शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तुमसरच्या जगप्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्र विस्तारीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 13:49 IST

तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला ब्रेक लागला असून, गत ११९ वर्षांत या खाणींचे क्षेत्र वाढविण्यात आले नाही.

ठळक मुद्देखाण परिसरातील गावांत मूलभूत सोयी सुविधांचा अभाव

मोहन भोयर

भंडारा : तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला जंगल व्याप्त परिसर आणि शेजारी असलेल्या गावांचा मोठा फटका बसत आहे. गत ११९ वर्षांत एकादाही खाण क्षेत्र वाढविण्यात आले नाही. खाणींचे विस्तारीकरण झाल्यास येथे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.

देशात डोंगरी बु. येथील खुली आणि तिरोडी येथील भूमिगत खाण देशात अव्वल आहे. मँगनीज हा धातू बहुपयोगी असून औषधी, फर्टीलायझर, लोखंड तयार करण्यासाठी उपयोगात येतो. सध्या देशात सर्वात जास्त मँगनीज गुजरात राज्यात जात आहे. सर्वे ऑफ इंडियाने येथे सर्वेक्षण करून भूगर्भात मँगनीजचा मोठा साठा असल्याचा अहवाल दिला होता. याशिवाय तुमसर तालुक्यातील कारली, गारकाभोंगा, आसलपाणी, झंझेरीया, रोंघा, येदरबुची, घानोड, सक्करदरा, हिवरा(मोहाडी) या परिसरात मँगनीजचा साठा भूगर्भात आहे.

१९८० मध्ये राखीव वन कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे खाण क्षेत्र विस्तारीकरणाला अडचण निर्माण झाली. खाण क्षेत्र विस्तारीकरणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येते. खाण क्षेत्र गावाजवळ येऊ नये व गावाला त्याचा फटका बसू नये यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या विरोध आहे. सुंदरटोला गावाजवळ चारशे एकर जागा आहे. परंतु विस्तारीकरणाला हिरवा झेंडा न मिळाल्याने प्रस्ताव रखडला आहे.

आरोग्य व मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

जगप्रसिद्ध खाण परिसरातील गावात अजूनही आरोग्य व मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नियमाप्रमाणे खाण प्रशासनाने खाण परिसरातील गावात आरोग्य व मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याचा नियम आहे. परंतु त्याचा येथे अभाव दिसून येतो. त्यामुळे नगरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

खाणीकडे जाणारे रस्ते खड्डेमय

चिखला व डोंगरी खाणीकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. खाण परिसरातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचीसुद्धा दुर्दशा झाली आहे. ओव्हरलोड ट्रक रात्रंदिवस धावत असतात. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.

शुद्ध पाण्याचा अभाव

खाण परिसरातील गावात पाण्याची सुविधा आहे. अनेक गावात विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. ही योजना बावनथडी धरणावर आहे. मात्र, मुबलक पाणीपुरवठा होत नाही. नाईलाजाने नागरिकांना विहिरीचे पाणी प्यावे लागते. खाण परिसरातील गावात विहिरींचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांचे आजार बळावले आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकGovernmentसरकार