शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आल्यापासून दोन-दोन दिवस बोहणीही होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.

ठळक मुद्देसायकल रिक्षा चालकांची व्यथा, सरकारी धान्यावर सुरु आहे गुजराण, स्वयंसेवी संस्थांनीही दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साहेब कोरोना आला तेव्हापासून दोन-दोन दिवस साधी बोहणीही होत नाही. ३२ वर्षापासून भंडारात सायकलरिक्षा चालवतो. पण असे कठीण दिवस कधी बघितले नाही. पूर्वी रोज ५००-६०० रुपये घरी घेऊन जायचो. पण कोरोनापासून १००-२०० ही मुश्कीलीने हातात पडतात. सरकारी धान्य मिळत असल्याने कशीतरी गुजराण सुरु आहे. असे रिक्षाचालक माणिक शहारे आपली व्यथा सांगत होते.कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. भंडारा शहरात ३२ वर्षापासून रिक्षा चालविणारे राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील रहिवासी माणिक शहारे यांनी आपबिती सांगितली, तेव्हा अंगावर अक्षरश: शहारे आले. आधीच सायकलरिक्षात बसणे सुशिक्षितांना कमीपणाचे वाटते. मात्र मुलांना शाळेत सोडणे आणि मालवाहतुकीतून घरखर्च भागायचा. परंतु आता लॉकडाऊनने आमचे सर्वस्वच गमावून बसलो आहे. तीन-तीन दिवस साधी बोहणीही होत नाही. घरी पैसे नेले नाही तर कुटूंब कसे चालवायचे? असा सवाल ते करतात.नवीन टाकळी परिसरातील दिगंबर गायधने २७ वर्षापासून भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवितात. आपल्या उभ्या आयुष्यात असे संकट कधीच अनुभवले नाही. एकही दिवस असा गेला नाही की आपण रिकाम्या हाताने घरी गेलो. मात्र कोरोना पासून दिवसभर भटकूनही हातात एक रुपयाही मिळत नाही. घरखर्च चालवावा कसा असा प्रश्न असल्याचे ते सांगतात. अशीच अवस्था शहरातील इतरही रिक्षाचालकांची आहे. शासनाने दिलेले धान्य आणि स्वयंसेवी संस्थाकडून मिळालेल्या मदतीवर गुजराण सुरु आहे. परंतु कोण किती दिवस देणार. एकदाचा हा कोरोना संपला पाहिजे, असे दिगंबर आणि माणिक यांनी सांगितले.कोरोनाचा फटकाभंडारा शहरात ५० च्या आसपास सायकलरिक्षा चालक आहेत. २० वर्षापूर्वी शहरात रिक्षांची संख्या तीन हजारांच्या घरात होती. मात्र आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत. लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.सायकलरिक्षाला दिवस वाईटभंडारा शहरात सवारीचे हमखास साधन म्हणजे सायकलरिक्षा. अनेकांनी सायकलरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढला. परंतु आॅटोरिक्षा आणि मोटारसायकलची संख्या वाढली आणि सायकलरिक्षाला वाईट दिवस आले. सुशिक्षित व्यक्ती सायकलरिक्षात बसायला मागेपुढे पाहतात. भाड्यासाठी अनेकदा घासाघीस करतात. गत दहा वर्षापासून सायकलरिक्षाला भंडारा शहरात तरी वाईट दिवस आले. त्यामुळे आता अनेक जण मुलांना शाळेत पोहचून देणे आणि दिवसभर सायकलरिक्षाची मालगाडी करून दुकानातील साहित्य इकडून तिकडे रोजीरोटी कमावतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या