शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणात वीज खांबांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तरीही वाहनचालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करुन प्रवास करीत आहेत.

ठळक मुद्देअपघातात वाढ। निलज ते भंडारा राज्यमार्गाचे बांधकाम जोमात सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा चौ : निलज ते भंडारा राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम जोमाने सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनीने या मार्गावरील वीज खांब बाजूला न केल्यामुळे रस्ता रुंदीकरणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. हा राज्यमार्ग वर्दळीचा असून रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे या खांबामुळे वाहनास अडथळा निर्माण होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा एखादा जीव गेल्यावर वीज प्रशासनाला जाग येईल का, अशा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तरीही वाहनचालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करुन प्रवास करीत आहेत. मात्र राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला वीज खांब जसेचे तसे उभे असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असल्यामुळे कडेला असलेले खांब रस्त्यावर आले आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष देवून वीज वितरण कंपनीने लक्ष देवून त्वरीत वीज खांब हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जनहितासाठी काढावा तात्काळ पर्यायनिलज- भंडारा या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे वीज खांब जर मार्गाच्या मध्यभागी असतील तर या मार्गाच्या रुंदीकरणाला काहीच उपयोग राहत नाही. अशा रस्ते बांधकामामुळे अपघात होऊन नागरिक व वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपआपल्या नियमांच्या मर्यादा लक्षात घेवून लोकांचे जीव वाचवावेत यासाठी संयुक्तरित्या पर्याय काढणे आवश्यक आहे.निलज - भंडारा या रस्त्याचे जोमाने काम सुरु आहे. मात्र रस्त्यावरील खांब अडचण निर्माण करीत आहेत. याकरिता दोषी वीजवितरण कंपनी आहे किंवा बांधकाम विभाग आहे. या संदर्भात जनतेला काही देणे नाही. अपघात होवू नये, एखाद्याचा जीव जावू नये हे महत्वाचे आहे. खांब हटविणे ही जबाबदारी बांधकाम व वीज वितरण कंपनीचा आहे. रस्ता रुंदीकरणामुळे जनतेला त्रास होवू नये हे महत्वाचे आहे. एखादा अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनी राहील.- बाळू फुलबांधे,भंडारा विधानसभा प्रमुख, शिवसेना

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाelectricityवीज