शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

रिचार्ज शॉफ्टद्वारे पुनर्भरणासाठी तलावात खोदल्या बोअरवेल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:11 IST

सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा येथे खालावलेल्या भूजलपातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने हुडकी तलावात रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : भूजल पातळी वाढीसाठी पालोरा परिसरातील पहिला प्रयोग

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा येथे खालावलेल्या भूजलपातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने हुडकी तलावात रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले. सदर कामांचे तांत्रिक मार्गदर्शन वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांनी केले असून यावर ३,९९,०१० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात तलावात साठलेले पाणी बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात मुरुम पाण्याची पातळी वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.मोहाडी तालुक्यातील करडी परिसराला निसर्गाचा शाप आहे. वैनगंगा नदी जवळून वाहत असताना तसेच कोका वन्यजीव अभयारण्य व न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल सभोवताल असताना भूगर्भात पाण्याचा ठणठणाट आहे. जानेवारीतच बोअरवेल्स व विहिरी कोरड्या पडतात. पावसाळ्यात डोंगर टेकड्यांवरून ओसंडून वाहणारे पावसाचे पाणी अडवून साठविण्यासाठी टेकड्यांच्या पायथ्यांशी मोठ्या प्रमाणात लहान तलाव - बोड्या आहेत. मात्र, त्यांची दूरवस्था आहे. तलाव गाळाने बुजलेली आहेत. अतिक्रमणामुळे तलावांचा श्वास अवरुद्ध आहे. त्यामुळे खरीपातील पिकांनाही येथीलु पाण्याचा पुरेशा फायदा होत नाही. पडलेले पावसाचे पाणी सरळ शेती, नाले, ओढ्यांतून वाहून जाते. मागील चार वर्षांपासून खरीपातील दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाठीला पुजलेला आहे. अल्प पावसामुळे हजारो एकर शेती पडीत राहून त्यासाठी केलेला खर्च वाया जात आहे. त्यावर उपाय म्हणून करडी परिसरात पाणी अडविणारी, जिरविणारी व मुरविणारी पुनर्भरण यंत्रणा कार्यान्वित होण्याची आवश्यकता होती.शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे काही प्रमाणात का होईना चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. विविध विभागांचे माध्यमातून तलाव, नाले खोलीकरणाचे काम जोमाने सुरु आहेत. ठिकठिकाणी बंधारे बांधले जात असून तुटलेल्या बंधाºयांच्या दुरुस्त्या युद्ध पातळीवर आहेत. वनविभागाद्वारे वृक्षारोपण व पाणी अडविण्यासाठी समतल चरे खोदकाम, शेतबोड्या, शेततळे, सिंचन विहिरी आदिंच्या कामाचा सपाटा आहे. भूजल पातळीत वाढ होण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पालोरा येथे हुडकी तलावात ग्रामपंचायत पालोराचे सहकार्याने रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांनी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने केले. यावर ३,९९,०१० रुपयांचा खर्च करण्यात आला. तलावात साठवलेले पाणी बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात मुरुम पाण्याची पातळी वाढेल, असा विश्वास विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.कोरडवाहू पालोरा परिसरातील हा नाविण्यपूर्ण प्रयोग आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा यांच्या कार्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून सिंचन विहिरी व बोअरवेल्स यांना त्याचा फायदा होणार आहे.-महादेव बुरडे, सरपंच, ग्रामपंचायत, पालोरा.