शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

रस्ता रुंदीकरणात वीज खांबांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तरीही वाहनचालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करुन प्रवास करीत आहेत.

ठळक मुद्देअपघातात वाढ। निलज ते भंडारा राज्यमार्गाचे बांधकाम जोमात सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा चौ : निलज ते भंडारा राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम जोमाने सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनीने या मार्गावरील वीज खांब बाजूला न केल्यामुळे रस्ता रुंदीकरणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. हा राज्यमार्ग वर्दळीचा असून रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे या खांबामुळे वाहनास अडथळा निर्माण होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा एखादा जीव गेल्यावर वीज प्रशासनाला जाग येईल का, अशा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तरीही वाहनचालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करुन प्रवास करीत आहेत. मात्र राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला वीज खांब जसेचे तसे उभे असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असल्यामुळे कडेला असलेले खांब रस्त्यावर आले आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष देवून वीज वितरण कंपनीने लक्ष देवून त्वरीत वीज खांब हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जनहितासाठी काढावा तात्काळ पर्यायनिलज- भंडारा या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे वीज खांब जर मार्गाच्या मध्यभागी असतील तर या मार्गाच्या रुंदीकरणाला काहीच उपयोग राहत नाही. अशा रस्ते बांधकामामुळे अपघात होऊन नागरिक व वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपआपल्या नियमांच्या मर्यादा लक्षात घेवून लोकांचे जीव वाचवावेत यासाठी संयुक्तरित्या पर्याय काढणे आवश्यक आहे.निलज - भंडारा या रस्त्याचे जोमाने काम सुरु आहे. मात्र रस्त्यावरील खांब अडचण निर्माण करीत आहेत. याकरिता दोषी वीजवितरण कंपनी आहे किंवा बांधकाम विभाग आहे. या संदर्भात जनतेला काही देणे नाही. अपघात होवू नये, एखाद्याचा जीव जावू नये हे महत्वाचे आहे. खांब हटविणे ही जबाबदारी बांधकाम व वीज वितरण कंपनीचा आहे. रस्ता रुंदीकरणामुळे जनतेला त्रास होवू नये हे महत्वाचे आहे. एखादा अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनी राहील.- बाळू फुलबांधे,भंडारा विधानसभा प्रमुख, शिवसेना

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाelectricityवीज