शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By admin | Updated: April 4, 2017 00:31 IST

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून ....

नरेंद्र भोंडेकर यांची मागणी : शिवसेनेचा आंदोलनाचा इशाराभंडारा : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारसी लागू करण्याची मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून सातबारा कोरा न केल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील राहून शेतकरी, शेतमजूर व कामगाराच्या हिताकरिता शिवसेनेकडून शासनाचा निषेध करण्यात येईल. कर्ज मुक्ती न दिल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल. या आंदोलनात शांतता व सुव्यवस्था भंग झाल्यास त्याला राज्यशासन जबाबदार राहील, असेही भोंडेकर म्हणाले.संताची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कर्जाच्या विवंचनेत असलेला शेतकरी नैराश्यामुळे किटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवितो. परंतु शासनाला याचे कोणतेही दु:ख वाटत नाही. हेच बळीराजाचे दुर्देव आहे. त्यातही भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दु:ख मोठे आहे. येथील लोकप्रतिधींना शेतकऱ्यांच्या दु:खांशी काहीही घेणे देणे नसून अशा संवेदनहीन लोकप्रतिनिधीमुळे शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. भंडारा जिल्हा राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात धान पिक घेतले जाते. तलावाचा जिल्हा असूनही शासनाच्या संवेदनहीन धोरणामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. उत्पादन खर्च उत्पादीत किमतीपेक्षा जास्त असल्यामुळे बळीराजा आर्थिक कोंढीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मदतीचा हात न मिळाल्यामुळे व बँक, संस्था आणि सावकाराकडून बळीराजाचा मानसिक छळ सुरू आहे. अशा परिस्थितीत बळीराजांच्या आत्महत्येला राज्य सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.शिवसेनेने मात्र बळीराजाच्या या आत्महत्येचे राजकारण कधीही केले नाही. बळीराजाला स्वाभिमानाने उभा करण्यासाठी शिवसेना आक्रमकपणे लढा देईल, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, शहरप्रमुख सुर्यकांत ईलमे, यशवंत वंजारी, विजय काटेखाये, राजेंद्र ब्राम्हणकर, संदीप सार्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)