शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

कोरोना आल्यापासून दोन-दोन दिवस बोहणीही होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.

ठळक मुद्देसायकल रिक्षा चालकांची व्यथा, सरकारी धान्यावर सुरु आहे गुजराण, स्वयंसेवी संस्थांनीही दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साहेब कोरोना आला तेव्हापासून दोन-दोन दिवस साधी बोहणीही होत नाही. ३२ वर्षापासून भंडारात सायकलरिक्षा चालवतो. पण असे कठीण दिवस कधी बघितले नाही. पूर्वी रोज ५००-६०० रुपये घरी घेऊन जायचो. पण कोरोनापासून १००-२०० ही मुश्कीलीने हातात पडतात. सरकारी धान्य मिळत असल्याने कशीतरी गुजराण सुरु आहे. असे रिक्षाचालक माणिक शहारे आपली व्यथा सांगत होते.कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. भंडारा शहरात ३२ वर्षापासून रिक्षा चालविणारे राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील रहिवासी माणिक शहारे यांनी आपबिती सांगितली, तेव्हा अंगावर अक्षरश: शहारे आले. आधीच सायकलरिक्षात बसणे सुशिक्षितांना कमीपणाचे वाटते. मात्र मुलांना शाळेत सोडणे आणि मालवाहतुकीतून घरखर्च भागायचा. परंतु आता लॉकडाऊनने आमचे सर्वस्वच गमावून बसलो आहे. तीन-तीन दिवस साधी बोहणीही होत नाही. घरी पैसे नेले नाही तर कुटूंब कसे चालवायचे? असा सवाल ते करतात.नवीन टाकळी परिसरातील दिगंबर गायधने २७ वर्षापासून भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवितात. आपल्या उभ्या आयुष्यात असे संकट कधीच अनुभवले नाही. एकही दिवस असा गेला नाही की आपण रिकाम्या हाताने घरी गेलो. मात्र कोरोना पासून दिवसभर भटकूनही हातात एक रुपयाही मिळत नाही. घरखर्च चालवावा कसा असा प्रश्न असल्याचे ते सांगतात. अशीच अवस्था शहरातील इतरही रिक्षाचालकांची आहे. शासनाने दिलेले धान्य आणि स्वयंसेवी संस्थाकडून मिळालेल्या मदतीवर गुजराण सुरु आहे. परंतु कोण किती दिवस देणार. एकदाचा हा कोरोना संपला पाहिजे, असे दिगंबर आणि माणिक यांनी सांगितले.कोरोनाचा फटकाभंडारा शहरात ५० च्या आसपास सायकलरिक्षा चालक आहेत. २० वर्षापूर्वी शहरात रिक्षांची संख्या तीन हजारांच्या घरात होती. मात्र आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत. लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.सायकलरिक्षाला दिवस वाईटभंडारा शहरात सवारीचे हमखास साधन म्हणजे सायकलरिक्षा. अनेकांनी सायकलरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढला. परंतु आॅटोरिक्षा आणि मोटारसायकलची संख्या वाढली आणि सायकलरिक्षाला वाईट दिवस आले. सुशिक्षित व्यक्ती सायकलरिक्षात बसायला मागेपुढे पाहतात. भाड्यासाठी अनेकदा घासाघीस करतात. गत दहा वर्षापासून सायकलरिक्षाला भंडारा शहरात तरी वाईट दिवस आले. त्यामुळे आता अनेक जण मुलांना शाळेत पोहचून देणे आणि दिवसभर सायकलरिक्षाची मालगाडी करून दुकानातील साहित्य इकडून तिकडे रोजीरोटी कमावतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या