शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरच्या जगप्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्र विस्तारीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 13:49 IST

तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला ब्रेक लागला असून, गत ११९ वर्षांत या खाणींचे क्षेत्र वाढविण्यात आले नाही.

ठळक मुद्देखाण परिसरातील गावांत मूलभूत सोयी सुविधांचा अभाव

मोहन भोयर

भंडारा : तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला जंगल व्याप्त परिसर आणि शेजारी असलेल्या गावांचा मोठा फटका बसत आहे. गत ११९ वर्षांत एकादाही खाण क्षेत्र वाढविण्यात आले नाही. खाणींचे विस्तारीकरण झाल्यास येथे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.

देशात डोंगरी बु. येथील खुली आणि तिरोडी येथील भूमिगत खाण देशात अव्वल आहे. मँगनीज हा धातू बहुपयोगी असून औषधी, फर्टीलायझर, लोखंड तयार करण्यासाठी उपयोगात येतो. सध्या देशात सर्वात जास्त मँगनीज गुजरात राज्यात जात आहे. सर्वे ऑफ इंडियाने येथे सर्वेक्षण करून भूगर्भात मँगनीजचा मोठा साठा असल्याचा अहवाल दिला होता. याशिवाय तुमसर तालुक्यातील कारली, गारकाभोंगा, आसलपाणी, झंझेरीया, रोंघा, येदरबुची, घानोड, सक्करदरा, हिवरा(मोहाडी) या परिसरात मँगनीजचा साठा भूगर्भात आहे.

१९८० मध्ये राखीव वन कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे खाण क्षेत्र विस्तारीकरणाला अडचण निर्माण झाली. खाण क्षेत्र विस्तारीकरणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येते. खाण क्षेत्र गावाजवळ येऊ नये व गावाला त्याचा फटका बसू नये यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या विरोध आहे. सुंदरटोला गावाजवळ चारशे एकर जागा आहे. परंतु विस्तारीकरणाला हिरवा झेंडा न मिळाल्याने प्रस्ताव रखडला आहे.

आरोग्य व मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

जगप्रसिद्ध खाण परिसरातील गावात अजूनही आरोग्य व मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नियमाप्रमाणे खाण प्रशासनाने खाण परिसरातील गावात आरोग्य व मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याचा नियम आहे. परंतु त्याचा येथे अभाव दिसून येतो. त्यामुळे नगरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

खाणीकडे जाणारे रस्ते खड्डेमय

चिखला व डोंगरी खाणीकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. खाण परिसरातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचीसुद्धा दुर्दशा झाली आहे. ओव्हरलोड ट्रक रात्रंदिवस धावत असतात. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.

शुद्ध पाण्याचा अभाव

खाण परिसरातील गावात पाण्याची सुविधा आहे. अनेक गावात विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. ही योजना बावनथडी धरणावर आहे. मात्र, मुबलक पाणीपुरवठा होत नाही. नाईलाजाने नागरिकांना विहिरीचे पाणी प्यावे लागते. खाण परिसरातील गावात विहिरींचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांचे आजार बळावले आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकGovernmentसरकार