शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

तुमसरच्या जगप्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्र विस्तारीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 13:49 IST

तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला ब्रेक लागला असून, गत ११९ वर्षांत या खाणींचे क्षेत्र वाढविण्यात आले नाही.

ठळक मुद्देखाण परिसरातील गावांत मूलभूत सोयी सुविधांचा अभाव

मोहन भोयर

भंडारा : तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला जंगल व्याप्त परिसर आणि शेजारी असलेल्या गावांचा मोठा फटका बसत आहे. गत ११९ वर्षांत एकादाही खाण क्षेत्र वाढविण्यात आले नाही. खाणींचे विस्तारीकरण झाल्यास येथे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.

देशात डोंगरी बु. येथील खुली आणि तिरोडी येथील भूमिगत खाण देशात अव्वल आहे. मँगनीज हा धातू बहुपयोगी असून औषधी, फर्टीलायझर, लोखंड तयार करण्यासाठी उपयोगात येतो. सध्या देशात सर्वात जास्त मँगनीज गुजरात राज्यात जात आहे. सर्वे ऑफ इंडियाने येथे सर्वेक्षण करून भूगर्भात मँगनीजचा मोठा साठा असल्याचा अहवाल दिला होता. याशिवाय तुमसर तालुक्यातील कारली, गारकाभोंगा, आसलपाणी, झंझेरीया, रोंघा, येदरबुची, घानोड, सक्करदरा, हिवरा(मोहाडी) या परिसरात मँगनीजचा साठा भूगर्भात आहे.

१९८० मध्ये राखीव वन कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे खाण क्षेत्र विस्तारीकरणाला अडचण निर्माण झाली. खाण क्षेत्र विस्तारीकरणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येते. खाण क्षेत्र गावाजवळ येऊ नये व गावाला त्याचा फटका बसू नये यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या विरोध आहे. सुंदरटोला गावाजवळ चारशे एकर जागा आहे. परंतु विस्तारीकरणाला हिरवा झेंडा न मिळाल्याने प्रस्ताव रखडला आहे.

आरोग्य व मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

जगप्रसिद्ध खाण परिसरातील गावात अजूनही आरोग्य व मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नियमाप्रमाणे खाण प्रशासनाने खाण परिसरातील गावात आरोग्य व मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याचा नियम आहे. परंतु त्याचा येथे अभाव दिसून येतो. त्यामुळे नगरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

खाणीकडे जाणारे रस्ते खड्डेमय

चिखला व डोंगरी खाणीकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. खाण परिसरातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचीसुद्धा दुर्दशा झाली आहे. ओव्हरलोड ट्रक रात्रंदिवस धावत असतात. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.

शुद्ध पाण्याचा अभाव

खाण परिसरातील गावात पाण्याची सुविधा आहे. अनेक गावात विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. ही योजना बावनथडी धरणावर आहे. मात्र, मुबलक पाणीपुरवठा होत नाही. नाईलाजाने नागरिकांना विहिरीचे पाणी प्यावे लागते. खाण परिसरातील गावात विहिरींचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांचे आजार बळावले आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकGovernmentसरकार