शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ‘बीटीबी’ महापुराच्या गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे. परंतु २९ ऑगस्टच्या रात्री वैनगंगेच्या महापुराचे पाणी बीटीबी सब्जीमंडीत शिरले. पाहतापाहता संपूर्ण सब्जीमंडी पुराच्या विळख्यात सापडली.

ठळक मुद्देप्रशासनाकडून दुर्लक्ष :शेतकरी, व्यापारी, ग्राहकही संकटात, नुकसानीची पाहणी करण्यास कुणाला सवड नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांना समृध्द करणारी येथील बीटीबी सब्जीमंडी वैनगंगेच्या महापुराने गाळात रुतली. एका रात्री होत्याचे नव्हते झाले. बीटीबीला बेटाचे रुप आले होते. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकही संकटात आले. मात्र पुर ओसरुन आता पंधरा दिवस झाले तरी शासन आणि प्रशासनाच्यावतीने साधी विचारपूसही करण्यात आली नाही.येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे. परंतु २९ ऑगस्टच्या रात्री वैनगंगेच्या महापुराचे पाणी बीटीबी सब्जीमंडीत शिरले. पाहतापाहता संपूर्ण सब्जीमंडी पुराच्या विळख्यात सापडली. तेथील भाजीपाला, कॅरेटस् पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर तेथे असलेले वाहनही तीन दिवस ३० फुट पाण्यात होती. बीटीबी सब्जीमंडीच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. प्रत्येकजण याबाबत हळहळ व्यक्त करीत होते. आता पूर ओसरल्यानंतर बीटीबी सब्जीमंडी ओस पडल्याचे दृष्य आहे. शासनाकडून मदत मिळण्याची आशा आहे. परंतु ना अधिकाऱ्यांनी ना लोकप्रतिनिधींनी सब्जीमंडीला भेट दिली. साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.प्रशासनाने महापुराची वेळीच सूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान बीटीबीचे झाले नसते, एवढे बोलले जात आहे. बीटीबीने विविध सामाजिक उपक्रमात शासन आणि प्रशासनाला मदत केली. परंतु बीटीबी संकटात असताना कुणीही अद्यापपर्यंत मदतीला धावून आले नाही. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेने तीन दिवसाचा जनता कफर्यू लागू केला. यात जीवनावश्यक वस्तूंना सुट देण्यात आली. मात्र शेतकऱ्यांचा भाजीपाल्यांचा विचार करण्यात आला नाही. बीटीबी थेट तीन दिवस बंद करण्याचा आदेश मिळाला त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आधीच महापुराने उद्ध्वस्त झालेली बीटीबी सावरण्याचा प्रयत्न करीत असताना प्रशासन मात्र कोणतीही सहकार्य करतांना दिसत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाल्यातून समृध्दीची वाट दाखविणाºया बीटीबीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करीत आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळीच सूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान निश्चितच टाळता आले असते. पंरतु कोणतीच पूर्वसूचना मिळाली नाही. त्यामुळे बेसावध क्षणी बीटीबी सब्जीमंडी उद्ध्वस्त झाली. शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मदत करावी.- बंडू बारापात्रे,अध्यक्ष बीटीबी

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार