शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोरोना आल्यापासून दोन-दोन दिवस बोहणीही होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.

ठळक मुद्देसायकल रिक्षा चालकांची व्यथा, सरकारी धान्यावर सुरु आहे गुजराण, स्वयंसेवी संस्थांनीही दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साहेब कोरोना आला तेव्हापासून दोन-दोन दिवस साधी बोहणीही होत नाही. ३२ वर्षापासून भंडारात सायकलरिक्षा चालवतो. पण असे कठीण दिवस कधी बघितले नाही. पूर्वी रोज ५००-६०० रुपये घरी घेऊन जायचो. पण कोरोनापासून १००-२०० ही मुश्कीलीने हातात पडतात. सरकारी धान्य मिळत असल्याने कशीतरी गुजराण सुरु आहे. असे रिक्षाचालक माणिक शहारे आपली व्यथा सांगत होते.कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. भंडारा शहरात ३२ वर्षापासून रिक्षा चालविणारे राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील रहिवासी माणिक शहारे यांनी आपबिती सांगितली, तेव्हा अंगावर अक्षरश: शहारे आले. आधीच सायकलरिक्षात बसणे सुशिक्षितांना कमीपणाचे वाटते. मात्र मुलांना शाळेत सोडणे आणि मालवाहतुकीतून घरखर्च भागायचा. परंतु आता लॉकडाऊनने आमचे सर्वस्वच गमावून बसलो आहे. तीन-तीन दिवस साधी बोहणीही होत नाही. घरी पैसे नेले नाही तर कुटूंब कसे चालवायचे? असा सवाल ते करतात.नवीन टाकळी परिसरातील दिगंबर गायधने २७ वर्षापासून भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवितात. आपल्या उभ्या आयुष्यात असे संकट कधीच अनुभवले नाही. एकही दिवस असा गेला नाही की आपण रिकाम्या हाताने घरी गेलो. मात्र कोरोना पासून दिवसभर भटकूनही हातात एक रुपयाही मिळत नाही. घरखर्च चालवावा कसा असा प्रश्न असल्याचे ते सांगतात. अशीच अवस्था शहरातील इतरही रिक्षाचालकांची आहे. शासनाने दिलेले धान्य आणि स्वयंसेवी संस्थाकडून मिळालेल्या मदतीवर गुजराण सुरु आहे. परंतु कोण किती दिवस देणार. एकदाचा हा कोरोना संपला पाहिजे, असे दिगंबर आणि माणिक यांनी सांगितले.कोरोनाचा फटकाभंडारा शहरात ५० च्या आसपास सायकलरिक्षा चालक आहेत. २० वर्षापूर्वी शहरात रिक्षांची संख्या तीन हजारांच्या घरात होती. मात्र आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत. लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.सायकलरिक्षाला दिवस वाईटभंडारा शहरात सवारीचे हमखास साधन म्हणजे सायकलरिक्षा. अनेकांनी सायकलरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढला. परंतु आॅटोरिक्षा आणि मोटारसायकलची संख्या वाढली आणि सायकलरिक्षाला वाईट दिवस आले. सुशिक्षित व्यक्ती सायकलरिक्षात बसायला मागेपुढे पाहतात. भाड्यासाठी अनेकदा घासाघीस करतात. गत दहा वर्षापासून सायकलरिक्षाला भंडारा शहरात तरी वाईट दिवस आले. त्यामुळे आता अनेक जण मुलांना शाळेत पोहचून देणे आणि दिवसभर सायकलरिक्षाची मालगाडी करून दुकानातील साहित्य इकडून तिकडे रोजीरोटी कमावतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या