शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शाखा अभियंता म्हणतात, आमच्याकडे तक्रारच नाही

By admin | Updated: July 13, 2017 00:29 IST

हॅलो अन् जय हिंदचा आवाज बीएसएनएलने हिरावला ही बातमी लोकमतला प्रसिद्ध झाली.

अशीही बनवाबनवी : दोषाचे खापर एकमेकांवरराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : हॅलो अन् जय हिंदचा आवाज बीएसएनएलने हिरावला ही बातमी लोकमतला प्रसिद्ध झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यानंतर एक वेगळेच सत्य बाहेर पडले. भारत संचार निगमच्या शाखा अभियंता म्हणाल्या, आमच्याकडे पोलीस स्टेशनची टेलिफोन बाबत कोणतीही तक्रार नाही. तथापी, या विषयावर दोन्ही बाजूचे अधिकारी आपल्या विभागाचा दोष आहे हे मानायला तयार नाही.मोहाडी पोलीस स्टेशनचा टेलिफोन बंद असतो अशी तक्रार लोकमतमध्ये वृत्त आल्यानंतर अनेकांनी बोलून दाखविली. या बाबत वास्तवही अनुभवास आले. ७ जुलै रोजी प्रस्तूत प्रतिनिधीने अनेकदा फोन केले. त्यानंतर फोन उचलला जात नाही म्हणून पोलीस स्टेशन गाठले. तिथे पोलीस डायरीवर एक हवालदार होते. मी परिचय दिला नाही. सरळ विचारल तुमचा टेलिफोन बंद आहे काय. मी लगेच ०७१९७-२४११२२ याच नंबरवर फोन केला आवाजच ऐकू येईना. तेव्हा एक शिपाई आले त्यांनी टेलिफोन मागील एका बटणला हात घातला. त्यांनीच पुन्हा रिंग करायला सांगितले. रिंग केले अन् आश्चर्य, रिंगचा आवाज ऐकायला आला. पुन्हा ८ जुलै, १० जुलै रोजी एका प्रकारची माहिती घेण्यासाठी टेलिफोन नंबरवर फोन केला. पण, रिंग जायची प्रतिसाद दिले जात नव्हते. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल तेलुरे यांच्या मोबाईलवर कॉल केल्यानंतर फोन बंद आहे. बीएसएनएल मोहाडी येथे तक्रार केल्याचे सांगितले.आज लोकमतमध्ये हॅलो अन् जयहिंद.... हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोलीस अन् दूरसंचार विभागाच्या कानात रिंग वाजायला लागली. बीएसएनएल कार्यालय मोहाडी शाखेच्या शाखा अभियंता रिता बांते म्हणाल्या, आमच्याकडे पोलीस स्टेशन मोहाडीची टेलिफोन बंद बाबत कोणतीच तक्रार नाही. आज बातमी आल्यावर मी स्वत: चौकशी करून खात्री केली. आॅपरेटर नरेश गायधने यांना १२ जुलैला सकाळी ८.३० च्या दरम्यान पोलीस स्टेशनला जायला सांगितले. तिथे गेल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. इकडून रिंगचा आवाज ऐकू यायचा पण, टेलिफोनची रिंग वाजत नव्हती. त्यांनी टेलिफोनला बघितले. आवाज कमी, अधिक करण्याची बटण बघितले. कमी म्हणजे म्यूटवर बटण असल्याचे दिसले. पुन्हा पूर्ववत टेलिफोनवर आवाज येवू लागला. आॅपरेटरनी त्याच मोबाईलवरून शाखा अभियंता रिता बांते यांना फोन केले. टेलिफोनमध्ये दोष नव्हताच. त्याला जाणीवपूर्वक कुणीतरी छेडछाड करण्याचे कारस्थान करीत असल्याचे समजून आले. टेलिफोनवर येणारे फोन टाळण्याचा कट पोलीस स्टेशनमध्ये होत असल्याचा प्रकार दिसून आला आहे. याबाबतीत पोलीस निरीक्षक सुनिल तेलुरे यांना विचारले असता ते पुन्हा सांगतात आम्ही सहा दिवसापूर्वी बीएसएनएलकडे लेखी तक्रार केली. केव्हा केली याची तारीख मात्र त्यांना देता आली नाही. तसेच काही वेळानंतर त्यांनी पुन्हा सांगितले मोहाडी बीएसएनएल मधील देशमुख यांच्याजवळ रजिष्टरमध्ये तक्रार नोंदविली गेली. पण, याबाबत तक्रारीची नोंदच नाही. असे शाखा अभियंता रिता बांते यांनी लोकमतला सांगितले. या प्रकरणानंतर मात्र प्रस्तूत प्रतिनिधीने मोहाडी पोलीस स्टेशनच्या टेलिफोनवर कॉल केला तो कॉल पटकन उचलला गेला. याबाबत कोण बनवाबनवी करतो याची शहानिशा होणे आवश्यक झाले आहे. या प्रकरणात दोघेही अधिकारी स्वत:वर दोष घ्यायला तयार नाहीत. एकमेकांवर दोषाचे खापर फोडले जात आहे. खरं कोणाचे मानावे हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. या प्रकरणाची वरिष्ठामार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.