखारी), सुनिता तुरकर (अंजोरा) यांनी पुढाकार घेतला आहे.